शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नवीन वर्षात माणूस म्हणून नवं जगणं जगुया!

By किरण अग्रवाल | Updated: January 1, 2023 11:20 IST

Happy New Year 2023 : नव्या वर्षात पाऊल ठेवताना नव्या आशांसोबतच नवी दृष्टी ठेवून वाटचाल करणे गरजेचे बनले आहे, कारण गत काळाने खूप धडे शिकवून दिले आहेत.

- किरण अग्रवाल

सरलेल्या वर्षात सर्व काही त्रासदायीच झाले असे नाही, अनेक चांगल्या बाबीही घडल्या. मुख्य म्हणजे कोरोनाने कुंठित झालेल्या मानसिकतेला नवी उमेद लाभली. आता नवीन 2023 या वर्षात या उमेदीच्या बळावर माणुसकीने जगण्याचा नवा संकल्प करूया...

कोरोनाच्या महामारीने छळलेल्या दोन वर्षानंतर आलेले 2022 हे वर्ष नवी जिद्द जागविणारे ठरले. आता 2023 या नव्या वर्षात पाऊल ठेवताना नव्या आशांसोबतच नवी दृष्टी ठेवून वाटचाल करणे गरजेचे बनले आहे, कारण गत काळाने खूप धडे शिकवून दिले आहेत.

तसं तर प्रत्येकच दिवसाचा सूर्य नवी उमेद जागवत व नवी आशा घेऊन उगवत असतो, त्यामुळे नवीन वर्षातील पहिल्या तारखेचाच सूर्य वेगळेपणाने उगवला आहे असे म्हणता येऊ नये; पण आपण संकल्पांनाही मुहूर्त शोधत असल्याने नवीन वर्षातील आजच्या पहिल्या सूर्योदयाकडे त्याचदृष्टीने पाहता यावे. अर्थातच, नव्या वर्षात नवे संकल्प करताना गेल्या दोन तीन वर्षात आरोग्याचे संकट व जे काही भोगले, सोसले त्यासंबंधी घटनांच्या स्मृतींना अर्घ्य देण्याची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरावी; कारण जुनी मळलेली वाट सोडल्याखेरीज नव्या वाटेवर अग्रेसर होता येत नाही.

 

नवीन वर्षात प्रवेश केल्यावर मागे वळून पाहता गेल्या 2022 मधील अनेकविध घटना डोळ्यासमोर तरळून जातात. यात काही गोष्टी अनपेक्षित, धक्कादायक घडल्यात हे खरेच; पण त्यापेक्षा कितीतरी अधिक बाबी या चांगल्याही घडल्यात. अनपेक्षित गोष्टीतून धडा व चांगल्या बाबीतून प्रेरणा घेऊन आपल्याला नवीन वर्षातील नवनिर्माण करायचे आहे. आहे त्यापेक्षा अधिक काय चांगले करता येईल याचा संकल्प करायचा आहे. तो करताना इमारती, प्रकल्प, सोयी सुविधा या भौतिक बाबी तर अपेक्षित असतातच, परंतु माणूस म्हणून मानसिकतेतील बदलही यात अपेक्षित धरायला हवा. माणूस म्हणून जगण्याचा हा बदल हवा. कारण, आज सर्व काही आहे, पण माणूसपण हरवत चालले आहे. ''माणसा माणसा कधी व्हशील मानूस'' हा कवयित्री बहिणाबाईंनी विचारलेला प्रश्न आज अधिक अस्वस्थ करून सोडतो तो त्यामुळेच.

 

माणूसपण कसे हरवत चालले आहे याची उदाहरणे कमी नाहीत. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी फोटोग्राफी व व्हिडिओ शूट करण्याची चढाओढ सुरू झालेली दिसते. सधनांकडील लग्न सोहळ्यात इतके अन्न उष्टे व खरकटे वाया जाते, की त्यात एखाद्या भुकेल्याच्या वर्षभराची अन्नपाण्याची तजवीज व्हावी. एकीकडे सराफा दुकानांमध्ये गर्दी दिसत असताना, दुसरीकडे रेल्वेच्या पटऱ्यांमध्ये जीव धोक्यात घालून प्लास्टिक वेस्ट गोळा करणारेही दिसतात. कुठे नकोशी ठरलेल्या पोटच्या तान्हुलीला कचरा कुंडीत टाकून देणारी माता आढळते, तर कुठे जन्मदात्यानाच म्हातारपणी घराबाहेर काढत रस्त्यावर सोडून देणारी संतानही आढळते. कुटुंबातील वाटे हिस्स्यासाठी भावा भावांमध्ये वाढलेले कुटुंब कलह असोत, की पैशाच्या हव्यासातून घडणारी लेकी बाळींच्या छळाची प्रकरणे; या व अशा सर्व घटनात माणुसकीच तर पणास लागलेली दिसते.

महत्वाचे म्हणजे, सुखा मागे धावताना जी ओढाताण होते त्यात जगणेच हरवून गेले आहे. स्वाभाविकच प्रत्येक जण बहुदा आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठीच जगण्याला प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास येते. यात ''वसुधैव कुटुम्बकम''ची भावना मागे पडल्याचे जाणवते. म्हणूनच तर नवीन वर्षात प्रवेश करताना नवं जगणं जगुया.. असे म्हणावेसे वाटते. हे नवे जगणे म्हणजे काय, तर मी व माझ्या खेरीज इतरांसाठीचे जगणे. माणुसकीने, माणूस म्हणून संवेदना जाग्या ठेऊन जगणे. आज सर्वांनीच आपापल्या परीने प्रगती केली असली तरी त्यात नेमके हे जगणे अभावानेच दिसते, म्हणून नवीन वर्षात नवी गाडी, बंगला आदींच्या पलीकडे जाऊन नवा संकल्प करूया; नवं जगण्याचा... माणुसकी जपण्याचा! यासाठी धडपडणाऱ्यांच्या पाठीशी बळ उभे करण्याचा.

टॅग्स :New Yearनववर्ष