शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

...ही तर गैरमार्गाची खरी सुरुवात

By किरण अग्रवाल | Updated: March 28, 2019 09:11 IST

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष फार पूर्वीपासूनच लागले होते हे खरे; पण मातब्बरांकडून स्वकीयांना धक्के देत पक्षांतरे घडून येऊ लागल्याने व नाकाबंदीमध्ये नोटांनी भरलेल्या गोण्या व मद्याच्या बाटल्या आदी सापडू लागल्याने आता खरी धुळवड उडून सुरुवात होऊन गेल्याचे म्हणता यावे.

 

किरण अग्रवाल

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष फार पूर्वीपासूनच लागले होते हे खरे; पण मातब्बरांकडून स्वकीयांना धक्के देत पक्षांतरे घडून येऊ लागल्याने व नाकाबंदीमध्ये नोटांनी भरलेल्या गोण्या व मद्याच्या बाटल्या आदी सापडू लागल्याने आता खरी धुळवड उडून सुरुवात होऊन गेल्याचे म्हणता यावे. विशेषत: ही सुरुवातच आहे, ‘आगे आगे देखो, होता है क्या’, असेही म्हटले जात असल्याने काय काय घडणार या निवडणुकीत आणि कुठे नेऊन ठेवणार आपल्या आदर्श लोकशाही प्रक्रियेला, याची चिंताच बाळगली जाणे स्वाभाविक ठरावे.लोकशाहीचा उत्सव म्हणवणाऱ्या निवडणुकीचा बिगुल वाजून त्यासंबंधीच्या पहिल्या चरणाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या सुरुवातीच्या काळातच राज्यात मातब्बर राजकीय घराण्यातील डॉ. सुजय विखे पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सारख्यांनी आपापल्या पक्षांचे बोट सोडून भाजपाचा झेंडा हाती घेतला. अजूनही काही जण त्या वाटेवर तर काही विरोधी पक्षांच्या वाटेवर आहेत, त्यामुळे निष्ठा आणि संधी विषयीची चर्चा घडून येत आहेच, शिवाय आजवरच्या त्यांच्या पक्षाने त्यांना काय कमी दिले याबाबतचा ऊहापोह घडून येणेही क्रमप्राप्त ठरले आहे. अर्थात, राजकारणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरे, बंडखोऱ्या घडून येत असतातच, त्यात तसे नावीन्यही नसते. पण या सांधेबदलामुळे आरोप-प्रत्यारोपांची जी राळ उडते ती निवडणुकीत रंग भरणारीच ठरत असल्याने प्रचाराचा माहौल गडद होण्यास अगर तापून जाण्यात मदत घडून येते. कारण, यात नेत्यांचे निभावून जाणारे असले तरी त्यांच्यासाठी परस्परांशी शत्रुत्व ओढवून बसलेल्या स्थानिक पातळीवरील समर्थक-कार्यकर्त्यांची अडचण झाल्याखेरीज राहत नाही.महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा एरव्हीपेक्षा सक्रिय होतात. यातही पोलिसांच्या नाकेबंदी व वाहन तपासणीसारख्या मोहिमा सुरू होत असल्याने बऱ्याच ठिकाणी ‘अनपेक्षित’पणे काही बाबी आढळून येत आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत देशात सुमारे ५४० कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ, दागदागिने, भेटवस्तू व मद्य आदी माल हस्तगत झाला आहे. महाराष्ट्रातीलच अलीकडची उदाहरणे द्यायची तर अशाच नाकेबंदीतून बीड-अहमदनगर रस्त्यावर एका मर्सिडीज कारमध्ये पाच गोण्या भरून सुमारे दोन कोटींची रक्कम निवडणूक पथकास आढळून आली आहे, तर रामटेक मतदारसंघात ५० लाखांची व यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातही दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम एका वाहनात हस्तगत झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील गुजरात सरहद्दीवर जिलेटिन, डिटोनेटरचा साठा पकडला गेला असून, मालेगावमध्येही १६ धारदार तलवारींसह शस्रसाठा सापडला आहे. याच दरम्यान त्र्यंबकेश्वरनजीकच्या आंबोली घाटात गुजरातमधून आलेल्या वाहनात विदेशी मद्याचा मोठा साठाही पकडण्यात आला. यंत्रणा सक्रिय झाल्याची ही लक्षणे आहेत.अर्थात, आढळलेल्या रोख रकमेचा किंवा स्फोटके, शस्रसाठा वा मद्यसाठ्याचा थेट निवडणुकीशी संबंध नसेलही; परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवळल्या गेलेल्या चौकशी व तपासणीच्या फासामुळे हे प्रकार समोर आले हे नाकारता येऊ नये. यातील शंकेचा अगर शक्यतेचा मुद्दा यामुळेच उपस्थित होतो की, पैसा व मद्यापासूनच्या सर्व हस्तगत बाबींच्या वापराचा निवडणुकीशी राहणारा संबंध नाकारता येणारा नाही. त्यामुळे प्रारंभातच या बाबी हस्तगत होऊ लागल्याचे पाहता, निवडणुकीला खरी सुरुवात होऊन गेल्याचा अर्थ त्यातून काढला जाणे अप्रस्तुत ठरू नये. गैरमार्गाचा अवलंब यापेक्षा वेगळा कोणत्या माध्यमातून घडून येऊ शकतो, असाच प्रश्न यातून उपस्थित व्हावा.यंदा तर अधिकच अटीतटीने निवडणूक लढली जाण्याचे संकेत आहेत. त्यातून ‘यशासाठी काहीपण’ होण्याची किंवा केले जाण्याची शक्यता चर्चिली जात आहे. आचारसंहितेची बंधने कितीही कडक असली तरी त्यातून मार्ग काढणारे कमी नाहीत. त्याचा प्रत्यय आजवरच्या निवडणुकांत अनेकांना आला आहे. तेव्हा, यंदाही ‘उडदामाजी काळे गोरे’ घडून येण्याची शक्यता चिंतेचे कारण ठरून गेली आहे. अशात यंत्रणा अधिक सख्त झाल्या तर गोंधळींना अटकाव बसेलच, शिवाय आपल्याच उज्ज्वल भविष्यासाठी, सुशासनाकरिता व विकासाची स्वप्ने पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या एका मताचे मोल कसे अनमोल आहे व कसल्याही प्रलोभनाला बळी न पडता विचारपूर्वक मताधिकार बजावणे किती गरजेचे आहे, याची जाणीव जागृती घडवली गेली तर त्याचा परिणामही नक्कीच दिसून येऊ शकेल. लोकशाही व्यवस्थेला डागाळू पाहणाऱ्या व गैरमार्गाचा अवलंब करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी तेच गरजेचे आहे.  

टॅग्स :black moneyब्लॅक मनीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक