शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : धार्मिक ध्रुवीकरणाचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 04:25 IST

भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळवण्यात यश मिळवले. पुलवामा येथील शहीद झालेल्या लष्कराच्या जवानांच्या नावे स्वत: पंतप्रधान मोदींनी मते मागितली. कधी नव्हे ते लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले गेले. हे सारे या देशात प्रथमच घडले. यापूर्वी असे कधी पाहावयास मिळाले नव्हते.

- पृथ्वीराज चव्हाण(माजी मुख्यमंत्री)मागील २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला अभूतपूर्व यश मिळाले होते. आजच्या निकालाचे कल पाहता भारतीय जनता पक्षाला २0१४ सारखाच विजय मिळाल्याचे दिसून येत आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन.२0१४-१९ या पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कारकिर्दीत तीन मुद्दे उल्लेखनीय ठरतात. १) नोटाबंदीसारख्या अविचारी निर्णयामुळे आर्थिक आघाडीवर देशाची झालेली अपरिमित हानी, २) सामाजिक क्षेत्रात धर्मा-धर्मामध्ये आणि जातींमध्ये वाढलेला तणाव आणि ३) राजकीय विरोधकांना शत्रू ठरवणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे व वेळप्रसंगी सीबीआय, ईडीसारख्या संस्थांमार्फत त्रास देणे. भ्रष्टाचारमुक्त भारत, सर्वांगीण विकास आणि प्रशासनातील पारदर्शकता या प्रमुख मुद्द्यांवर मोदी सरकार निवडून आले होते. परंतु संसदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवूनदेखील सर्वच आघाड्यांवर हे सरकार सपशेल अयशस्वी ठरले.२0१४ साली मोदी सरकारला ३१ टक्के मते मिळाली होती तर उर्वरित ८९ टक्के मते विरोधी पक्षांमध्ये विखुरली गेली. मोदी सरकारचे अपयश आणि विरोधकांची विभागली गेलेली मते या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकीची रणनीती आखली होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक जाहीरनामा आणि लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्षवादी पक्षांची व्यापक आघाडी हे महत्त्वाचे प्रयत्न होते. त्याचसोबत मागील पाच वर्षांत उद्ध्वस्त झालेली कृषी अर्थव्यवस्था, बेरोजगारी हे सर्व विषय जनतेसमोर घेऊन जाताना काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना चांगला निकाल अपेक्षित होता.परंतु, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळवण्यात यश मिळवले. पुलवामा येथीलशहीद झालेल्या लष्कराच्या जवानांच्या नावे स्वत: पंतप्रधान मोदींनी मते मागितली. कधी नव्हे ते लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले गेले.प्रज्ञासिंह ठाकूर यासारख्या बॉम्बस्फोटातील आरोपीला पक्षात घेऊन तिकीट देण्यात आले आणि त्यांमार्फत शहिदांचा अपमान करण्यात आला. विखारी वक्तव्ये करून धार्मिक ध्रुवीकरणाचा पुरेपूर प्रयत्न केला. या सगळ्याची वेगळी प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण तसे झाले नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.याउलट काँग्रेस पक्षाने राफेल खरेदीतील भ्रष्टाचार, बेरोजगारी, कृषी अर्थव्यवस्था आणि शेतकरी आत्महत्या अशा प्रमुख मुद्द्यांवर भर दिला. प्राथमिक आकड्यांवरून हेदेखील दिसून येत आहे की महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपला झाला. आता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची जबाबदारी अधिकच वाढली आहे. या पराभवाचे आत्मचिंतन करून येणाऱ्या काळात जनतेसमोर अधिक प्रभावीपणे कसे जाता येईल याची रणनीती पक्षाला स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन ठरवावी लागेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९