शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

खाकीतील नराधम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 03:29 IST

खाकी वर्दीवाले पूर्वीसारखा दरारा अथवा आदर केव्हाच गमावून बसले आहेत. हप्तावसुली, गुन्हेगारांना संरक्षण, सर्वसामान्यांना विनाकारण वेठीस धरणे हे प्रकार पोलिसांकडून सर्रास सुरु आहेत

खाकी वर्दीवाले पूर्वीसारखा दरारा अथवा आदर केव्हाच गमावून बसले आहेत. हप्तावसुली, गुन्हेगारांना संरक्षण, सर्वसामान्यांना विनाकारण वेठीस धरणे हे प्रकार पोलिसांकडून सर्रास सुरु आहेत. भ्रष्टाचारात तर हा विभाग राज्यात अव्वल आहे. काही लोकांच्या या प्रतापांमुळे आधीच बदनाम झालेल्या पोलीस खात्याची अब्रू पुरती चव्हाट्यावर आणण्याचे काम नागपुरातील एका पोलीस शिपायाने केले आहे. या नराधमाने पिस्तुलाच्या धाकावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा चीड आणणारा आणि तेवढाच लज्जास्पद प्रकार नागपुरातील सोनेगाव येथे उघडकीस आला आहे. पोलिसाची वर्दी घातली की आम्हाला कुठेही, काहीही करण्याचा, कसेही वागण्याचा जणू परवानाच मिळाला आहे, अशा अविर्भावात पोलीस खात्यातील काही लोक समाजात वावरत असतात. भररस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा घालणे, चौकाचौकात अड्डे जमवून वाहनचालकांना वेठीस धरणे या गोष्टी आता नव्या राहिलेल्या नाहीत. कालपरवा तर एका पोलीस कॉन्स्टेबलने जिल्हा न्यायालयातील एका अधिकाºयालाच मारहाण केली. आपण समाजाचे रक्षक आहोत भक्षक नाही याचेही भान त्यांना बरेचदा राहात नाही,अशी परिस्थिती आहे. ही एकप्रकारची पोलिसी गुंडागर्दीच म्हणायला हवी. एका असहाय महिलेस पिस्तुलाचा धाक दाखवून, तिच्या बाळाला मारण्याची धमकी देऊन बळजबरी करण्याचे धाडस एक पोलीस शिपाई करतोच कसा? त्याच्यावर कुणाचाच वचक नाही काय? की पोलीस खात्यात आता असा वचक ठेवणारे अधिकारीच राहिले नाहीत. अशा नराधमास मग तो पोलीस असला तरी कठोर शिक्षा व्हायलाच हवी. सर्वसामान्य लोक पोलीस ठाण्यात जायला आधीच घाबरतात आणि अशा घटनांमुळे त्यांची ही भीती आणखी वाढते. एकीकडे शासनातर्फे पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतात. विशेषत: महिलांना पोलीस ठाणे म्हणजे आपले माहेर वाटावे या दृष्टीने त्यांच्या मदतीकरिता वेळोवेळी कार्यपद्धतीत योग्य ते बदल तसेच सुधारणा केल्या जातात. पण असे बेपर्वा पोलीसवाले शासनाच्या या प्रयत्नांवर पाणी फेरतात. त्यामुळे खाकी वर्दीतील या गुन्हेगारांना कोण लगाम घालणार असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. खरे तर पोलिसांमधील ही वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. यासाठी वेळप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यासही हरकत नाही. आपण जनतेचे रक्षक आहोत ही भावना प्रत्येक पोलिसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.

टॅग्स :Policeपोलिस