शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

अश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 03:58 IST

माणूस जन्मतो तेव्हा तो एकटा, नागडा, हाडामांसाच्या अवयवांचा असतो. तो रडतो. ही त्याची जगण्याची अव्वल खूण. तो जगतो आणि एक दिवस मरतो. तेव्हा आसपासचे रडतात. म्हणजे सुरुवात रडणे आणि शेवट रडवणेने होतो.

 - किशोर पाठकमाणूस जन्मतो तेव्हा तो एकटा, नागडा, हाडामांसाच्या अवयवांचा असतो. तो रडतो. ही त्याची जगण्याची अव्वल खूण. तो जगतो आणि एक दिवस मरतो. तेव्हा आसपासचे रडतात. म्हणजे सुरुवात रडणे आणि शेवट रडवणेने होतो. गंमत पहा जन्मत: रडतो ही जिवंतपणाची खूण. तो का रडतो हे कळण्यापूर्वीची खूण आणि तो संपतो तेव्हा इतर रडतात. ते त्याला कळत नाही. हे रुदन त्याच्या दृष्टीने व्यर्थ असते. तो एकतर मुक्त झालेला जगण्यामरण्यातून नाहीतर पुनर्जन्म घेऊन कुठल्यातरी मांडीवर जोजवत असलेला. माणूस प्रत्येक गोष्टीशी दुहेरी जोडलेला असतो. मग तो शत्रू असो वा मित्र. शत्रू होण्यापूर्वी तो मित्र असतोच. बघा हिंदी-चिनी भाई भाई. मित्रत्व सरते आणि तो शत्रू होतो. मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र होतो. नव्हे विरोधाकरिता केला जातो. आपण नाते गुंतवतो, गोठवतो, संपवतो किंवा थांबवतो आपल्यापुरते. म्हणजे स्त्रीचंच पहा ना. ती जन्मते तेव्हा बाळ असते. चिंगी, पिंगी, रंगी कुणीही असते. मग तिला अवयव फुटतात ती मुलगी, कुमारिका, तरुणी, बायको, पत्नी, आई, आजी होत जाते. एक शब्द उच्चारला की तिचे नाते तयार होते. स्त्री केवळ स्त्री नसतेच तिला कुठले तरी नाते समाज गुंडाळतोच. तशी नाती पुरुषालाही असतात, पण ती नाती तो झिडकारतो. स्त्री आणि पुरुषात हा फरक. आपल्या संस्कृतीने स्त्रीला बांधून घालण्यासाठी वेगवेगळे दागिने आणि नाती अंगावर घातलीत. त्यातून तिची सुटका नाही. त्याचा मुख्य घटक असतो रडणे. बस रडतेच ती. कारण कुणासाठी तरी अश्रू ढाळणे तिचे अर्थवाही होत नाही. तिने रडायचे. एखादी महान व्यक्ती ढसाढसा रडली तरी बातमी होते अश्रू ढाळण्याची. ते त्या व्यक्तीच्या पद आणि पतीवर अवलंबून आहे. म्हणून रुदालीपासून ते भोकाडा पसरणाऱ्या मुलापर्यंत रडणे असतेच. त्या अश्रूंचे जेव्हा संप्लवन होते तेव्हा डोळेपाणीदार होतात म्हणे. पण एक नक्की ज्याला क्षणात रडू फुटते तो भाग्यवान. जो साठवून ठेवतो, मोकळं रडत नाही तो तब्येतीने बिघडतो. म्हणून रडा मनसोक्त रडा. जवळच्या व्यक्तीपासून ते परमेश्वरासाठी जरूर रडा. त्याचा एक अश्रू पुनर्निर्मिती करतो. नव्या सृजनाला जन्म घालतो. ते अश्रूंइतकेच प्रवाही, सुलभ, प्रेरणादायी, ताकदवान असते. असा एकच ताकदीचा अश्रू सगळी दु:ख सहज पुसून टाकतो. असा अश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या