शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Lok Sabha Election 2019 : कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:39 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये रणधुमाळी सुरु झाली आहे. पक्षांतरे आणि आयाराम-गयाराम नाट्ये घडू लागली ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये रणधुमाळी सुरु झाली आहे. पक्षांतरे आणि आयाराम-गयाराम नाट्ये घडू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांमध्ये मतमतांतरे व्यक्त होत आहेत. एक अतीशय मार्मिक संदेश सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्यानिष्ठावंत कार्यकर्तेहो, तुम्ही फक्त हाती तंबोरा घ्या...या संदेशातून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची नावे घेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची अगतिकता प्रभावीपणे मांडली आहे. काँग्रेसमधून कुणी भाजपामध्ये जाते आहे, भाजपामधून कुणी काँग्रेसमध्ये तर कुणी मनसेमधून शिवसेनेमध्ये जात आहे. राष्टÑवादीचा नेता भाजपाच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. पक्ष, विचार, कार्य याच्याशी काहीही देणेघेणे नसलेली ही मंडळी केवळ स्वार्थी आणि संधीसाधू असल्यासारखी वागाताना दिसत आहे.महाराष्टÑाची सत्ता मोजक्या १००-१२५ घराण्यांभोवती केंद्रित असल्याचा आरोप नेहमी होत असतो. ही घराणीदेखील नातेसंंबंधाने जोडलेली आहेत. एका घरातील सदस्य हे वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये सक्रीय असतात, त्यामुळे केंद्र व राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता येवो, या मंडळींना कधीही अडचण येत नाही. त्यांच्या सहकारी संस्था, शिक्षण संस्था, उद्योग-व्यापार बिनबोभाट सुरु असतो. अलिकडे समाजमाधम्यांवर ही घराणी आणि त्यांच्या नातेसंबंधांवर प्रकाशझोत टाकणारी माहिती प्रसारीत होत असते. आणि शेवटी कार्यकर्त्यांना आवाहन केलेले असते की, तुम्हाला मोदी, गांधी, पवार, ठाकरे हे कुणी ओळखत नाही, तरीही तुम्ही त्यांच्यासाठी भांडतात, वाद घालतात. स्वत:च्या पोटाचे आधी बघा आणि मगच राजकारणात पडा...निवडणुका आल्या की, हा संदेश हमखास प्रसारीत होतो.अर्थात आता नेत्यांप्रमाणे कार्यकर्तेदेखील हुशार झाले आहेत. नेते टोप्या बदलतात, मग कार्यकर्त्यांनी बदलल्या तर काय हरकत आहे, असे म्हणत दिवसा एका तर रात्री दुसऱ्याच उमेदवारासाठी काम केले जाते. रात्री ढाब्यावर प्रतिस्पर्धी उमेदवाराला रणनीती अवगत केली जाते. अर्थात त्यासाठी पुरेसा मोबदला घेतला जातो, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारदेखील सावध आणि चाणाक्ष झाले आहेत. कार्यकर्त्यांकडे किती अधिकार द्यायचे याची मर्यादा आखली गेली आहे. नातेवाईक, मित्र हा महत्त्वाचा गट, त्यानंतर संस्थेमधील कर्मचारी आणि नंतर कार्यकर्ते अशा क्रमाने जबाबदारीचे वाटप केले जाते.राजकारण हे सेवा करण्याचे साधन आहे, असे तत्त्वज्ञान अलिकडे कोणी मनावर घेत नाही. ना नेते ना कार्यकर्ते. त्यामुळे पक्षांतरावर तात्पुरती टीका होते आणि नंतर धूळ खाली बसते तसे वातावरण पूर्ववत होते.यातून राजकारणाचा दर्जा, विश्वासार्हता कमी होत आहे, याचे सोयरसूतक मात्र कुणाला राहिलेले नाही. लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रामाणिक, तळमळीचे लोकप्रतिनिधी नसतील, तर ते देश आणि समाजाच्यादृष्टीने हानीकारक ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव