शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

लोकमत संपादकीय - अफगाणी नाट्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 03:48 IST

निकालाला आव्हान देण्याच्या अब्दुल्ला यांच्या घोषणेमागील गोम ही आहे.

प्रारंभापासूनच वादग्रस्त ठरलेल्या अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रारंभिक निकाल अखेर रविवारी घोषित झाला असला, तरी त्यामुळे वाद निवळण्याऐवजी वाढण्याचीच चिन्हे दिसत आहेत. प्रारंभिक निकालानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यापाठोपाठ द्वितीय क्रमांकाची मते घेतलेले विद्यमान मुख्य कार्यकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी या निकालाला आव्हान देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी २८ सप्टेंबरला मतदान झाले होते. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारंभिक निकालानुसार, घनी यांना ५०.६४ टक्के, तर अब्दुल्ला यांना ३९.५२ टक्के मते मिळाली आहेत. वस्तुत: उभयतांना मिळालेल्या मतांमध्ये खूप फरक आहे; मात्र अफगाणिस्तानातील निवडणूक प्रक्रियेनुसार, अंतिम निकालात घनी यांची ०.६५ टक्के मते जरी कमी झाली तरी, त्यांची मतांची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी होते आणि मग मतदानाची आणखी एक फेरी अनिवार्य ठरते.

निकालाला आव्हान देण्याच्या अब्दुल्ला यांच्या घोषणेमागील गोम ही आहे. अंतिम निकाल जो काही लागायचा तो लागेल; परंतु त्यामुळे अफगाणिस्तानातील स्थिती चिघळण्याचेच अशुभ संकेत मिळत आहेत. मुळात भारत सरकार आणि स्वत: अशरफ घनी वगळता इतर कुणीही या निवडणुकीसंदर्भात फार उत्सुक नव्हते. अफगाण जनताही निवडणुकीसंदर्भात फार उत्साही नव्हती. एकूण ९६ दशलक्ष मतदारांपैकी अवघ्या १८ दशलक्ष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. अफगाणिस्तानातील कट्टरतावाद संपुष्टात आणून लोकशाही शासनव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतलेल्या अमेरिकेला तर जणू काही या निवडणुकीशी काही घेणेदेणेच नव्हते. तत्कालीन सोव्हिएत रशियापाठोपाठ अफगाणिस्तानात हात पोळून घेतलेल्या अमेरिकेला आता त्या देशातून बाहेर पडण्याची प्रचंड घाई झाली आहे. त्यासाठी अमेरिकेने चक्क तालिबानसोबतच वाटाघाटी सुरू केल्या आहेत. त्या एकदाच्या संपवून अमेरिकेला अफगाणिस्तानातून बाहेर पडायचे आहे. अमेरिका अफगाणिस्तानात शिरल्यापासून सत्तेत आलेले प्रत्येक अफगाण सरकार अमेरिकेच्या हातातले बाहुले होते. त्यामुळे एकदा का अमेरिका बाहेर पडली, की तालिबान पुन्हा अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. परिणामी राष्ट्राध्यक्षपदी कुणीही निवडून आले तरी काहीही फरक पडणार नाही, हे अमेरिकेला पुरते ठाऊक आहे. त्यामुळेच त्या देशाने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत फार रस घेतला नाही. या संपूर्ण नाट्यात घायकुतीला आला आहे तो भारत! अमेरिकेने तालिबानला सत्तेतून बेदखल केल्यानंतर, भारताने अफगाणिस्तानात खूप मोठी गुंतवणूक केली. त्या देशाच्या संसदेची नवी इमारत बांधून देण्यापासून ते धरणे, महामार्गांच्या निर्मितीपर्यंत अनेक बाबतीत भारताचा सहभाग आहे. त्यासाठी बराच पैसाही भारताने ओतला आहे. जोपर्यंत तालिबानचा पुरता नि:पात होणार नाही, तोपर्यंत तरी अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडणार नाही आणि दरम्यानच्या काळात त्या देशाच्या नव्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलून, अफगाण जनतेची सहानुभूती प्राप्त करीत, आपण पाकिस्तानला शह देऊ शकू, ही भारताची रणनीती होती. त्यात काही चुकीचे होते, अशातला भाग नाही. पूर्वी अफगाणिस्तानसोबत भारताचे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध होतेच! अफगाण जनतेलाही भारताबद्दल एक सुप्त आकर्षण होते; मात्र मधल्या काही दशकांत इस्लामी कट्टरतावाद वाढला आणि अफगाणिस्तान हे जणू काही भारताचे शत्रू राष्ट्र बनले. त्यामध्ये अर्थातच पाकिस्तानची मोठी भूमिका होती. हे कालचक्र उलटे फिरविण्याचा प्रयत्न भारत करीत होता; मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे भारताच्या दृष्टीने सारेच मुसळ केरात जाऊ बघत आहे.

अमेरिका अफगाणिस्तानात शिरल्यापासून सत्तेत आलेले प्रत्येक अफगाण सरकार अमेरिकेच्या हातातले बाहुले होते. त्यामुळे एकदा का अमेरिका बाहेर पडली, की तालिबान पुन्हा अफगाणची सत्ता ताब्यात घेणार, ही काळ्या दगडावरची रेघ.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तान