शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

खाकीतील नराधम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 03:29 IST

खाकी वर्दीवाले पूर्वीसारखा दरारा अथवा आदर केव्हाच गमावून बसले आहेत. हप्तावसुली, गुन्हेगारांना संरक्षण, सर्वसामान्यांना विनाकारण वेठीस धरणे हे प्रकार पोलिसांकडून सर्रास सुरु आहेत

खाकी वर्दीवाले पूर्वीसारखा दरारा अथवा आदर केव्हाच गमावून बसले आहेत. हप्तावसुली, गुन्हेगारांना संरक्षण, सर्वसामान्यांना विनाकारण वेठीस धरणे हे प्रकार पोलिसांकडून सर्रास सुरु आहेत. भ्रष्टाचारात तर हा विभाग राज्यात अव्वल आहे. काही लोकांच्या या प्रतापांमुळे आधीच बदनाम झालेल्या पोलीस खात्याची अब्रू पुरती चव्हाट्यावर आणण्याचे काम नागपुरातील एका पोलीस शिपायाने केले आहे. या नराधमाने पिस्तुलाच्या धाकावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा चीड आणणारा आणि तेवढाच लज्जास्पद प्रकार नागपुरातील सोनेगाव येथे उघडकीस आला आहे. पोलिसाची वर्दी घातली की आम्हाला कुठेही, काहीही करण्याचा, कसेही वागण्याचा जणू परवानाच मिळाला आहे, अशा अविर्भावात पोलीस खात्यातील काही लोक समाजात वावरत असतात. भररस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा घालणे, चौकाचौकात अड्डे जमवून वाहनचालकांना वेठीस धरणे या गोष्टी आता नव्या राहिलेल्या नाहीत. कालपरवा तर एका पोलीस कॉन्स्टेबलने जिल्हा न्यायालयातील एका अधिकाºयालाच मारहाण केली. आपण समाजाचे रक्षक आहोत भक्षक नाही याचेही भान त्यांना बरेचदा राहात नाही,अशी परिस्थिती आहे. ही एकप्रकारची पोलिसी गुंडागर्दीच म्हणायला हवी. एका असहाय महिलेस पिस्तुलाचा धाक दाखवून, तिच्या बाळाला मारण्याची धमकी देऊन बळजबरी करण्याचे धाडस एक पोलीस शिपाई करतोच कसा? त्याच्यावर कुणाचाच वचक नाही काय? की पोलीस खात्यात आता असा वचक ठेवणारे अधिकारीच राहिले नाहीत. अशा नराधमास मग तो पोलीस असला तरी कठोर शिक्षा व्हायलाच हवी. सर्वसामान्य लोक पोलीस ठाण्यात जायला आधीच घाबरतात आणि अशा घटनांमुळे त्यांची ही भीती आणखी वाढते. एकीकडे शासनातर्फे पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतात. विशेषत: महिलांना पोलीस ठाणे म्हणजे आपले माहेर वाटावे या दृष्टीने त्यांच्या मदतीकरिता वेळोवेळी कार्यपद्धतीत योग्य ते बदल तसेच सुधारणा केल्या जातात. पण असे बेपर्वा पोलीसवाले शासनाच्या या प्रयत्नांवर पाणी फेरतात. त्यामुळे खाकी वर्दीतील या गुन्हेगारांना कोण लगाम घालणार असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. खरे तर पोलिसांमधील ही वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. यासाठी वेळप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यासही हरकत नाही. आपण जनतेचे रक्षक आहोत ही भावना प्रत्येक पोलिसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.

टॅग्स :Policeपोलिस