शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

निष्ठावान आणि संयमी शिवाजीराव नागवडे

By सुधीर लंके | Updated: September 20, 2018 13:32 IST

सहकार चळवळीत आणि काँग्रेसच्या राजकारणात योगदान दिलेला नेता शिवाजीराव नागवडे यांच्या रुपाने जिल्ह्याने बुधवारी गमावला.

- सुधीर लंके 

सहकार चळवळीत आणि काँग्रेसच्याराजकारणात योगदान दिलेला नेता शिवाजीराव नागवडे यांच्या रुपाने जिल्ह्याने बुधवारी गमावला. जिल्ह्यातील ज्या नेत्यांनी हयातभर एखाद्या पक्षाचा झेंडा घेऊन तत्वनिष्ठपणे काम केले त्यात नागवडे यांचा उल्लेख सातत्याने होत राहील. 

डोळ्यावर काळा चष्मा, स्वच्छ पांढरे कपडे असे नागवडे यांचे राहणीमान होते. मितभाषी आणि शांत. दूरध्वनी केल्यावरही शांतपणे बोलायला सुरुवात करायचे. कधीही कोणावर जहरी टीका केली नाही. जे काही बोलायचे ते विरोधकांचाही सन्मान राखत. लोकशाही मार्गाने. 

नागवडे मूळचे कम्युनिष्ट. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ते काँग्रेसमध्ये आले. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सहकार क्षेत्रात ते पारंगत असल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे स्वत: त्यांची अनेकदा मदत घेत. राज्यात कारखानदारीत कोठे काही समस्या आली की वसंतदादा नागवडेंकडे ती समस्या सोपवत. त्यांचा या क्षेत्रात अधिकार असल्यानेच राज्य साखर संघाचे नेतृत्वही त्यांच्याकडे दिले गेले. शरद पवार यांनीही त्यांचे हे नेतृत्व मान्य केले. नागवडे हे वसंतदादा समर्थक म्हणून ओळखले जात. वसंतदादांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. विलासराव देशमुख यांच्यासोबतही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 

काँग्रेसचे राजकारण सुरु केल्यानंतर हयातभर ते काँग्रेसचे पाईक राहिले. १९७८ साली त्यांना काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. जनता दलाचे मोहन गाडे व नागवडे यांच्यात हा मुकाबला झाला.  त्यावेळी नागवडे प्रथम विधानसभेत पोहोचले. पुढे श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात नागवडे-पाचपुते हा संघर्ष पहायला मिळाला. विरोधकांचा ‘शंभर टक्के’ बंदोबस्त करायचा अशी प्रस्थापित राजकारण्यांची एक पद्धत असते. नागवडे त्यास अपवाद होते. त्यांनी कधीही विरोधकांवर टोकाची टीका केली नाही. सातत्याने सुसंस्कृतपणा जपला. पाचपुते बोलके व नागवडे मितभाषी असा हा राजकीय मुकाबला होता. पण, न बोलताही नागवडे यांनी आपला जनाधार कोसळू दिला नाही. १९९९ ला नागवडे पुन्हा आमदार झाले. चार वेळा विधानसभांना ते पराभूत झाले. 

१९९१ साली विखे-गडाख ही निवडणूक देशभर गाजली होती. यावेळी नागवडे हे गडाखांच्या रुपाने काँग्रेससोबत राहिले. काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणात नागवडे हे थोरात गटाचे समर्थक होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे यांनी बंडखोरी करत भाजपकडून विधानसभा लढवली. पण, त्यावेळीही नागवडे यांनी काँग्रेस सोडली नाही. 

वांगदरी हे त्यांचे गाव. तेथील सरपंच ते आमदार व सहकारातील मोठा नेता असा प्रवास त्यांनी केला. तालुक्यात शिक्षणसंस्थाही उभारल्या. खेडोपाडी शिक्षण व तंत्रशिक्षण संस्था पोहोचल्या पाहिजेत हे वसंतदादा पाटील यांचे स्वप्न होते. त्यातून नागवडे यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरु केले. केजी ते पीजीच्या शिक्षणसंस्था उभारल्या. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या हयातीतच कारखान्याला त्यांचे नाव देण्याचा निर्णय सभासदांनी घेतला. विद्यमान जिल्हा परिषदेत त्यांच्या सुनबाई महिला बालकल्याण समितीच्या सभापती आहेत. नागवडे परिवाराला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले जाईल, असे अनेकांना वाटत होते. पण, काँग्रेसच्या राजकारणात ती संधी त्यांना मिळाली नाही. नागवडे यांनी काँग्रेसमध्ये आयुष्य घातले. त्या तुलनेत पक्षाने त्यांचा योग्य सन्मान राखला नाही. 

विधानपरिषद किंवा इतर ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करता येणे शक्य होते. परंतु बदललेल्या कॉंग्रेस संस्कृतीत नागवडे दुर्लक्षित राहिले. नागवडे यांनी स्वत:हून त्यासाठी कधी लुडबूड केली नाही. २०१४ च्या निवडणुकीत सहमतीच्या राजकारणात राहुल जगताप यांच्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा दिलदारपणा नागवडे यांनी दाखविला होता. जगताप यांच्या विजयात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. ‘बापू’ नावाने परिचित असलेले नागवडे हे जुन्या काँग्रेस नेत्यांच्या शृंखलेतील एक महत्त्वाचे केंद्र होते. ‘बापू’ नावाप्रमाणेच ते शांत व संयमी होते.

लेखक अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर