शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

निष्ठावंत जनसेवक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:12 IST

मिलिंद कुलकर्णी दोनदा आमदार, दोनदा खासदार, प्रतिष्ठित साखर कारखान्याचे चेअरमन, राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले पद असा लौकिकार्थाने मानमरातब मिळूनही काळ्या ...

मिलिंद कुलकर्णीदोनदा आमदार, दोनदा खासदार, प्रतिष्ठित साखर कारखान्याचे चेअरमन, राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले पद असा लौकिकार्थाने मानमरातब मिळूनही काळ्या मातीशी आणि सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी, स्वपक्षाशी निष्ठा जपणारा कार्यकर्ता, नेता अशी ओळख हरिभाऊ जावळे यांनी कार्यकर्तृत्वाने निर्माण केली होती. राजकारणाविषयी सर्वसामान्यांमध्ये प्रचंड चीड असतानाही हरिभाऊंसारख्या मोजक्या नेत्यांकडे भांगेतील तुळस म्हणून बघीतले जाते. त्या हरिभाऊंचे अचानक जाणे म्हणूनच प्रत्येकाला हुरहूर लावणारे ठरले.उंच, धिप्पाड देहयष्टी, हसतमुख व्यक्तिमत्व, संवादात माधुर्य असलेले हरिभाऊ संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला आपलेसे करत, ते त्यांच्या स्वभाव वैशिष्टयामुळे. जवळच्या कार्यकर्त्याला अरे तुरे करताना आपसूक खांद्यावर, पाठीवर हात जायचा. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी दांडगा संपर्क असताना त्यांना आदरपूर्वक संबोधन केले जायचे. त्यामुळे हरिभाऊंचा गोतावळा मोठा होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने विनम्रपणा, शिस्त हे गुण अंगी होते. त्यांच्या यशामागे ही कारणे आहेत.हरिभाऊंना प्रत्येक यश हे खडतर परिश्रमाने मिळाले. यावल विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता तेथे विरोधी पक्षाचा आमदार निवडून येणे कठीण होते. १९९९ मध्ये भाजपचे पहिले आमदार होण्याचा मान हरिभाऊ जावळे यांना मिळाला. अरुण महाजन यांचे दोनदा प्रयत्न असफल झाल्यानंतर हरिभाऊंच्या रुपाने आमदारकी भाजपला मिळाली. शेजारील रावेर मतदारसंघात डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्यारुपाने १९८५ मध्येच भाजपचा जिल्ह्यातील पहिला आमदार निवडून आला होता. केळीचा पट्टा म्हटल्या जाणाऱ्या यावल-रावेर तालुक्यात डॉ.गुणवंतराव सरोदे आणि हरिभाऊ जावळे यांनी भाजपचे रोपटे रुजवले आणि वाढवले. मधुकरराव चौधरी, जे.टी.महाजन, रमेश विठ्ठल चौधरी यांचे वर्चस्व असलेल्या या भागात भाजपने यशाची चव चाखली ती कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आणि सरोदे-जावळे यांच्यासारख्या लोकाभिमुख नेतृत्वामुळे. फैजपूरचा मधुकर सहकारी साखर कारखाना हा या दोन्ही तालुक्यांचा श्वास. पक्षीय जोडे काढून सहकार क्षेत्रात सगळे नेते एकत्र येण्याची परंपरा. डॉ.गुणवंतराव सरोदे, साकळीचे डॉ.गोकूळ नेवे यांनी कारखान्यात संचालक म्हणून काम केले होते. त्या कारखान्याचे चेअरमनपद हरिभाऊ जावळे यांच्याकडे पाच वर्षे राहिले.पहिले खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्या नंतर नशिराबादचे वाय.जी.महाजन हे खासदार झाले. त्यांच्यावर बालंट आल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हरिभाऊ जावळे यांनी ही जागा भाजपकडे कायम राखली. जिल्ह्यातील दुसरी जागा भाजपने गमावली, पण ही जागा राखली. पुढे दुसऱ्यांदा पुन्हा हरिभाऊ खासदार झाले.हरिभाऊंवर अन्याय, पक्षपात अनेकदा झाला, पण मूकपणे सोसला. दोनदा खासदार झाल्यानंतर त्यांचे तिकीट कापण्यात आले. पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवत असताना ‘फौजदार झाला कॉन्सेटबल’ अशी अवहेलना त्यांनी पचवली. भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर अनुभवी हरिभाऊंच्या ज्ञानाचा फायदा करुन घेतला जाईल असे वाटले होते. पण शेवटच्या तीन महिन्यासाठी त्यांना कृषी परिषदेचे उपाध्यक्षपद देण्यात आले. दोन तुल्यबळ नेत्यांमधील वादात हरिभाऊ जावळे यांच्यासारखा सज्जन नेत्याची घुसमट होत होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही उघडपणे त्यांच्या प्रतिस्पर्र्धींना पक्षांतर्गत बळ दिले गेले आणि हरिभाऊंना पराभव स्विकारावा लागला. राज्यात भाजपची सत्ता जाताच अनेक नेत्यांनी स्वत:च्या पराभवाचे खापर पक्षश्रेष्ठी, नेते यांच्यावर फोडले असताना हरिभाऊ जावळे यांनी कधीही जाहीर वा खाजगीत नाराजीचा सूर आवळला नाही. शिस्तबध्द असलेल्या भाजपच्या व्यासपीठांवर अलिकडे नेत्यांनाच मारहाण होऊ लागल्याचे प्रसंग वरचेवर घडत असताना पक्षाला एकसंघ ठेवण्यासाठी जिल्हाध्यक्षपदासाठी हरिभाऊंना गळ घालण्यात आली. शिस्तबध्द कार्यकर्ता म्हणून विनम्रपणे त्यांनी ती स्विकारली. मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. राजकारणात अशी माणसे विरळा म्हणावी लागतील. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक सत्शील नेतृत्व हरपले आहे.