शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

अश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 03:58 IST

माणूस जन्मतो तेव्हा तो एकटा, नागडा, हाडामांसाच्या अवयवांचा असतो. तो रडतो. ही त्याची जगण्याची अव्वल खूण. तो जगतो आणि एक दिवस मरतो. तेव्हा आसपासचे रडतात. म्हणजे सुरुवात रडणे आणि शेवट रडवणेने होतो.

 - किशोर पाठकमाणूस जन्मतो तेव्हा तो एकटा, नागडा, हाडामांसाच्या अवयवांचा असतो. तो रडतो. ही त्याची जगण्याची अव्वल खूण. तो जगतो आणि एक दिवस मरतो. तेव्हा आसपासचे रडतात. म्हणजे सुरुवात रडणे आणि शेवट रडवणेने होतो. गंमत पहा जन्मत: रडतो ही जिवंतपणाची खूण. तो का रडतो हे कळण्यापूर्वीची खूण आणि तो संपतो तेव्हा इतर रडतात. ते त्याला कळत नाही. हे रुदन त्याच्या दृष्टीने व्यर्थ असते. तो एकतर मुक्त झालेला जगण्यामरण्यातून नाहीतर पुनर्जन्म घेऊन कुठल्यातरी मांडीवर जोजवत असलेला. माणूस प्रत्येक गोष्टीशी दुहेरी जोडलेला असतो. मग तो शत्रू असो वा मित्र. शत्रू होण्यापूर्वी तो मित्र असतोच. बघा हिंदी-चिनी भाई भाई. मित्रत्व सरते आणि तो शत्रू होतो. मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र होतो. नव्हे विरोधाकरिता केला जातो. आपण नाते गुंतवतो, गोठवतो, संपवतो किंवा थांबवतो आपल्यापुरते. म्हणजे स्त्रीचंच पहा ना. ती जन्मते तेव्हा बाळ असते. चिंगी, पिंगी, रंगी कुणीही असते. मग तिला अवयव फुटतात ती मुलगी, कुमारिका, तरुणी, बायको, पत्नी, आई, आजी होत जाते. एक शब्द उच्चारला की तिचे नाते तयार होते. स्त्री केवळ स्त्री नसतेच तिला कुठले तरी नाते समाज गुंडाळतोच. तशी नाती पुरुषालाही असतात, पण ती नाती तो झिडकारतो. स्त्री आणि पुरुषात हा फरक. आपल्या संस्कृतीने स्त्रीला बांधून घालण्यासाठी वेगवेगळे दागिने आणि नाती अंगावर घातलीत. त्यातून तिची सुटका नाही. त्याचा मुख्य घटक असतो रडणे. बस रडतेच ती. कारण कुणासाठी तरी अश्रू ढाळणे तिचे अर्थवाही होत नाही. तिने रडायचे. एखादी महान व्यक्ती ढसाढसा रडली तरी बातमी होते अश्रू ढाळण्याची. ते त्या व्यक्तीच्या पद आणि पतीवर अवलंबून आहे. म्हणून रुदालीपासून ते भोकाडा पसरणाऱ्या मुलापर्यंत रडणे असतेच. त्या अश्रूंचे जेव्हा संप्लवन होते तेव्हा डोळेपाणीदार होतात म्हणे. पण एक नक्की ज्याला क्षणात रडू फुटते तो भाग्यवान. जो साठवून ठेवतो, मोकळं रडत नाही तो तब्येतीने बिघडतो. म्हणून रडा मनसोक्त रडा. जवळच्या व्यक्तीपासून ते परमेश्वरासाठी जरूर रडा. त्याचा एक अश्रू पुनर्निर्मिती करतो. नव्या सृजनाला जन्म घालतो. ते अश्रूंइतकेच प्रवाही, सुलभ, प्रेरणादायी, ताकदवान असते. असा एकच ताकदीचा अश्रू सगळी दु:ख सहज पुसून टाकतो. असा अश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या