शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 03:58 IST

माणूस जन्मतो तेव्हा तो एकटा, नागडा, हाडामांसाच्या अवयवांचा असतो. तो रडतो. ही त्याची जगण्याची अव्वल खूण. तो जगतो आणि एक दिवस मरतो. तेव्हा आसपासचे रडतात. म्हणजे सुरुवात रडणे आणि शेवट रडवणेने होतो.

 - किशोर पाठकमाणूस जन्मतो तेव्हा तो एकटा, नागडा, हाडामांसाच्या अवयवांचा असतो. तो रडतो. ही त्याची जगण्याची अव्वल खूण. तो जगतो आणि एक दिवस मरतो. तेव्हा आसपासचे रडतात. म्हणजे सुरुवात रडणे आणि शेवट रडवणेने होतो. गंमत पहा जन्मत: रडतो ही जिवंतपणाची खूण. तो का रडतो हे कळण्यापूर्वीची खूण आणि तो संपतो तेव्हा इतर रडतात. ते त्याला कळत नाही. हे रुदन त्याच्या दृष्टीने व्यर्थ असते. तो एकतर मुक्त झालेला जगण्यामरण्यातून नाहीतर पुनर्जन्म घेऊन कुठल्यातरी मांडीवर जोजवत असलेला. माणूस प्रत्येक गोष्टीशी दुहेरी जोडलेला असतो. मग तो शत्रू असो वा मित्र. शत्रू होण्यापूर्वी तो मित्र असतोच. बघा हिंदी-चिनी भाई भाई. मित्रत्व सरते आणि तो शत्रू होतो. मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र होतो. नव्हे विरोधाकरिता केला जातो. आपण नाते गुंतवतो, गोठवतो, संपवतो किंवा थांबवतो आपल्यापुरते. म्हणजे स्त्रीचंच पहा ना. ती जन्मते तेव्हा बाळ असते. चिंगी, पिंगी, रंगी कुणीही असते. मग तिला अवयव फुटतात ती मुलगी, कुमारिका, तरुणी, बायको, पत्नी, आई, आजी होत जाते. एक शब्द उच्चारला की तिचे नाते तयार होते. स्त्री केवळ स्त्री नसतेच तिला कुठले तरी नाते समाज गुंडाळतोच. तशी नाती पुरुषालाही असतात, पण ती नाती तो झिडकारतो. स्त्री आणि पुरुषात हा फरक. आपल्या संस्कृतीने स्त्रीला बांधून घालण्यासाठी वेगवेगळे दागिने आणि नाती अंगावर घातलीत. त्यातून तिची सुटका नाही. त्याचा मुख्य घटक असतो रडणे. बस रडतेच ती. कारण कुणासाठी तरी अश्रू ढाळणे तिचे अर्थवाही होत नाही. तिने रडायचे. एखादी महान व्यक्ती ढसाढसा रडली तरी बातमी होते अश्रू ढाळण्याची. ते त्या व्यक्तीच्या पद आणि पतीवर अवलंबून आहे. म्हणून रुदालीपासून ते भोकाडा पसरणाऱ्या मुलापर्यंत रडणे असतेच. त्या अश्रूंचे जेव्हा संप्लवन होते तेव्हा डोळेपाणीदार होतात म्हणे. पण एक नक्की ज्याला क्षणात रडू फुटते तो भाग्यवान. जो साठवून ठेवतो, मोकळं रडत नाही तो तब्येतीने बिघडतो. म्हणून रडा मनसोक्त रडा. जवळच्या व्यक्तीपासून ते परमेश्वरासाठी जरूर रडा. त्याचा एक अश्रू पुनर्निर्मिती करतो. नव्या सृजनाला जन्म घालतो. ते अश्रूंइतकेच प्रवाही, सुलभ, प्रेरणादायी, ताकदवान असते. असा एकच ताकदीचा अश्रू सगळी दु:ख सहज पुसून टाकतो. असा अश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या