शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

आजचा अग्रलेख: पडके दात, बोथट नखे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 09:31 IST

महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या लोकायुक्त विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह आजी-माजी मंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येतील.

महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या लोकायुक्त विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह आजी-माजी मंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येतील. महाराष्ट्राने लोकायुक्त कायदा १९७१ मध्येच केला होता. त्याच्या एकच वर्ष आधी ओडिशाने लोकायुक्त कायद्यास मंजुरी दिली होती; मात्र ओडिशात त्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास १९८३ साल उजाडले होते. त्यामुळे महाराष्ट्र हेच खऱ्या अर्थाने लोकायुक्त कायदा करणारे आणि मुख्यमंत्री व आजी-माजी मंत्र्यांना त्याच्या कक्षेत आणणारे पहिले राज्य आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे तेव्हाचे आणि आताचे राज्यकर्ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत; परंतु कायदे केवळ मंजूर होऊन भागत नसते, तर त्यांची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण असते. 

विधानसभेने जे लोकायुक्त विधेयक मंजूर केले ते या कसोटीवर तपासून बघणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यमान व प्रस्तावित कायद्यातील फरक, तसेच प्रस्तावित कायद्यातील तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे. विद्यमान कायद्यान्वये लोकायुक्तांना सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची केवळ शिफारस करता येत होती. प्रस्तावित कायद्यांतर्गत, दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई सुरु करण्याचे थेट निर्देश लोकायुक्त राज्य सरकारी तपास संस्थांना देऊ शकतील. सरकारी अधिकाऱ्यांना समन्स धाडण्याचे अधिकारही प्रस्तावित कायद्याने लोकायुक्तांना बहाल केले आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या जनप्रतिनिधीच्या विरोधातील तक्रारीच्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्यास, त्या जनप्रतिनिधीचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे, तसेच त्याची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकारही लोकायुक्तांना देण्यात आले आहेत. कायद्यातील हे बदल निश्चितच स्वागतार्ह; मात्र मुख्यमंत्री व आजी-माजी मंत्र्यांना लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत आणताना, अनावश्यक संरक्षण देणे अनाकलनीय आहे. 

प्रस्तावित कायद्यातील तरतुदीनुसार, लोकायुक्त मुख्यमंत्र्यांच्या विरोधात चौकशी तर सुरु करू शकतील; पण त्यासाठी विधानसभेची परवानगी लागेल. तशा परवानगीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी प्रस्ताव सदर करावा लागेल आणि तो दोन-तृतियांश बहुमताने मंजूर व्हावा लागेल! एखादी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर आहे याचा अर्थच त्या व्यक्तीकडे विधानसभेत बहुमत आहे. अशा व्यक्तीच्या विरोधात दोन-तृतियांश बहुमताने प्रस्ताव मंजूर होण्याची अपेक्षा करणे, म्हणजे बैलाने दूध देण्याची अपेक्षा करणेच नव्हे का? शिवाय मुख्यमंत्र्यांची चौकशी गुप्त असेल आणि भ्रष्टाचाराचे आरोप अंतर्गत सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेसंदर्भातील असतील, तर त्या आरोपांची चौकशीही लोकायुक्तांना करता येणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या विद्यमान वा माजी मंत्र्याच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्यापूर्वी लोकायुक्तांना राज्यपाल अथवा राज्यपालांद्वारा नियुक्त मंत्री समूहाकडून अनुमती घ्यावी लागेल. सध्याच्या राजकीय वातावरणात अशी अनुमती मिळणे जवळपास अशक्यप्रायचा मिळालीच तर विरोधी पक्षात असलेल्या माजी मंत्र्यांच्या संदर्भातच मिळू शकेल. त्यामुळे या तरतुदीचा वापर विरोधी नेत्यांना गप्प बसविण्यासाठी अथवा गळाला लावण्यासाठी होण्याचीच शक्यता अधिक! 

म्हणजेच नोकरशहांना लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत आणताना, राजकीय नेत्यांसंदर्भात मात्र केवळ तसा बनावच करण्यात आला आहे, हे स्पष्टच दिसते. हा कायदा अण्णा हजारे यांच्या आग्रहास्तव करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अण्णांनी या विधेयकाच्या मसुद्याचे स्वागतही केले होते. या कायद्यामुळे लोकांना खऱ्या लोकशाहीचा अनुभव येईल व सत्तेचे विकेंद्रीकरण होईल, असे ते म्हणाले होते. प्रत्यक्षात कायद्यात ज्याप्रकारे राजकीय नेत्यांना संरक्षण देण्यात आले आहे, ते बघू जाता अण्णांनी त्यांच्या त्या विधानाचा नक्कीच पुनर्विचार करायला हवा. 

काही वर्षांपूर्वी अण्णांच्याच आग्रहास्तव माहिती अधिकाराचा कायदा करण्यात आला होता. तो अस्तित्वात येताच भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होईल, अशी वातावरण निर्मिती त्यावेळी झाली होती. प्रत्यक्षात काय झाले? भ्रष्टाचाराचे निर्मुलन तर सोडाच, त्या कायद्याचा वापर करीत, भ्रष्टाचाऱ्यांना 'ब्लॅकमेल' करून पैसा गोळा करणारी 'व्यावसायिक माहिती अधिकार कार्यकत्यांची एक नवीच जमात गावोगावी उदयास आली! नव्या कायद्याचेही तसे काही होऊ नये, म्हणजे मिळवली। थोडक्यात काय, तर गवगवा झालेला नवा वाघही प्रत्यक्षात पडक्या दातांचा अन बोथट नखांचाच दिसतो!

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन