शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

लोकसभा निवडणुकांची चाहुल, 'सरकार बचावात्मक, विरोधक आक्रमक' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 17:01 IST

न २०१४ च्या पराभवानंतर काँग्रेसने एकामागून एक राज्यही गमावले. भाजपा ताकदीने पुढे आली.

- धर्मराज हल्लाळे

सन २०१४ च्या पराभवानंतर काँग्रेसने एकामागून एक राज्यही गमावले. भाजपा ताकदीने पुढे आली. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी हा सामना आता होऊ शकत नाही, हा प्रचार केला गेला. राजकीय डावपेच म्हणून राहुल गांधी यांची प्रतिमा जितकी डागाळता येईल तितका टोकाचा प्रयत्न सोशल मीडियातून झाला. परिणामी काँग्रेस बहुतांश वेळा बचावात्मक प्रतिक्रियांमध्ये गुरफटून राहिली. नरेंद्र मोदींचा करिष्मा आणि लाटेवर जिकडे तिकडे कमळ उमलताना दिसले. निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासने आणि विरोधकांवर केलेल्या कठोर प्रहाराने भाजपाला समर्थन मिळत गेले. अपेक्षा उंचावल्या. जणू अपेक्षांची क्रांतीच झाली. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ, विदेशात दडवून ठेवलेले काळे धन शंभर दिवसात परत आणू, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करू या लोकाभिमुख घोषणांबरोबरच आतंकवाद, नक्षलवाद आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काँग्रेसला घेरले होते. जनतेनेही भाजपाला भरभरून मते दिली. प्रचंड बहुमताचे सरकार दिल्लीत विराजमान झाले. नक्कीच त्याचे नरेंद्र मोदी हेच मुख्य शिलेदार होते. किंबहुना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला नव्हे तर मोदींना मतदान झाले होते. आजही जे काही वलय आहे ते मोदींभोवतीच. विशेषत: १८ ते २५ या वयोगटातील मतदारांनी भाजपाला साथ दिली. अजूनही हा वयोगट कमी-अधिक प्रमाणात मोदींच्या बरोबर असल्याचे दिसते. अनेक कुटुंबात आजोबा आणि वडिलांनी काँग्रेसला मतदान केले, परंतु मुलाचे मतदान भाजपाला झाले होते. हे भाजपाचे वर्तमान पाच वर्षांत बदलेल, असे सुरुवातीच्या काळात कोणालाही वाटले नाही. सुरुवातीच्या वर्षात तर विरोधक संपले असेच चित्र उमटत राहिले. एकामागून एक राज्य जिंकल्यानंतर काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा झाली. परंतु लोकशाहीत सरकार जितके स्थिर हवेत तितकेच विरोधकही प्रबळ असले पाहिजेत. विशेष म्हणजे ही व्यवस्था निर्माण करण्याचे काम चार वर्षात जनतेनेच केले.

नुकत्याच झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली. देश एकतर्फी होणार नाही, याची काळजी जनतेने घेतली आणि प्रगल्भ लोकशाहीचे दर्शन घडविले. आता राफेलच्या मुद्यावर लोकसभेत रणकंदन सुरू आहे. भ्रष्टाचार हा मुद्दा समोर ठेवून भाजपाने सत्ता काबीज केली होती. याच मुद्यावर काँग्रेस भाजपावर थेट आरोप करीत आहे. सरकारने गडबड केलेली नाही, तर मग संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीला संमती का देत नाही, हा सवाल आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू राहतील, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आक्रमक भूमिकेवरून बचावात्मक पवित्र्यामध्ये आणायला काँग्रेसने भाग पाडले आहे. पंतप्रधानांनी आपल्या मुलाखतीत स्वत: घेतलेले निर्णय योग्य कसे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने नोटाबंदी हा जनतेला दिलेला झटका नव्हता. सर्जिकल स्ट्राईक, कर्जमाफी, जीएसटी, आरबीआय गव्हर्नरचा राजीनामा या सर्वच मुद्यांवर खुलासा करणारी उत्तरे दिली. या उलट रोजगार, काळा पैसा, जीएसटी, नोटाबंदीचे परिणाम, सीमेवरील शहीद जवान, नक्षलवादाने घेतलेले बळी आणि राफेलचा मुद्दा पुढे करून काँग्रेसने मुलाखतीवर पाणी फेरले. दीड तास चाललेली पंतप्रधानांची मुलाखत आणि काँग्रेसची दहा मिनिटांची पत्रपरिषद ही तुलना केली तर काँग्रेस आपले मुद्दे पोहोचविण्यात यशस्वी ठरली. नक्कीच वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार मिळालेला नाही. काळा पैसा शंभर दिवसात परत आलेला नाही. १५ लाख खात्यात जमा झालेले नाहीत. नोटाबंदीने करभरणा वाढला असला तरी काळा पैशाची निर्मिती थांबली नाही. डीजिटल व्यवहाराचे वारेही पूर्वीप्रमाणेच मंद वाहत आहेत. अगदीच नोटाबंदीने प्रारंभाला खुश झालेला सर्वसामान्य वर्गही नेमका काय फायदा झाला, हे विचारत आहे. राफेलच्या मुद्यावर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला सरकार सामोरे जाताना दिसत नाही. त्याला आव्हान देत राहुल गांधींचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसतो.  

सरकारे येतील आणि जातील. पक्ष बदलतील. देश एकसंघ राहिला पाहिजे. लोकशाही दिवसेंदिवस अधिक मजबूत झाली पाहिजे. त्यासाठी सरकार जितके स्थिर हवे, तितकेच विरोधकही प्रबळ असले पाहिजेत. सन २०१४ च्या निवडणुकीनंतर विरोधक संपले, हा अहंकार लोकशाहीला मारक होता. आता राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांची गरज वाटू लागली आहे. एकहाती सत्ता मिळविलेल्यांनाही लोकशाही आघाडी हवी आहे. एकतर्फी, एककल्ली कारभार न ठेवता देशातील अन् राज्यातील कारभारी वेगवेगळे करण्याची किमया मतदारांनी केली. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी या लढाईचा निकाल कोणताही येवो, परंतु ती लढाई तोलामोलाची व्हावी, एकतर्फी नसावी, हेच सदृढ लोकशाहीचे सूत्र आहे. अर्थात राहुल गांधींकडून होणारे कठोर प्रहार आणि सरकारकडून येणारे समर्पक उत्तर हेच अपेक्षित आहे अन् ते काहीअंशी घडते आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी