शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : धार्मिक ध्रुवीकरणाचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 04:25 IST

भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळवण्यात यश मिळवले. पुलवामा येथील शहीद झालेल्या लष्कराच्या जवानांच्या नावे स्वत: पंतप्रधान मोदींनी मते मागितली. कधी नव्हे ते लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले गेले. हे सारे या देशात प्रथमच घडले. यापूर्वी असे कधी पाहावयास मिळाले नव्हते.

- पृथ्वीराज चव्हाण(माजी मुख्यमंत्री)मागील २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला अभूतपूर्व यश मिळाले होते. आजच्या निकालाचे कल पाहता भारतीय जनता पक्षाला २0१४ सारखाच विजय मिळाल्याचे दिसून येत आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन.२0१४-१९ या पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कारकिर्दीत तीन मुद्दे उल्लेखनीय ठरतात. १) नोटाबंदीसारख्या अविचारी निर्णयामुळे आर्थिक आघाडीवर देशाची झालेली अपरिमित हानी, २) सामाजिक क्षेत्रात धर्मा-धर्मामध्ये आणि जातींमध्ये वाढलेला तणाव आणि ३) राजकीय विरोधकांना शत्रू ठरवणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे व वेळप्रसंगी सीबीआय, ईडीसारख्या संस्थांमार्फत त्रास देणे. भ्रष्टाचारमुक्त भारत, सर्वांगीण विकास आणि प्रशासनातील पारदर्शकता या प्रमुख मुद्द्यांवर मोदी सरकार निवडून आले होते. परंतु संसदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवूनदेखील सर्वच आघाड्यांवर हे सरकार सपशेल अयशस्वी ठरले.२0१४ साली मोदी सरकारला ३१ टक्के मते मिळाली होती तर उर्वरित ८९ टक्के मते विरोधी पक्षांमध्ये विखुरली गेली. मोदी सरकारचे अपयश आणि विरोधकांची विभागली गेलेली मते या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकीची रणनीती आखली होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक जाहीरनामा आणि लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्षवादी पक्षांची व्यापक आघाडी हे महत्त्वाचे प्रयत्न होते. त्याचसोबत मागील पाच वर्षांत उद्ध्वस्त झालेली कृषी अर्थव्यवस्था, बेरोजगारी हे सर्व विषय जनतेसमोर घेऊन जाताना काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना चांगला निकाल अपेक्षित होता.परंतु, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळवण्यात यश मिळवले. पुलवामा येथीलशहीद झालेल्या लष्कराच्या जवानांच्या नावे स्वत: पंतप्रधान मोदींनी मते मागितली. कधी नव्हे ते लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले गेले.प्रज्ञासिंह ठाकूर यासारख्या बॉम्बस्फोटातील आरोपीला पक्षात घेऊन तिकीट देण्यात आले आणि त्यांमार्फत शहिदांचा अपमान करण्यात आला. विखारी वक्तव्ये करून धार्मिक ध्रुवीकरणाचा पुरेपूर प्रयत्न केला. या सगळ्याची वेगळी प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण तसे झाले नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.याउलट काँग्रेस पक्षाने राफेल खरेदीतील भ्रष्टाचार, बेरोजगारी, कृषी अर्थव्यवस्था आणि शेतकरी आत्महत्या अशा प्रमुख मुद्द्यांवर भर दिला. प्राथमिक आकड्यांवरून हेदेखील दिसून येत आहे की महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपला झाला. आता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची जबाबदारी अधिकच वाढली आहे. या पराभवाचे आत्मचिंतन करून येणाऱ्या काळात जनतेसमोर अधिक प्रभावीपणे कसे जाता येईल याची रणनीती पक्षाला स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन ठरवावी लागेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९