शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निष्ठेचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 12:37 IST

- मिलिंद कुलकर्णीराजकारण बेभरवशाचे आहे, हे आपण मान्य केले आहेच. पण निष्ठेचा चक्क बाजार मांडला जाईल, हे मात्र अपेक्षित नव्हते. भाजपासारख्या साधनशुचितेचा कायम आग्रह धरणाऱ्या पक्षाने तर कमरेचे काढून डोक्याला गुंडाळायचे तेवढे बाकी ठेवले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे मंत्री या गोष्टींचे उघडपणे समर्थन करतात, यापेक्षा लोकशाहीचे दुर्देव ते कोणते. विजयासाठी ...

- मिलिंद कुलकर्णीराजकारण बेभरवशाचे आहे, हे आपण मान्य केले आहेच. पण निष्ठेचा चक्क बाजार मांडला जाईल, हे मात्र अपेक्षित नव्हते. भाजपासारख्या साधनशुचितेचा कायम आग्रह धरणाऱ्या पक्षाने तर कमरेचे काढून डोक्याला गुंडाळायचे तेवढे बाकी ठेवले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे मंत्री या गोष्टींचे उघडपणे समर्थन करतात, यापेक्षा लोकशाहीचे दुर्देव ते कोणते. विजयासाठी व्यावहारिक तडजोड करावी लागते या संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांचे जळगावातील वक्तव्य गाजले होते. त्याची परिणती जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत लगेच आली. २०१३ मध्ये महापालिका तर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाविरुध्द उमेदवारी लढविणारे आणि महापालिकेत पाच वर्षे खान्देश विकास आघाडीला सहकार्य करणाºया विद्यमान महापौर ललित कोल्हे यांना भाजपाने पावन करुन घेतले. मूळ भाजपाचेच परंतु २००८ मध्ये शहर विकास आघाडी आणि २०१४ मध्ये खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाविरोधी राजकारण करणाºया कैलास सोनवणे यांनाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपामध्ये प्रवेश देऊन उपकृत केले. कोल्हे आणि सोनवणे हे राजकारणातील चाणाक्ष कार्यकर्ते आहेत. हवेची दिशा ओळखून ते भूमिका ठरवत असतात. दोघांनी स्वत: आणि कुटुंबियांसाठी महापौर, उपमहापौर, नगरसेवकपद अशी लाभाची सर्व पदे दहा वर्षांत मिळविली. गरज सरो, वैद्य मरो या तत्त्वाचा अंगीकार करीत आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विरोधात राहत महापालिकेतील सत्ताधाºयांशी संघर्ष केला आता तेच सत्ताधारी मंडळी पक्षात येऊन मोक्याच्या जागा पटकावीत असताना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी नेत्यांना दिसत नाही, ही सत्तेची धुंदी आहे. राष्टÑवादी काँग्रेस पाच वर्षांपूर्वी अशाच हवेत होती. सत्तेत असताना घाऊक प्रमाणात पक्षांतरे झाली. बेडकी फुगली तरी हत्ती होत नाही, हे राजकीय पक्ष विसरतात आणि सत्ता जाताच पोरक्याचे जिणे वाट्याला येते. ११ नगरसेवक असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसचे ७ नगरसेवक सोडून गेले. इच्छुकांच्या मुलाखतीचे आयोजन करणाºया महानगराध्यक्षाने सायंकाळी पक्षांतर केले. महापौर ललित कोल्हे हे दहा दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय जाहीर करतात. इच्छुकांच्या मुलाखती घेणा-या पॅनलचे सदस्य म्हणून काम करतात आणि दुस-याच दिवशी निष्ठा बदलतात, हा निष्ठेचा बाजार नाही तर काय? पुन्हा या ‘आयाराम-गयारामां’च्या तोंडी नेत्यांवर विश्वास ठेवून अमूक पक्षात प्रवेश करीत आहे, अशी भाषा असते. राजकारणात किती बेगडीपण आणि दांभिकता ठासून भरलेली आहे, याची प्रचिती अशा घटनांनी येते. दुर्देव असे की, अशी मंडळी लोकशाही मार्गाने सत्ता हाती घेतात आणि शहाण्यासुरत्या लोकांचे नेतृत्व करतात.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव