शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

लोकमत संपादकीय - 'राफेलचे गूढ कायमच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 06:33 IST

बोफोर्सचा बहुचर्चित खटला जसा अनेक वर्षे चालला व काही एक न होता थांबला तसाच याही प्रकरणाचा शेवट होईल.

फ्रान्सकडून खरेदी करावयाच्या राफेल या लढाऊ विमानाच्या एकूणच सौद्यात तपशीलवार लक्ष ठेवायला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नकार हा मोदी सरकारचा विजय नाही. ही चौकशी रीतसर चालेल व ती पूर्णही होईल. मात्र तो मंत्रिमंडळाच्या व सरकारच्या अधिकार क्षेत्रात येणारा विषय असल्याने आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, एवढेच न्यायालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडण्यात अर्थ नाही. हा सौदा मोदी सरकारने फ्रान्सच्या सरकारशी आरंभी केला तेव्हा त्यात कुणीही मध्यस्थ नव्हता. त्या वेळी ही विमाने देशाला प्रत्येकी ५०० कोटी रुपयांना मिळणार होती. अंबानींचा त्यात शिरकाव झाल्यानंतर त्यांची प्रत्येकी किंमत १६०० कोटी रुपये झाली आहे. पूर्वी १२६ विमानांसाठी झालेला हा सौदाही आता २६ विमानांवर आला आहे. ही विमाने संरक्षण खात्याची गरज म्हणून विकत घेण्याचा व्यवहार मनोहर पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री असताना झाला. आता त्यांची जागा निर्मला सीतारामन् यांनी घेतली आहे. याच काळात या विमानांच्या किमती तीनपटींहून अधिक वाढल्याचे व त्यांची संख्या कमी झाल्याचे देशाला कळले आहे. स्वाभाविकच त्यात काही काळेबेरे असल्याचा संशय व आरोप विरोधी पक्षांनी सरकारवर केला. शिवाय देशातील कायदेतज्ज्ञ माणसेही त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागायला गेली. या सौद्याच्या प्रत्येक टप्प्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली व्हावी, अशी त्यांची मागणी होती. परंतु संरक्षण खाते व त्याचे आर्थिक व्यवहार हा सरकारचा अधिकार असून आपण त्याचा संकोच करू इच्छित नाही, असे त्यावर त्या न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान या व्यवहाराची रीतसर चौकशी सुरू आहे आणि संसदेत त्यावर गदारोळही होत आहे.

 

विरोधकांच्या संशयाला बळकटी देणारी विधाने फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलेंडो यांनी केली आहेत आणि आताचे तिथले मॅक्रॉन सरकार जनक्षोभात अडकले आहे. त्यामुळे या प्रकरणाची शंका यावी असे त्यात भरपूर घडले आहे. आपण त्यात लक्ष घालणार नाही ही न्यायालयाची आताची भूमिका आहे. यातील संशयास्पद बाबी व मध्यस्थांचा हस्तक्षेप यावर आक्षेप घेणाऱ्या अनेकांवर अनिल अंबानी यांनी कोट्यवधी रुपयांचे अब्रुनुकसानीचे दावेही या काळात लावले आहेत. परिणामी त्यांच्याविषयीही देशात संशय उत्पन्न झाला आहे. सौदा पूर्ण होईल आणि विमाने देशात दाखल होतील तेव्हाही त्याविषयीचे कज्जे-खटले न्यायालयात चालणारच आहेत. बोफोर्सचा खटला जसा अनेक वर्षे चालला व काही एक न होता थांबला तसाच याचाही शेवट होईल. मात्र त्या सौद्याने राजीव गांधींच्या सरकारचा बळी घेतला ही बाब विसरता येणारी नाही. नुकत्याच पार पडलेल्या पाच विधानसभांच्या निवडणुकीत मोदी सरकारच्या पक्षाचा पार धुव्वा उडाला त्याचे एक महत्त्वाचे कारण राफेल विमानांविषयी जनतेच्या मनातील संशय हेही आहे. त्यातच ‘आम्ही या विमानांच्या किमती कशा वाढल्या हे देशाला व न्यायालयाला सांगणार नाही’ असे म्हणून मोदी सरकारने हा संशय आणखी गडद करण्याचेच काम केले आहे. या निकालातील एका उल्लेखाने सरकार चांगलेच तोंडघशी पडले आहे. राफेल विमानांच्या किमतीची माहिती ‘कॅग’ला दिली व त्यावर त्यांनी दिलेल्या अहवालाची संसदेच्या लोकलेखा समितीने छाननीही केली, असा उल्लेख न्यायालयाने केला आहे. तो वस्तुस्थितीला धरून नाही, कारण असा कोणताही अहवाल अद्याप दिला गेलेला नाही. त्यामुळे सरकारने न्यायालयाची दिशाभूल करून ‘क्लीन चिट’ मिळविली, अशा नव्या आरोपाचा बार विरोधकांनी उडविला. याला राजकीय पातळीवर उत्तर देणे कठीण असल्याने सरकारने न्यायालयानेच चूक केली, असा दावा करत निकालपत्रात दुरुस्ती करून घेण्यासाठी अर्जही केला आहे. याने संशय दूर होण्याऐवजी तो आणखी वाढला आहे. भारत हा लोकशाही देश आहे आणि त्याच्या नागरिकांना सरकारचे सर्व व्यवहार समजून घेण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यामुळे या संशयाला जसा शेवट नाही तसा त्याच्याविषयी चालणाºया कोर्टकचेºयांनाही शेवट नाही. अशा व्यवहाराविषयी आपले नागरिक आता सावध आणि जागरूक झाले आहेत. त्यामुळे अशा व्यवहारात सरकारनेच स्वत:ला पारदर्शक राखणे व संसद आणि जनता यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.बोफोर्सचा बहुचर्चित खटला जसा अनेक वर्षे चालला व काही एक न होता थांबला तसाच याही प्रकरणाचा शेवट होईल. मात्र त्या सौद्याने राजीव गांधींच्या सरकारचा बळी घेतला ही बाब विसरता येणारी नाही.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील