शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

Lok Sabha Election Result 2024 : अस्मितेने कधी कुणाचे पोट भरते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 10:30 IST

Lok Sabha Election Result 2024 : जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले की अस्मितांचे राजकारण थिटे पडते, हाच या निकालाचा निष्कर्ष होय! 

- डॉ. वसंत भोसले (संपादक, लोकमत कोल्हापूर)

धार्मिक भावनांची झूल पांघरून, पोटापाण्याचे बाकी प्रश्न अस्तित्वातच नाहीत, अशी भूमिका घेऊन सातत्याने सुडाचे राजकारण करता येत नाही.  अयोध्येत नव्याने बांधलेल्या राममंदिर परिसरातील पाच लोकसभा मतदारसंघांत दारुण पराभव झाल्यावर हे भाजपच्या ध्यानी आले असावे.  लोकशाहीत मतदारांना गृहीत धरून फार काळ व्यक्तीकेंद्रित सत्ताकारण करता येत नाही.  इंदिरा गांधी यांनी अशीच चूक केली होती. त्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी त्यांनी आणीबाणीसारखे टोकाचे पाऊल उचलले तेव्हाही लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी सर्वसमावेशक चळवळ उभी राहिली. त्यातून सत्तांतर घडले. त्यासाठी केलेल्या वैचारिक तडजोडीचा बांध फुटला आणि पुन्हा राष्ट्रहितासाठी त्याच मतदारांनी  इंदिरा गांधींना सत्ता दिली. हा इतिहास आजच्या राजकीय नेत्यांच्या नजरेसमोर घडलेला. तेव्हाही  रोजच्या जीवनमरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

१४० कोटी जनतेच्या भुकेचे प्रश्न सोडविणारा उत्पादक शेतकरी, कष्टाने शिक्षण घेऊन अधिक चांगल्या जीवनाची स्वप्ने पाहणारे बेरोजगारांचे तांडे, रोजगाराच्या शोधातले कष्टकरी मजूर, शेतमाल पिकविणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून  सुखवस्तू मध्यमवर्गीय ग्राहकांच्याच हितासाठी घेतलेल्या अशास्त्रीय निर्णयांशी सत्ताधाऱ्यांचा काहीच संबंध नाही, असे कसे?  देशाची अर्थव्यवस्था किती लाखो-कोटीची होते याचा वडापाव खाऊन भूक भागविणाऱ्याला का कळवळा वाटावा? महाराष्ट्राचे उदाहरण घेतले तर सोयाबीन, कांदा आणि कापूस ही प्रमुख पिके. शिवाय कडधान्ये, फळे आणि ऊसही! यापैकी कोणत्या पिकांच्या व्यापारवृद्धीसाठी सरकारने पावले उचलली? सोयाबीन, कापूस आणि कांदा, तांदूळ, साखर आदींच्या आयात-निर्यातीचा घोळ घालून बाजारपेठेची व्यवस्थाच खिळखिळी करून टाकली. अशा शेतकरी वर्गाने हमीभावाची मागणी केली, त्याकडे किती वर्षे दुर्लक्ष करणार? 

 तरुणांना सरकारी नोकर भरतीची दारे बंद. चार वर्षात बेरोजगार होण्यासाठी सैन्यभरती! वरून धार्मिक झुलीआडून एकमेकांच्या धर्मापासून धोका असल्याच्या अफवा. या सगळ्याला फाटा देऊन सर्वसमावेशक धोरणांचा आधार घेत खरेच ‘सबका साथ, सबका विकास’चे नियोजन केले असते तर भाजपला स्वबळावर बहुमत देणारी अठरावी लोकसभा अस्तित्वात आली असती. मध्य प्रदेशात ज्या पक्षाला शंभर टक्के स्वीकारले जाते, त्याच पक्षाला तमिळनाडू शंभर टक्के का नाकारतो?  उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा किंवा पश्चिम बंगालसारख्या बिमारू प्रांताचे प्रश्न कसे सोडवायचे?

कोणताही पक्ष सत्ताधारी असो, त्यांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांना सामोरे जाऊन शाश्वत विकासाचा मार्ग धरला पाहिजे. केवळ धर्म किंवा जातींचा विचार करून मतांचे तात्कालिक राजकारण जरूर साधता येईल, पण ते पुरेसे नाही,   हेच अठराव्या लोकसभेत मतदारांनी दाखवून दिले आहे. दरवेळी वेगळी घोषणा देता येईल. त्यातून धोरणाचे सातत्य राहणार नाही. परिणामी समाजाचे विघटन होऊन मतांचे त्रिशंकूकरणच होत जाईल. जनतेच्या पोटापाण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ आभासी अस्मितांचे राजकारण दीर्घकाळ केले गेले की, त्याचा परिणाम काय होतो, याचा अनुभव भारतातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना या निवडणुकीने दिला आहे. नव्या सत्ताधाऱ्यांनी यातून धडा घ्यावा आणि विरोधात बसणाऱ्यांनीही हा धडा विसरू नये!  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल