शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आयुष्याची परीक्षा महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:16 IST

सध्या निकाल व प्रवेशांचा ‘सीझन’ सुरू असून गुणांच्या स्पर्धेत कोण आघाडीवर आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परीक्षा कुठलीही असो त्यात फारच कमी जणांना अपेक्षित यश मिळते. अशा स्थितीत काही विद्यार्थी व पालकदेखील खचून जातात.

सध्या निकाल व प्रवेशांचा ‘सीझन’ सुरू असून गुणांच्या स्पर्धेत कोण आघाडीवर आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परीक्षा कुठलीही असो त्यात फारच कमी जणांना अपेक्षित यश मिळते. अशा स्थितीत काही विद्यार्थी व पालकदेखील खचून जातात. आपला मुलगा काही करण्यायोग्यच नाही, असा पालकांचा समज होतो तर अमूक महाविद्यालयातील प्रवेश हुकला म्हणजे स्वप्नांचा मार्ग खुंटला, असा विद्यार्थी विचार करतात. एकेका गुणांसाठी विद्यार्थी झगडताना दिसून येतात. त्यामुळे कमी गुण मिळाल्यानंतर सहाजिकच त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मात्र अशा स्थितीत विद्यार्थ्यांना दूषणं देत बसण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. दुर्दैवाने याचा पालकांना विसर पडतो आणि त्यातूनच खचलेले विद्यार्थी नैराश्यात जातात, तर कुणी जीव संपविण्याचादेखील विचार करतात. आजकाल परीक्षा म्हणजे एक प्रकारची शर्यत झाली आहे. ज्याप्रमाणे शर्यतीत घोडे प्राणपणाने धावतात, अगदी त्याचप्रमाणे गुण मिळविण्यासाठी विद्यार्थी वर्षभर इकडून तिकडे धावत असतात. मात्र या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. शिक्षणाच्या घोडेबाजारात विद्यार्थी अक्षरश: भरडले जातात. दुसऱ्या अंगाने विचार केला तर काळाचीदेखील ही गरज म्हटल्या जाते. अशा स्थितीत शिक्षणाचे धडे देत असताना पालकांनी विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यासाठीदेखील तयार केले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात यश-अपयश, पास-नापास अशी वर्गवारी असते. गुणवंतांच्या कौतुकात नापासांचे अपयश समाजाच्या कुचेष्टेचा, उपेक्षेचा विषय ठरत असते. समाजात त्यांना कुठलीही प्रतिष्ठा मिळत नाही. त्यांच्या प्रतिष्ठेची वर्गवारी समाजच परस्पर ठरवून टाकतो, ही मानसिकता आता बदलायला हवी. यात आई-वडिलांनाही बदलावं लागेल. बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा नव्हे हे पालकांनीदेखील समजून घेणे आवश्यक आहे. बारावीत अपयशी ठरल्यानंतरही इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाºया अशा कितीतरी माणसांची नावे सांगता येतील. अपयशातूनच यशाचा महामार्ग गवसतो. अनेकांनी तो शोधला आहे. त्यामुळे निराश न होता आत्मविश्वासानं सामोरे जाण्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे. केवळ एका परीक्षेतील अपयश विद्यार्थ्यांमधील कर्तृत्वाला हिरावून घेऊ शकत नाही. स्पर्धेत दुसरा हारतो म्हणूनच पहिला जिंकतो. आयुष्य प्रत्येक वळणावर परीक्षा घेत असते. त्यामुळे दहावी-बारावीपेक्षा आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाणे जास्त महत्त्वाचे ठरते.

टॅग्स :examपरीक्षा