शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

वारी सुखेनैव होऊ द्या

By admin | Updated: June 29, 2017 00:56 IST

पंढरपूरची आषाढी वारी जवळ आली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून संत-सज्जनांच्या पालख्यांनी पंढरीची वाट धरली आहे. त्यांच्यासोबत लाखो वारकरी ऊन

पंढरपूरची आषाढी वारी जवळ आली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून संत-सज्जनांच्या पालख्यांनी पंढरीची वाट धरली आहे. त्यांच्यासोबत लाखो वारकरी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता झपझप पावले उचलत आहेत. ‘एक गाऊ विठु तुझे नाम आणिकाचे काम नाही’ या संतवचनाप्रमाणे केवळ आणि केवळ विठुचा ध्यास लागलेले वारकरी येणाऱ्या सर्व संकटांचा आनंदाने प्रतिकार करत भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरवत टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत वाटचाल करीत आहेत. एवढेच काय त्याला स्वत:च्या पोटाचीही चिंता नसते. मुखाने हरिनाम गात निघालेल्या वारकऱ्याच्या मुखात दोन घास घालणारे श्रद्धाळू जागोजाग भेटतात. त्यांंच्यापुढे हात पसरण्यात वारकऱ्याला कधीच कमीपणा वाटत नाही. गरजेपुरते पोटात ढकलणे आणि अखंड हरिनाम घेत वाटचाल करणे एवढेच त्याला माहीत असते. गावोगावचे प्रतिष्ठित, गरीब-श्रीमंत यांच्याशी त्याला काही देणे-घेणे नसते. काही शक्ती आता वारकऱ्यांचेही लक्ष विचलित करू लागल्या आहेत. गावागावात पालखी येते तेव्हा घोषणा, आरोळ्या देऊन गणपती उत्सवाप्रमाणे पालख्यांचे स्वागत करणे, फटाके वाजवणे, आमच्यासाठी पालखी थांबवा म्हणणे, मानकऱ्यांशी हुज्जत घालणे, आदी प्रकार घडत आहेत. पण वारकरी त्याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. आपण गावात पालखीचे स्वागत करतो म्हणजे नेमके काय करतो हेच गावोगावच्या पुढाऱ्यांना कळत नाही. माझ्या संपूर्ण कुटुंबाचे अन् नातलगांचे दर्शन होईपर्यंत पालखी थांबून ठेवण्याचा आग्रह एकापुरता मर्यादित नसून लाखो लोकांचा सोहळा त्यासाठी थांबला जातो, याची कल्पना यायला हवी. भल्या सकाळी निघालेला पालखी सोहळा म्हणजे पादुका विसावल्याशिवाय बसायचे नाही, असा वारकऱ्यांचा नियम असतो. त्यामुळे किती वाजता निघायचे अन् किती वाजता पोहोचायचे हे ठरलेले असते. त्यामुळे वाटेतल्या भाविकांच्या भावनांची कदर करत बसले तर पंढरपूरपर्यंत पोहोचणेच कठीण आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखीसह काही सोहळ्यात रिंगणाचा खेळ होतो. तो वारकऱ्यांचा आनंदाचा खेळ असतो. तो प्रेक्षकांनी फक्त पहावा, अशी अपेक्षा असते. पण काही अतिउत्साही भाविक वारकऱ्यांच्या खेळात व्यत्यय आणतात. रिंगणाचाही बऱ्याच वेळा आनंद हिरावून घेतात. वारीच्या वाटेवर कधीही तुम्हाला चिडचिड, शिवीगाळी किंवा बाचाबाची पाहायला मिळत नाही. १५-२० दिवसांची वारी वारकरी आनंदमयी करतो, पण गावोगावचे अतिउत्साही कार्यकर्ते त्यामध्ये व्यत्यय आणतात. तसे न होऊ देता वारकऱ्यांना त्यांच्या मार्गाने व परंपरेने जाऊ द्या. त्यांची वारी सुखेनैव वारी होऊ द्या.