शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आयुष्याची परीक्षा महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:16 IST

सध्या निकाल व प्रवेशांचा ‘सीझन’ सुरू असून गुणांच्या स्पर्धेत कोण आघाडीवर आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परीक्षा कुठलीही असो त्यात फारच कमी जणांना अपेक्षित यश मिळते. अशा स्थितीत काही विद्यार्थी व पालकदेखील खचून जातात.

सध्या निकाल व प्रवेशांचा ‘सीझन’ सुरू असून गुणांच्या स्पर्धेत कोण आघाडीवर आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परीक्षा कुठलीही असो त्यात फारच कमी जणांना अपेक्षित यश मिळते. अशा स्थितीत काही विद्यार्थी व पालकदेखील खचून जातात. आपला मुलगा काही करण्यायोग्यच नाही, असा पालकांचा समज होतो तर अमूक महाविद्यालयातील प्रवेश हुकला म्हणजे स्वप्नांचा मार्ग खुंटला, असा विद्यार्थी विचार करतात. एकेका गुणांसाठी विद्यार्थी झगडताना दिसून येतात. त्यामुळे कमी गुण मिळाल्यानंतर सहाजिकच त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मात्र अशा स्थितीत विद्यार्थ्यांना दूषणं देत बसण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. दुर्दैवाने याचा पालकांना विसर पडतो आणि त्यातूनच खचलेले विद्यार्थी नैराश्यात जातात, तर कुणी जीव संपविण्याचादेखील विचार करतात. आजकाल परीक्षा म्हणजे एक प्रकारची शर्यत झाली आहे. ज्याप्रमाणे शर्यतीत घोडे प्राणपणाने धावतात, अगदी त्याचप्रमाणे गुण मिळविण्यासाठी विद्यार्थी वर्षभर इकडून तिकडे धावत असतात. मात्र या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. शिक्षणाच्या घोडेबाजारात विद्यार्थी अक्षरश: भरडले जातात. दुसऱ्या अंगाने विचार केला तर काळाचीदेखील ही गरज म्हटल्या जाते. अशा स्थितीत शिक्षणाचे धडे देत असताना पालकांनी विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यासाठीदेखील तयार केले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात यश-अपयश, पास-नापास अशी वर्गवारी असते. गुणवंतांच्या कौतुकात नापासांचे अपयश समाजाच्या कुचेष्टेचा, उपेक्षेचा विषय ठरत असते. समाजात त्यांना कुठलीही प्रतिष्ठा मिळत नाही. त्यांच्या प्रतिष्ठेची वर्गवारी समाजच परस्पर ठरवून टाकतो, ही मानसिकता आता बदलायला हवी. यात आई-वडिलांनाही बदलावं लागेल. बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा नव्हे हे पालकांनीदेखील समजून घेणे आवश्यक आहे. बारावीत अपयशी ठरल्यानंतरही इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाºया अशा कितीतरी माणसांची नावे सांगता येतील. अपयशातूनच यशाचा महामार्ग गवसतो. अनेकांनी तो शोधला आहे. त्यामुळे निराश न होता आत्मविश्वासानं सामोरे जाण्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे. केवळ एका परीक्षेतील अपयश विद्यार्थ्यांमधील कर्तृत्वाला हिरावून घेऊ शकत नाही. स्पर्धेत दुसरा हारतो म्हणूनच पहिला जिंकतो. आयुष्य प्रत्येक वळणावर परीक्षा घेत असते. त्यामुळे दहावी-बारावीपेक्षा आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाणे जास्त महत्त्वाचे ठरते.

टॅग्स :examपरीक्षा