शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

प्रशासनाची जीवघेणी उदासीनता हानिकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:50 IST

तब्बल बारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांना अटक करून समोर हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली

तब्बल बारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांना अटक करून समोर हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली... ग्रामीण भागातील आणि विशेषत: दुष्काळी भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार अद्यापही प्रशासकीय पातळीवर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने स्वत: दखल घेऊन याविषयी दाखवलेली जागरूकता सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने आशादायक आहे. विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत बोअरवेल खोदण्याचे प्रमाण मोठे आहे. त्या खोदण्याची परवानगी देताना दोन बोअरवेलमध्ये किमान ५०० मीटर अंतर असणे आवश्यक आहे. तसेच या बोअरवेल किती खोल असाव्यात याचेही निकष आहेत; मात्र हे निकष न पाळता मोठ्या प्रमाणावर अगदी कमी अंतर ठेवून बोअरवेल घेतल्या जात आहेत. तसेच विशिष्ट अंतरावर पाणी न लागल्याने आणखी खोलवर जावे लागते. यामुळे लालसर किंवा पिवळसर रंगाचे फ्लोराईडमिश्रित पाणी येते. या पाण्यामुळे फ्लोरोसिस हा आजार होतो. याबाबत न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल करण्यात आली होती.या याचिकेच्या सुनावणीत फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याने हा संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाºयांना अटक करून हजर करण्याचा आदेश देण्यात आला. याबाबतचे जामीनपात्र वॉरंट संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना बजावण्यात आले आहे. नांदेड, चंद्रपूर, बीड, यवतमाळ, लातूर, वाशीम, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, नागपूर आणि भंडारा या जिल्हाधिकाºयांचा यात समावेश आहे. यानिमित्ताने प्रशासकीय उदासीनताही प्रकर्षाने समोर आली आहे. उच्च न्यायालयाचा दर्जा असलेल्या एनजीटीच्या आदेशाकडेही दुर्लक्ष केले जाते, ही बाब गंभीर आहे. एनजीटीला आपण दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही, हे स्वत:हून पाहावेसे वाटते; मात्र प्रशासकीय अधिकाºयांना मात्र याबाबत काहीच वाटू नये, हे विशेष.संबंधित जिल्हाधिकारी जामीन घेऊन अटक टाळतीलही; परंतु निसर्गाची आणि लोकांची झालेली हानी कशी भरून निघणार? एनजीटीने दिलेल्या निर्देशांचे आणि बोअरवेलबाबतच्या निकषांचे पालन का केले जात नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. जागतिक आरोग्य संघटनेने फ्लोरोसिसवर उपाययोजनांसाठी दिलेल्या निधीचा नेमका विनियोग कसा केला गेला, याचेही उत्तर सरकारकडे नाही. पर्यावरणाचा प्रश्न, बेसुमार पाणीउपसा, त्यातील भ्रष्टाचार यावर भूजल सर्वेक्षण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण मंत्रालय कधी गांभीर्याने कृती करणार, हा खरा प्रश्न आहे. फ्लोराईडमिश्रित पाण्यावरील याचिकेच्या निमित्ताने हा विषय चर्चेला आला खरा, परंतु हा विषय एवढाच मर्यादित नाही. आजही शहरांमधील नद्यांची अवस्था काय आहे? मोठमोठ्या बांधकामांना पाणी कुठून येते? तेथील झाडे राजरोसपणे तोडली जातात, त्यांच्या बदल्यात नेमकी कुठे आणि किती झाडे लावली जातात, याचा लेखाजोखा कोणीच मांडत नाही. वायू, ध्वनिप्रदूषण हेही कळीचे मुद्दे आहेत. लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांबाबतही जर प्रशासकीय पातळीवर उदासीनता असेल तर न्याय कुठे मागायचा?