शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

निष्ठावंत जनसेवक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:12 IST

मिलिंद कुलकर्णी दोनदा आमदार, दोनदा खासदार, प्रतिष्ठित साखर कारखान्याचे चेअरमन, राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले पद असा लौकिकार्थाने मानमरातब मिळूनही काळ्या ...

मिलिंद कुलकर्णीदोनदा आमदार, दोनदा खासदार, प्रतिष्ठित साखर कारखान्याचे चेअरमन, राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले पद असा लौकिकार्थाने मानमरातब मिळूनही काळ्या मातीशी आणि सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी, स्वपक्षाशी निष्ठा जपणारा कार्यकर्ता, नेता अशी ओळख हरिभाऊ जावळे यांनी कार्यकर्तृत्वाने निर्माण केली होती. राजकारणाविषयी सर्वसामान्यांमध्ये प्रचंड चीड असतानाही हरिभाऊंसारख्या मोजक्या नेत्यांकडे भांगेतील तुळस म्हणून बघीतले जाते. त्या हरिभाऊंचे अचानक जाणे म्हणूनच प्रत्येकाला हुरहूर लावणारे ठरले.उंच, धिप्पाड देहयष्टी, हसतमुख व्यक्तिमत्व, संवादात माधुर्य असलेले हरिभाऊ संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला आपलेसे करत, ते त्यांच्या स्वभाव वैशिष्टयामुळे. जवळच्या कार्यकर्त्याला अरे तुरे करताना आपसूक खांद्यावर, पाठीवर हात जायचा. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी दांडगा संपर्क असताना त्यांना आदरपूर्वक संबोधन केले जायचे. त्यामुळे हरिभाऊंचा गोतावळा मोठा होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने विनम्रपणा, शिस्त हे गुण अंगी होते. त्यांच्या यशामागे ही कारणे आहेत.हरिभाऊंना प्रत्येक यश हे खडतर परिश्रमाने मिळाले. यावल विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता तेथे विरोधी पक्षाचा आमदार निवडून येणे कठीण होते. १९९९ मध्ये भाजपचे पहिले आमदार होण्याचा मान हरिभाऊ जावळे यांना मिळाला. अरुण महाजन यांचे दोनदा प्रयत्न असफल झाल्यानंतर हरिभाऊंच्या रुपाने आमदारकी भाजपला मिळाली. शेजारील रावेर मतदारसंघात डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्यारुपाने १९८५ मध्येच भाजपचा जिल्ह्यातील पहिला आमदार निवडून आला होता. केळीचा पट्टा म्हटल्या जाणाऱ्या यावल-रावेर तालुक्यात डॉ.गुणवंतराव सरोदे आणि हरिभाऊ जावळे यांनी भाजपचे रोपटे रुजवले आणि वाढवले. मधुकरराव चौधरी, जे.टी.महाजन, रमेश विठ्ठल चौधरी यांचे वर्चस्व असलेल्या या भागात भाजपने यशाची चव चाखली ती कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आणि सरोदे-जावळे यांच्यासारख्या लोकाभिमुख नेतृत्वामुळे. फैजपूरचा मधुकर सहकारी साखर कारखाना हा या दोन्ही तालुक्यांचा श्वास. पक्षीय जोडे काढून सहकार क्षेत्रात सगळे नेते एकत्र येण्याची परंपरा. डॉ.गुणवंतराव सरोदे, साकळीचे डॉ.गोकूळ नेवे यांनी कारखान्यात संचालक म्हणून काम केले होते. त्या कारखान्याचे चेअरमनपद हरिभाऊ जावळे यांच्याकडे पाच वर्षे राहिले.पहिले खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्या नंतर नशिराबादचे वाय.जी.महाजन हे खासदार झाले. त्यांच्यावर बालंट आल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हरिभाऊ जावळे यांनी ही जागा भाजपकडे कायम राखली. जिल्ह्यातील दुसरी जागा भाजपने गमावली, पण ही जागा राखली. पुढे दुसऱ्यांदा पुन्हा हरिभाऊ खासदार झाले.हरिभाऊंवर अन्याय, पक्षपात अनेकदा झाला, पण मूकपणे सोसला. दोनदा खासदार झाल्यानंतर त्यांचे तिकीट कापण्यात आले. पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवत असताना ‘फौजदार झाला कॉन्सेटबल’ अशी अवहेलना त्यांनी पचवली. भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर अनुभवी हरिभाऊंच्या ज्ञानाचा फायदा करुन घेतला जाईल असे वाटले होते. पण शेवटच्या तीन महिन्यासाठी त्यांना कृषी परिषदेचे उपाध्यक्षपद देण्यात आले. दोन तुल्यबळ नेत्यांमधील वादात हरिभाऊ जावळे यांच्यासारखा सज्जन नेत्याची घुसमट होत होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही उघडपणे त्यांच्या प्रतिस्पर्र्धींना पक्षांतर्गत बळ दिले गेले आणि हरिभाऊंना पराभव स्विकारावा लागला. राज्यात भाजपची सत्ता जाताच अनेक नेत्यांनी स्वत:च्या पराभवाचे खापर पक्षश्रेष्ठी, नेते यांच्यावर फोडले असताना हरिभाऊ जावळे यांनी कधीही जाहीर वा खाजगीत नाराजीचा सूर आवळला नाही. शिस्तबध्द असलेल्या भाजपच्या व्यासपीठांवर अलिकडे नेत्यांनाच मारहाण होऊ लागल्याचे प्रसंग वरचेवर घडत असताना पक्षाला एकसंघ ठेवण्यासाठी जिल्हाध्यक्षपदासाठी हरिभाऊंना गळ घालण्यात आली. शिस्तबध्द कार्यकर्ता म्हणून विनम्रपणे त्यांनी ती स्विकारली. मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. राजकारणात अशी माणसे विरळा म्हणावी लागतील. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक सत्शील नेतृत्व हरपले आहे.