शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चला हुंड्याला बदनाम करूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:44 IST

एकीकडे स्त्री सन्मानाचे, समतेचे बोलायचे अन् दुसरीकडे समताधिष्ठित समाजरचनेला सुरूंग लावायचा. ही दुहेरी नीती परंपरेने चालत आली आहे. अशाच कुप्रथा परंपरांनी स्त्रीला प्रदीर्घ काळ कोंडवून ठेवले.

- धर्मराज हल्लाळे

एकीकडे स्त्री सन्मानाचे, समतेचे बोलायचे अन् दुसरीकडे समताधिष्ठित समाजरचनेला सुरूंग लावायचा. ही दुहेरी नीती परंपरेने चालत आली आहे. अशाच कुप्रथा परंपरांनी स्त्रीला प्रदीर्घ काळ कोंडवून ठेवले. आज परिस्थिती बदलली आहे. सर्व क्षेत्रात मुलींनी, महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे़ तरीही समाजातील दुय्यम वागणूक सर्वार्थाने दूर झालेली नाही. महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीच्या कार्याचा, शौर्याचा गौरव होतो. परंतु, आजही हुंड्यासारख्या कुप्रथा पूर्णत: हद्दपार होत नाहीत. त्यामुळे महिलांचा सन्मान हा कृतिशील असला पाहिजे.महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरात शेतकरी आत्महत्या हा गंभीर आणि तितकाच चिंतेचा विषय आहे.  मराठवाड्यातील आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांना भेट दिल्यानंतर निश्चितच शेतीप्रश्न हे आत्महत्याच्या मुळाशी असल्याचे समोर येते़ परंतु, अनेकदा सामाजिक प्रतिष्ठा, मुलीचे विवाह आणि कर्ज हे दुष्टचक्र दिसून येते. आधीच दुष्काळाची स्थिती त्यात मुलीचे लग्न हे पित्याला ओझे वाटू लागते. एकीकडे आत्महत्या करून स्वत:ची सुटका करून घेणारे काहीजण तर बहुतांश लोक कर्जाच्या ओझ्याखाली संपूर्ण आयुष्य काढतात. महिला दिनी हा प्रश्न मनाला नक्कीच सतावतो, कारण आजही मुलगी आणि तिचे लग्न हे तिच्या कुटुंबियांसमोर प्रश्न म्हणून उभे राहते. खरे तर मुलीचा विवाह हा आनंदाचा क्षण असायला हवा. मात्र हुंड्याच्या ओझ्यामुळे समाजात एक मोठा वर्ग दडपणाखाली जीवन जगतो. नक्कीच आज उघडपणे हुंड्यावर बोलले जात नाही़ तो गुपचूप केला जाणारा व्यवहार आहे. तरीही ग्रामीण भागात हुंडा किती घेतला यावर घेणा-याची प्रतिष्ठा सांगितली जाते, ही मोठी शोकांतिका आहे. आनंदाने ऐपत असताना एकमेकांना भेटवस्तू दिली जात असेल अथवा मदत केली जात असेल तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण जेव्हा मुलीच्या पित्याला अनिवार्यपणे वर पक्षाला हुंडा द्यावा लागतो, तेव्हा ते एक प्रकारे शोषण असते. आश्चर्य म्हणजे अनेक जण निर्लज्जपणे बोली लावतात. कित्येक प्रकरणात सोयरिक मोडली जाते. विवाहाच्या दिवशीसुद्धा हुंड्यासाठी अडून बसणारे महाभाग कमी नाहीत. आज मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. स्त्री भ्रूणहत्येसंदर्भात जनजागरण झाल्यामुळे येणा-या काळात सकारात्मक बदल होतील. तूर्त अनेक समाजात मुलींची संख्या चिंतेचा विषय आहे. अशा वेळी काही ठिकाणी हुंड्याची स्थिती उलट्या दिशेने जाणारी आहे. कोणत्याही परिस्थितीत शोषण करून देण्याघेण्याचा जो व्यवहार होतो तो सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा ठरतो.मराठवाड्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांच्या कारणाचा शोध घेतला असता अनेक कारणांपैकी मुलींचे विवाह हे कारणसुद्धा नमूद केले जाते. एकीकडे हुंडा तर दुसरीकडे मुलगीच पित्याला ओढे वाटू लागल्यामुळे बालविवाह सुद्धा घडतात. केवळ त्याच्या तक्रारी होत नाहीत, इतकेच. एका सामाजिक प्रश्नांमधून दुसरे गंभीर प्रश्न जन्म घेतात नेमके तेच हुंडा या कुप्रथेतून दिसते. मुळातच हुंडा घेणे ही मानसिकता स्त्रीचे अस्तित्व नाकारणारी आहे. ती आज कोणत्याही बाजूने मुलांपेक्षा कमी नाही. कुटुंबच नव्हे तर समाज उभारणीत स्त्रियांचा वाटा मोलाचा आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, उद्योग इतकेच नव्हे संरक्षण क्षेत्रातही महिलांनी सक्षमपणे पाऊल ठेवले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस ८ मार्च असला, तरी सातत्याने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवली पाहिजे. त्यासाठी कधीकाळी प्रतिष्ठेचा विषय केला जाणारा हुंडा बदनाम केला पाहिजे़ आज कायद्याने प्रतिबंध केला असला, तरी कौटुंबिक समारंभात उघडपणे देणे-घेणे सुरू असते. अशावेळी जागतिक पातळीवरील समतेचे बोलत असताना आपण आपल्या घरापासून आणि स्वत:पासून सुरूवात केली पाहिजे. त्यासाठीच चला हुंड्याला बदनाम करूया, ही मोहीम राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :dowryहुंडा