शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Madhya Pradesh Election Results: 'हाथी' किसका साथी?... मध्य प्रदेशात काय करणार मायावती? 

By यदू जोशी | Updated: December 11, 2018 11:43 IST

एकेकाळी हिंदुत्ववादाविरुद्ध कट्टर भूमिका घेणाऱ्या मायावतींनी बसपाच्या हत्ती या निवडणूक चिन्हाचे हिंदूकरण पुढे केले हा इतिहास आहे.

आतापर्यंतचा इतिहास 'कभी इधर, कभी उधर'चाच

- यदु जोशी

मध्य प्रदेशमध्ये अंतिम निकालानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये कमी जागांचे अंतर राहिले तर मायावती यांच्या बसपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहू शकते. या पक्षाला दहा ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मायावती ज्या बाजूला जातील त्यांचे सरकार येईल, असे होऊ शकते. एका अर्थाने सत्तेची चावी ही बसपाच्या हातात राहू शकते. तसे झाले तर मायावती कुणाकडे जातील हे आताच निश्चित सांगणे जोखमीचे ठरू शकते. कारण, ‘कभी इधर तो कभी उधर’ असा मायावती यांचा प्रवास राहिला आहे.

छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये बसपाची निश्चित अशी व्होट बँक आहे. मायावती यांनी निवडणूकपूर्व युती काँग्रेससोबत करावी, असे प्रयत्न काँग्रेसकडून झाले पण मायावती यांनी एकला चालो रेची भूमिका घेतली. छत्तीसगडमध्ये तर त्यांनी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या पक्षाशी युती केली. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा मायावती यांनी भाजपाला करून दिला, अशी टीकाही त्यावेळी झाली होती. प्रत्यक्ष निकालात छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा रथ मायावतींच्या अजित जोगींसोबत जाण्याने रोखला गेला नाही हे स्पष्ट झाले आहे. बसपाचा पूर्वेतिहास पाहता ते आता मध्य प्रदेशात निकालानंतर काँग्रेससोबत जातील की भाजपासोबत हे सांगणे कठीण आहे.

एकेकाळी हिंदुत्ववादाविरुद्ध कट्टर भूमिका घेणाऱ्या मायावतींनी बसपाच्या हत्ती या निवडणूक चिन्हाचे हिंदूकरण पुढे केले हा इतिहास आहे. ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ असा नारा या पक्षाने दिला होता. सुरुवातीच्या काळात बसपाच्या कार्यकर्त्यांचा नारा होता, ‘तिलक, तराजू और तलवार, इनको जुते मारो चार’. तिलक म्हणजे ब्राह्मण, तराजू म्हणजे बनिया आणि तलवार म्हणजे जमीनदार यांच्या विरोधातील तो नारा होता. मात्र, २००७ मध्ये बहुमताने सत्ता मिळविताना मायावतींनी दलित-ब्राह्मण युतीचा फॉर्म्युला यशस्वी केला होता.

उत्तर प्रदेशमध्ये १९९३ मध्ये बसपाने मुलायमसिंह यांच्या समाजवादी पार्टीसोबत युती करून निवडणूक लढविली होती. सपाने २५६ जागा लढून १०९ जिंकल्या तर बसपाने १६४ जागा लढून ६७ जागा जिंकल्या होत्या. राममंदिराचा विषय तेव्हा ऐरणीवर होता आणि त्याचा फायदा मिळत भाजपाने १७७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, सपा-बसपाने एकत्र येत सरकार स्थापन केले होते. मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले. पण हा हनिमुन फार काळ टिकला नाही आणि सरकारच्या काही निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त करीत मायावती यांनी २ जून १९९५ मध्ये सरकारचा पाठिंबा काढला. भाजपाने मग मायावती यांना पाठिंबा दिला व मायावती मुख्यमंत्री झाल्या. हे सरकार केवळ चार महिने टिकले होते. २००७ मध्ये मायावतींच्या बसपाने प्रचंड यश विधानसभा निवडणुकीत मिळविले आणि त्या मुख्यमंत्री झाल्या.

सपाशी बसपाचे असलेले विळ्याभोपळ्याचे नाते कायम राहिले. २०१४ च्या लोकसभा आणि त्या नंतर विधानसभा निवडणुकीत सपा-बसपाच्या फुटीचा आणि मोदी लाटेचा फायदा घेत भाजपाने अभूतपूर्व यश मिळविले.

लोकसभा निवडणुकीत बसपाच्या हाती भोपळा आला होता. या दारूण पराभवाने हादरलेल्या मायावती यांनी सपापुढे मैत्रीचा हात केला. परिणामत: गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दोघे एकत्र आले आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या गोरखपूरसह दोन्ही जागांवर सपाने जिंकल्या होत्या. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतही सपा-बसपा युती कायम राहिली. असे असताना काँग्रेसने भाजपाविरुद्ध जी महाआघाडी उभारण्याचे प्रयत्न चालविले आहेत त्यात मायावती मनापासून अजूनही सहभागी झालेल्या नाहीत. काल नवी दिल्लीत झालेल्या या महाआघाडीच्या बैठकीला सपाबरोबरच बसपानेही पाठ दाखविली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवरच मायावतींच्या राजकीय भूमिकेचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र काही शक्यता वर्तविल्या जाऊ शकतात. मायावतींचा पक्ष राष्ट्रीय राजकारणात असला तरी कथेमध्ये राजाचे प्राण जसे पोपटाच्या कंठात असतात तसा बसपाचा जीव हा उत्तर प्रदेशात आहे. त्यामुळे मध्य प्रदेशबाबत निर्णय घेताना मायावती तो निर्णय उत्तर प्रदेशातील राजकारणाचा विचार करून त्या अंगाने घेतील असे वाटते. आज बहुतेक पक्ष भाजपाविरुद्ध एकवटलेले असताना आणि भाजपाविरोधी वातावरण तयार होत असताना भाजपासोबत जाऊन त्यांच्या हाती एक राज्य कायम ठेवण्याची राजकीय अपरिपक्वता त्या दाखवतील असेही वाटत नाही.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल