शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

प्रशासनाची जीवघेणी उदासीनता हानिकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:50 IST

तब्बल बारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांना अटक करून समोर हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली

तब्बल बारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांना अटक करून समोर हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली... ग्रामीण भागातील आणि विशेषत: दुष्काळी भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार अद्यापही प्रशासकीय पातळीवर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने स्वत: दखल घेऊन याविषयी दाखवलेली जागरूकता सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने आशादायक आहे. विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत बोअरवेल खोदण्याचे प्रमाण मोठे आहे. त्या खोदण्याची परवानगी देताना दोन बोअरवेलमध्ये किमान ५०० मीटर अंतर असणे आवश्यक आहे. तसेच या बोअरवेल किती खोल असाव्यात याचेही निकष आहेत; मात्र हे निकष न पाळता मोठ्या प्रमाणावर अगदी कमी अंतर ठेवून बोअरवेल घेतल्या जात आहेत. तसेच विशिष्ट अंतरावर पाणी न लागल्याने आणखी खोलवर जावे लागते. यामुळे लालसर किंवा पिवळसर रंगाचे फ्लोराईडमिश्रित पाणी येते. या पाण्यामुळे फ्लोरोसिस हा आजार होतो. याबाबत न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल करण्यात आली होती.या याचिकेच्या सुनावणीत फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याने हा संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाºयांना अटक करून हजर करण्याचा आदेश देण्यात आला. याबाबतचे जामीनपात्र वॉरंट संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना बजावण्यात आले आहे. नांदेड, चंद्रपूर, बीड, यवतमाळ, लातूर, वाशीम, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, नागपूर आणि भंडारा या जिल्हाधिकाºयांचा यात समावेश आहे. यानिमित्ताने प्रशासकीय उदासीनताही प्रकर्षाने समोर आली आहे. उच्च न्यायालयाचा दर्जा असलेल्या एनजीटीच्या आदेशाकडेही दुर्लक्ष केले जाते, ही बाब गंभीर आहे. एनजीटीला आपण दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही, हे स्वत:हून पाहावेसे वाटते; मात्र प्रशासकीय अधिकाºयांना मात्र याबाबत काहीच वाटू नये, हे विशेष.संबंधित जिल्हाधिकारी जामीन घेऊन अटक टाळतीलही; परंतु निसर्गाची आणि लोकांची झालेली हानी कशी भरून निघणार? एनजीटीने दिलेल्या निर्देशांचे आणि बोअरवेलबाबतच्या निकषांचे पालन का केले जात नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. जागतिक आरोग्य संघटनेने फ्लोरोसिसवर उपाययोजनांसाठी दिलेल्या निधीचा नेमका विनियोग कसा केला गेला, याचेही उत्तर सरकारकडे नाही. पर्यावरणाचा प्रश्न, बेसुमार पाणीउपसा, त्यातील भ्रष्टाचार यावर भूजल सर्वेक्षण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण मंत्रालय कधी गांभीर्याने कृती करणार, हा खरा प्रश्न आहे. फ्लोराईडमिश्रित पाण्यावरील याचिकेच्या निमित्ताने हा विषय चर्चेला आला खरा, परंतु हा विषय एवढाच मर्यादित नाही. आजही शहरांमधील नद्यांची अवस्था काय आहे? मोठमोठ्या बांधकामांना पाणी कुठून येते? तेथील झाडे राजरोसपणे तोडली जातात, त्यांच्या बदल्यात नेमकी कुठे आणि किती झाडे लावली जातात, याचा लेखाजोखा कोणीच मांडत नाही. वायू, ध्वनिप्रदूषण हेही कळीचे मुद्दे आहेत. लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांबाबतही जर प्रशासकीय पातळीवर उदासीनता असेल तर न्याय कुठे मागायचा?