शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनांचे दीप उजळूया...

By किरण अग्रवाल | Updated: October 28, 2021 07:00 IST

Let's light the lamps of Emotions ... निराशेच्या वातावरणात संवेदनांचे दीप उजळून आनंद पसरविण्याची गरज आहे.

किरण अग्रवाल

 आनंद वाटल्याने वाढतो असे म्हणतात, पण आज आनंद कुणी वाटून घेऊ इच्छित नाही; तो ‘मी’ व ‘माझ्या’तच ठेवून दुःख मात्र वाटून घेण्याची अपेक्षा बाळगली जाते. अर्थात सुख असो की दुःख, त्यात एकतर्फी वाटेकरी कधीच लाभत नसतात म्हणून यासंदर्भातील समतोल साधायचा तर अगोदर सुख वाटण्यापासून सुरुवात करायची असते. ते करायचे म्हणजे काय, तर आपल्या आनंदातील वाटेकरी वाढवायचे. यंदाच्या दिवाळीत तेच करता आले तर निराशेचे मळभ दूर सारून उत्साह, ऊर्जेच्या पणतीने प्रत्येक अंगण प्रकाशमान झालेले दिसून येऊ शकेल.

 

गत वर्षापासून दिवाळीला कोरोनाच्या संकटाची पार्श्वभूमी लाभून गेलेली असल्याने सण साजरा होताना दिसतो; परंतु मनातील अस्वस्थता लपता लपत नाही. यंदाच्या दिवाळीपूर्वीही कोरोनाची दुसरी लाट अनेकांना झळ पोहोचवून गेली आहे. अनेक घरातील कर्ते व कमावते पुरुष कोरोनाने हिरावून घेतले आहेत, तर अनेकांच्या नोकरी, व्यापार-उद्योगांवर गंडांतर आलेले आहे. अशाही स्थितीत मन घट्ट करून सारेजण दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बाजारातील गर्दी ओसंडून वाहत असून, संकटावर मात करून आयुष्याच्या मशाली पेटवण्याचा दुर्दम्य आशावाद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत आहे. कोरोनाच्या संकटातून कसे तरी बचावत बाहेर पडून स्थिरस्थावर होत नाही तोच अतिवृष्टीचा फटका बसला. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, तरी नाउमेद न होता ऋण काढून का होईना सण साधण्यासाठी धडपड सुरू आहे. काहीशी निराशा, अस्वस्थता मनात आहे खरी; पण आशेचे दीप लावून आसमंत उजळून काढण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत ही समाधानाची बाब म्हणता यावी.

 

आशेचे दीप लावण्याच्या या प्रयत्नांना सार्वत्रिक पातळीवर बळ लाभणे गरजेचे आहे. कोरोनामुळे ज्यांच्या वाट्याला जे जे काही दुःख आले ते त्यांना विसरायला लावायचे असेल तर आपला आनंद त्यांच्याशी वाटून घ्यावा लागेल. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे व आपुलकीचे दोन शब्द तसेच दुःखाप्रतिच्या सहवेदनेतून हे होऊ शकणारे आहे. माणुसकीच्या ओलाव्याने ओथंबलेल्या भावना व शब्द असले, की त्रयस्थाच्या मनाशीही आपुलकीच्या तारा जुळतात. आपल्या आनंदात सहभागी करून घेतले की समोरच्याचे दुःख विसरायला मदत होते. दिवाळीला आपण आपल्या दारी आकाशकंदील लावू, आनंदाचे तोरण बांधू, घरात गोडधोड करू, नवीन कपडे लागते घेऊ; यातून जो आनंद आपणास लाभणार आहे तो आपल्या ऐपतीप्रमाणे समाजातील वंचितांसोबत वाटून घेतला तर त्यांचीही दिवाळी आनंदाची होऊ शकेल. यातून जे आत्मिक समाधान लाभेल व आनंद होईल त्याला मोल नसेल. अर्थातच यासाठी हवी संवेदनशीलता. दुर्दैवाने आज लोकांच्या भावना बोथट होत चालल्या आहेत. कोरोनाने गरीब-श्रीमंत, लहान-मोठा या भेदांच्या पलीकडे सर्वांना एका पातळीवर आणून उभे केल्याचे पाहता, निराशेच्या वातावरणात संवेदनांचे दीप उजळून आनंद पसरविण्याची गरज आहे. यंदाच्या दिवाळीत सारे मिळून तेच करूया...

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Socialसामाजिक