शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

आयुष्याची परीक्षा महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:16 IST

सध्या निकाल व प्रवेशांचा ‘सीझन’ सुरू असून गुणांच्या स्पर्धेत कोण आघाडीवर आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परीक्षा कुठलीही असो त्यात फारच कमी जणांना अपेक्षित यश मिळते. अशा स्थितीत काही विद्यार्थी व पालकदेखील खचून जातात.

सध्या निकाल व प्रवेशांचा ‘सीझन’ सुरू असून गुणांच्या स्पर्धेत कोण आघाडीवर आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परीक्षा कुठलीही असो त्यात फारच कमी जणांना अपेक्षित यश मिळते. अशा स्थितीत काही विद्यार्थी व पालकदेखील खचून जातात. आपला मुलगा काही करण्यायोग्यच नाही, असा पालकांचा समज होतो तर अमूक महाविद्यालयातील प्रवेश हुकला म्हणजे स्वप्नांचा मार्ग खुंटला, असा विद्यार्थी विचार करतात. एकेका गुणांसाठी विद्यार्थी झगडताना दिसून येतात. त्यामुळे कमी गुण मिळाल्यानंतर सहाजिकच त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मात्र अशा स्थितीत विद्यार्थ्यांना दूषणं देत बसण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. दुर्दैवाने याचा पालकांना विसर पडतो आणि त्यातूनच खचलेले विद्यार्थी नैराश्यात जातात, तर कुणी जीव संपविण्याचादेखील विचार करतात. आजकाल परीक्षा म्हणजे एक प्रकारची शर्यत झाली आहे. ज्याप्रमाणे शर्यतीत घोडे प्राणपणाने धावतात, अगदी त्याचप्रमाणे गुण मिळविण्यासाठी विद्यार्थी वर्षभर इकडून तिकडे धावत असतात. मात्र या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. शिक्षणाच्या घोडेबाजारात विद्यार्थी अक्षरश: भरडले जातात. दुसऱ्या अंगाने विचार केला तर काळाचीदेखील ही गरज म्हटल्या जाते. अशा स्थितीत शिक्षणाचे धडे देत असताना पालकांनी विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यासाठीदेखील तयार केले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात यश-अपयश, पास-नापास अशी वर्गवारी असते. गुणवंतांच्या कौतुकात नापासांचे अपयश समाजाच्या कुचेष्टेचा, उपेक्षेचा विषय ठरत असते. समाजात त्यांना कुठलीही प्रतिष्ठा मिळत नाही. त्यांच्या प्रतिष्ठेची वर्गवारी समाजच परस्पर ठरवून टाकतो, ही मानसिकता आता बदलायला हवी. यात आई-वडिलांनाही बदलावं लागेल. बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा नव्हे हे पालकांनीदेखील समजून घेणे आवश्यक आहे. बारावीत अपयशी ठरल्यानंतरही इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाºया अशा कितीतरी माणसांची नावे सांगता येतील. अपयशातूनच यशाचा महामार्ग गवसतो. अनेकांनी तो शोधला आहे. त्यामुळे निराश न होता आत्मविश्वासानं सामोरे जाण्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे. केवळ एका परीक्षेतील अपयश विद्यार्थ्यांमधील कर्तृत्वाला हिरावून घेऊ शकत नाही. स्पर्धेत दुसरा हारतो म्हणूनच पहिला जिंकतो. आयुष्य प्रत्येक वळणावर परीक्षा घेत असते. त्यामुळे दहावी-बारावीपेक्षा आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाणे जास्त महत्त्वाचे ठरते.

टॅग्स :examपरीक्षा