शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

पोस्टात हरवलेले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 04:04 IST

परवा तुझा वाढदिवस झाला. पेपरात फोटो पाहिले. इतके वाईट फोटो आजवर मी पाहिले नव्हते. कुणी काढले रे ते? तुझ्यासारख्या फोटोग्राफरचे असले फोटो? वाढदिवस तुझा, पण नेमकं कोण कुणाला शुभेच्छा देतोय हेच कळत नाही!

<p>- नंदकिशोर पाटीलप्रिय दादूस,सप्रेम नमस्कार!परवा तुझा वाढदिवस झाला. पेपरात फोटो पाहिले. इतके वाईट फोटो आजवर मी पाहिले नव्हते. कुणी काढले रे ते? तुझ्यासारख्या फोटोग्राफरचे असले फोटो? वाढदिवस तुझा, पण नेमकं कोण कुणाला शुभेच्छा देतोय हेच कळत नाही!मी देखील शुभेच्छा देण्यासाठी बांद्र्याला येणार होतो. पण माहिमला ट्रॅफिक जॅम असल्याने येऊ शकलो नाही. दादर ते बांद्रा तसंही खूप अंतर. त्यात मेट्रोच्या नावाखाली सरकारनं मुंबईतील सगळे रस्ते उखडून टाकलेले. शिवाय, फूटपाथवर जिथं-तिथं भैये पसरलेले. पायी चालणं मुश्कील तिथं गाडी कशी काढणार? मला सांग, कुणी मागितली होती रे यांना मेट्रो? कुणीही येतो अन् मुंबईवर हातोडा मारून जातो. अहमदाबाद, सुरत, गांधीनगरात का नाही खोदत? रस्ते खोदायची एवढीच हौस असेल, तर सीमेवरचे खोदा ना! अतिरेक्यांना घुसता येणार नाही. तुमच्या सोंगासाठी आमची मुंबई कशाला तोडताय? मराठी माणसाला गणपतीसाठी कोकणात जायला धड रस्ता नाही. मुंबई-गोवा महामार्ग कधीपासून उखडून टाकलाय. रोज अपघात होतात. माणसं मरतात. पण त्याचं कुणालाच सोयरसुतक नाही. कोकण रेल्वेत तर परप्रांतीयांचाच भरणा अधिक. पाय ठेवायलाही जागा नसते. मुंबईत तर जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय. कधी कोणता पूल कोसळेल याचा नेम नसतो. सगळे कसे मराठी माणसांच्या जीवावर उठले आहेत.दादू, तुला हे सगळं सांगण्यामागं कारण असं की, आपण आता सावध राहायला हवं. (आपण म्हणजे, फक्त तू अन् मी नव्हे!) गेली पंचवीस एक वर्षे तुझ्याकडे मुंबईची मुनसीपाल्टी आहे. काय दिवे लावले तिथे? मी बघ. अवघ्या पाच वर्षात नाशकाचा चेहरामोहरा बदलून टाकला. शहराच्या विकासासाठी नुसती सत्ता असून चालत नाही व्हिजन असावं लागतं. आता तू म्हणशील-‘नाशकात एवढा मनसे विकास झाला, तर मग लोकांनी का नाकारलं?’ तेच सांगतो. मराठी माणूस इथेच कमी पडतो. तिकडे बघ. गुजरातेत काही न करता तिथले लोक पुन्हा-पुन्हा त्यांना निवडून देतात. आपण सारे कपाळकरंटे. खेकडावृत्तीचे. एकमेकांचे पाय ओढण्यात वाक्बगार! अरे हो. खेकड्यावरून आठवलं. तुझा तो धाकटा चिरंजीव खेकड्यावर संशोधन करतोय म्हणे! धन्य आहे!! कुणी सुचवला रे हा विषय त्याला? स्वत:ला छावा म्हणवून घ्यायचं अन् फावल्या वेळात खेकडे पकडायचे!जळलं मेलं लक्षण. पंतांची मुलं गगनचुंबी टॉवर उभारताहेत अन् आपली मुलं खेकडे पकडताहेत...बरं दिसतं का हे? स्वर्गातदेखील बाळासाहेबांना वेदना होत असतील... तरी मी सांगत होतो. शिववडा काढू नको. वडापाव खाऊन मराठी तरुणांना भव्यदिव्य स्वप्नं कशी पडणार?असो. दादू तू वाराणसीला जाणार आहेस म्हणे. मला सांग, कुणी दिली तुला ही आयडिया? जिवंतपणी कुणी काशी करतं का? काय करणार तिथं जाऊन, तर गंगेत डुबकी मारणार! पोहता येतं का? त्यापेक्षा अयोध्येला जा. राममंदिरासाठी जमविलेल्या विटा शाबुत आहेत का ते बघून ये. जमलंच तर एखादी वीट रचून ये. तेवढंच काहीतरी ‘काँक्रिट’ काम लोकांच्या लक्षात राहील.वाढदिवसाच्या पुन:श्च शुभेच्छा!तुझा भाऊ-राज दादरकर(तिरकस)