शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

चला हुंड्याला बदनाम करूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:44 IST

एकीकडे स्त्री सन्मानाचे, समतेचे बोलायचे अन् दुसरीकडे समताधिष्ठित समाजरचनेला सुरूंग लावायचा. ही दुहेरी नीती परंपरेने चालत आली आहे. अशाच कुप्रथा परंपरांनी स्त्रीला प्रदीर्घ काळ कोंडवून ठेवले.

- धर्मराज हल्लाळे

एकीकडे स्त्री सन्मानाचे, समतेचे बोलायचे अन् दुसरीकडे समताधिष्ठित समाजरचनेला सुरूंग लावायचा. ही दुहेरी नीती परंपरेने चालत आली आहे. अशाच कुप्रथा परंपरांनी स्त्रीला प्रदीर्घ काळ कोंडवून ठेवले. आज परिस्थिती बदलली आहे. सर्व क्षेत्रात मुलींनी, महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे़ तरीही समाजातील दुय्यम वागणूक सर्वार्थाने दूर झालेली नाही. महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीच्या कार्याचा, शौर्याचा गौरव होतो. परंतु, आजही हुंड्यासारख्या कुप्रथा पूर्णत: हद्दपार होत नाहीत. त्यामुळे महिलांचा सन्मान हा कृतिशील असला पाहिजे.महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरात शेतकरी आत्महत्या हा गंभीर आणि तितकाच चिंतेचा विषय आहे.  मराठवाड्यातील आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांना भेट दिल्यानंतर निश्चितच शेतीप्रश्न हे आत्महत्याच्या मुळाशी असल्याचे समोर येते़ परंतु, अनेकदा सामाजिक प्रतिष्ठा, मुलीचे विवाह आणि कर्ज हे दुष्टचक्र दिसून येते. आधीच दुष्काळाची स्थिती त्यात मुलीचे लग्न हे पित्याला ओझे वाटू लागते. एकीकडे आत्महत्या करून स्वत:ची सुटका करून घेणारे काहीजण तर बहुतांश लोक कर्जाच्या ओझ्याखाली संपूर्ण आयुष्य काढतात. महिला दिनी हा प्रश्न मनाला नक्कीच सतावतो, कारण आजही मुलगी आणि तिचे लग्न हे तिच्या कुटुंबियांसमोर प्रश्न म्हणून उभे राहते. खरे तर मुलीचा विवाह हा आनंदाचा क्षण असायला हवा. मात्र हुंड्याच्या ओझ्यामुळे समाजात एक मोठा वर्ग दडपणाखाली जीवन जगतो. नक्कीच आज उघडपणे हुंड्यावर बोलले जात नाही़ तो गुपचूप केला जाणारा व्यवहार आहे. तरीही ग्रामीण भागात हुंडा किती घेतला यावर घेणा-याची प्रतिष्ठा सांगितली जाते, ही मोठी शोकांतिका आहे. आनंदाने ऐपत असताना एकमेकांना भेटवस्तू दिली जात असेल अथवा मदत केली जात असेल तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण जेव्हा मुलीच्या पित्याला अनिवार्यपणे वर पक्षाला हुंडा द्यावा लागतो, तेव्हा ते एक प्रकारे शोषण असते. आश्चर्य म्हणजे अनेक जण निर्लज्जपणे बोली लावतात. कित्येक प्रकरणात सोयरिक मोडली जाते. विवाहाच्या दिवशीसुद्धा हुंड्यासाठी अडून बसणारे महाभाग कमी नाहीत. आज मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. स्त्री भ्रूणहत्येसंदर्भात जनजागरण झाल्यामुळे येणा-या काळात सकारात्मक बदल होतील. तूर्त अनेक समाजात मुलींची संख्या चिंतेचा विषय आहे. अशा वेळी काही ठिकाणी हुंड्याची स्थिती उलट्या दिशेने जाणारी आहे. कोणत्याही परिस्थितीत शोषण करून देण्याघेण्याचा जो व्यवहार होतो तो सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा ठरतो.मराठवाड्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांच्या कारणाचा शोध घेतला असता अनेक कारणांपैकी मुलींचे विवाह हे कारणसुद्धा नमूद केले जाते. एकीकडे हुंडा तर दुसरीकडे मुलगीच पित्याला ओढे वाटू लागल्यामुळे बालविवाह सुद्धा घडतात. केवळ त्याच्या तक्रारी होत नाहीत, इतकेच. एका सामाजिक प्रश्नांमधून दुसरे गंभीर प्रश्न जन्म घेतात नेमके तेच हुंडा या कुप्रथेतून दिसते. मुळातच हुंडा घेणे ही मानसिकता स्त्रीचे अस्तित्व नाकारणारी आहे. ती आज कोणत्याही बाजूने मुलांपेक्षा कमी नाही. कुटुंबच नव्हे तर समाज उभारणीत स्त्रियांचा वाटा मोलाचा आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, उद्योग इतकेच नव्हे संरक्षण क्षेत्रातही महिलांनी सक्षमपणे पाऊल ठेवले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस ८ मार्च असला, तरी सातत्याने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवली पाहिजे. त्यासाठी कधीकाळी प्रतिष्ठेचा विषय केला जाणारा हुंडा बदनाम केला पाहिजे़ आज कायद्याने प्रतिबंध केला असला, तरी कौटुंबिक समारंभात उघडपणे देणे-घेणे सुरू असते. अशावेळी जागतिक पातळीवरील समतेचे बोलत असताना आपण आपल्या घरापासून आणि स्वत:पासून सुरूवात केली पाहिजे. त्यासाठीच चला हुंड्याला बदनाम करूया, ही मोहीम राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :dowryहुंडा