शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

झाडे सरकारने लावायची आणि आम्ही काय करायचे...?

By अतुल कुलकर्णी | Updated: May 14, 2019 01:37 IST

रणरणत्या उन्हात एखादे हिरवे, डेरेदार झाड दिसले की, आम्ही लगेच त्या झाडाखाली जाऊन बसतो. थोडीशी सावली आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. अशी झाडं राज्यात अनेक ठिकाणी दिसतील.

- अतुल कुलकर्णी (वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)रणरणत्या उन्हात एखादे हिरवे, डेरेदार झाड दिसले की, आम्ही लगेच त्या झाडाखाली जाऊन बसतो. थोडीशी सावली आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. अशी झाडं राज्यात अनेक ठिकाणी दिसतील. मात्र, ज्या झाडाखाली आम्ही काही क्षण थांबतो, ते झाड कोणी आणि कधी लावले याचा विचारही आमच्या मनात येत नाही. झाडं लावणे ही आमची मुळी जबाबदारीच नाही, अशा रितीने आम्ही वागत आलोय. झाडे लावणे, ती जगविणे आणि ती वाढविणे ही सगळी कामं सरकार नावाच्या यंत्रणेने केली पाहिजेत, असा आमच्यातल्या अनेकांचा पक्का समज झाला आहे. सरकारने झाडे लावण्याचे काम हाती घेतले आणि त्यात काही चुका झाल्या, गैरप्रकार झाला की, ज्यांना नुसती नावेच ठेवायची असतात, असे लोक सोशल मीडिया असो की अन्य कोणती साधने असोत, त्यावर तुटून पडण्याचे काम मात्र करताना दिसतात.

दुसरीकडे अनेक चांगल्या स्वयंसेवी संस्था, गट वृक्षारोपणासाठी हिरिरीने भाग घेताना दिसतात. अमीर खानची संस्था असो की, गावागावात काम करणाऱ्या पण कोणत्याही प्रसिद्धीपासून शेकडो कोस दूर असणाºया संस्था, व्यक्ती असोत, प्रत्येक जण वृक्षसंवर्धनाचे काम करताना दिसतो. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ कोटींपासून ते ३३ कोटींपर्यंत वृक्षारोपणाचे लक्ष्य हाती घेतले. मोठ्या प्रमाणात झाडं लावली गेली. सरकारने तीन वर्षांत १९ कोटी झाले लावली, त्यापैकी ७० टक्के झाडे जगली, असे आकडेवारी सांगते. ही चांगली गोष्ट आहे, पण एवढ्याने पाणीटंचाईचा प्रश्न सुटणारा नाही.

महाराष्टÑात काही सकारात्मक कामे होत आहेत़, पण सरकारी आकडेवारी पाहिली तर गेल्या ३० वर्षांत देशभरात अतिक्रमण व औद्योगिकीकरणामुळे १९ हजार चौ.किमी एवढी जंगले कायमची नष्ट झाली आहेत. यापैकी १५ हजार चौ. किमी क्षेत्रावरील जंगले अतिक्रमणांनी गिळली आहेत. यामुळे नष्ट झालेले वनक्षेत्र हरयाणा राज्याच्या दोन तृतीयांश क्षेत्रफळाएवढे आहे. याखेरीज २३,७१६ नव्या औद्योगिक प्रकल्पांनी आणखी १४ हजार चौ. किमी क्षेत्रावरील वनांचा घास घेतला आहे. वनीकरणाने कृत्रिम जंगले तयार करून ही झालेली हानी भरून निघू शकत नाही, हेही सरकारने मान्य केले आहे. वनक्षेत्रात उद्योग उभारताना घातल्या जाणाºया अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन होते, असे भारताच्या नियंत्रक व महालेखाकारांनीच (कॅग) नमूद केले आहे. तज्ज्ञांना असे वाटते की, सरकारने उघडपणे मान्य केलेली ही वनांच्या हानीची आकडेवारी वास्तवाहून खूपच कमी आहे.

आज राज्य तीव्र दुष्काळात आहे. ४० हजार गावांपैकी ३० हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. रानोमाळ उजाड आणि बोडके दिसत आहेत. कुठेतरी एखादे झाड थोडी हिरवी सावली धरून आहे. हे चित्र प्रचंड अस्वस्थ करणारे आहे. आम्ही भौतिक प्रगती कितीही केली, गाडी, घर, बसेस, रेल्वे ही साधने एसी केली आणि त्याहीपुढे जाऊन अगदी रस्तेदेखील एसी केलेच तरीही पिण्यासाठी लागणारे पाणी आपण आणणार कुठून हा गंभीर प्रश्न आहे. येणाºया काही वर्षांत पाण्यासाठी युद्धे होऊ लागली, तर फार आश्चर्य वाटण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत.

जमिनीतील पाण्याची पातळी टिकवायची असेल, वाढवायची असेल, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग जेवढे महत्त्वाचे त्यापेक्षाही झाडे लावण्याची जास्त महत्त्वाचे आहे. आपण प्रत्येकाने आपल्याच मनाला प्रश्न विचारून पाहावा की, मी माझ्या आयुष्यात किती झाडं लावली किंवा जगवली? अनेकांचे उत्तर नकारार्थीच असेल. आमच्या वाडवडिलांनी जी काही झाडं लावली असतील, तीच आज वर्षानुवर्षे आम्हाला सावली देत आहेत, पाऊस बोलावत आहेत.

परदेशातून आलेले पाहुणे तुमच्याकडे पाहण्यासारखे काय आहे, असे महाराष्टÑात विचारतात, तेव्हा आम्ही त्यांना वेरुळ, अजिंठ्याच्या लेण्यांची, तसेच गौताळा, ताडोबा अशा जंगलांची नावे सांगतो. मात्र, तुमच्या पिढीने काय बनवले आहे, असे जर का कोणी विचारले, तर आमच्याकडे दाखविण्याजोगे काहीही नसते. या पिढीने गेल्या २० वर्षांत किती जंगलांची निर्मिती केली? किती ठिकाणी वेगवेगळी झाडे लावली? आमच्याकडे गुलमोहरांचे विविध प्रकार आहेत, त्यांचे एक भव्य उद्यान आमच्याकडे आहे, असे आम्ही कधी कोणाला सांगू शकू का? या व अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत.

सगळ्या भौतिक सुविधा आम्ही निर्माण करू, हातातल्या मोबाइलवर जगाची माहिती क्षणात मिळवू, पण पाण्याचे स्त्रोत कुठे आणि कसे शोधणार? आहे ते पाणी टिकून राहावे म्हणून आम्ही काय करणार? याची उत्तरे फक्त सरकारवर सोडून भागणार नाही. आम्ही प्रत्येकाने एक तरी झाड लावायचे आणि जगवायचे ठरविले, तर या देशात नवीन हरितक्रांती कधी होऊन गेली, हे ही कळणार नाही.

टॅग्स :Natureनिसर्ग