शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वारी सुखेनैव होऊ द्या

By admin | Updated: June 29, 2017 00:56 IST

पंढरपूरची आषाढी वारी जवळ आली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून संत-सज्जनांच्या पालख्यांनी पंढरीची वाट धरली आहे. त्यांच्यासोबत लाखो वारकरी ऊन

पंढरपूरची आषाढी वारी जवळ आली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून संत-सज्जनांच्या पालख्यांनी पंढरीची वाट धरली आहे. त्यांच्यासोबत लाखो वारकरी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता झपझप पावले उचलत आहेत. ‘एक गाऊ विठु तुझे नाम आणिकाचे काम नाही’ या संतवचनाप्रमाणे केवळ आणि केवळ विठुचा ध्यास लागलेले वारकरी येणाऱ्या सर्व संकटांचा आनंदाने प्रतिकार करत भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरवत टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत वाटचाल करीत आहेत. एवढेच काय त्याला स्वत:च्या पोटाचीही चिंता नसते. मुखाने हरिनाम गात निघालेल्या वारकऱ्याच्या मुखात दोन घास घालणारे श्रद्धाळू जागोजाग भेटतात. त्यांंच्यापुढे हात पसरण्यात वारकऱ्याला कधीच कमीपणा वाटत नाही. गरजेपुरते पोटात ढकलणे आणि अखंड हरिनाम घेत वाटचाल करणे एवढेच त्याला माहीत असते. गावोगावचे प्रतिष्ठित, गरीब-श्रीमंत यांच्याशी त्याला काही देणे-घेणे नसते. काही शक्ती आता वारकऱ्यांचेही लक्ष विचलित करू लागल्या आहेत. गावागावात पालखी येते तेव्हा घोषणा, आरोळ्या देऊन गणपती उत्सवाप्रमाणे पालख्यांचे स्वागत करणे, फटाके वाजवणे, आमच्यासाठी पालखी थांबवा म्हणणे, मानकऱ्यांशी हुज्जत घालणे, आदी प्रकार घडत आहेत. पण वारकरी त्याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. आपण गावात पालखीचे स्वागत करतो म्हणजे नेमके काय करतो हेच गावोगावच्या पुढाऱ्यांना कळत नाही. माझ्या संपूर्ण कुटुंबाचे अन् नातलगांचे दर्शन होईपर्यंत पालखी थांबून ठेवण्याचा आग्रह एकापुरता मर्यादित नसून लाखो लोकांचा सोहळा त्यासाठी थांबला जातो, याची कल्पना यायला हवी. भल्या सकाळी निघालेला पालखी सोहळा म्हणजे पादुका विसावल्याशिवाय बसायचे नाही, असा वारकऱ्यांचा नियम असतो. त्यामुळे किती वाजता निघायचे अन् किती वाजता पोहोचायचे हे ठरलेले असते. त्यामुळे वाटेतल्या भाविकांच्या भावनांची कदर करत बसले तर पंढरपूरपर्यंत पोहोचणेच कठीण आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखीसह काही सोहळ्यात रिंगणाचा खेळ होतो. तो वारकऱ्यांचा आनंदाचा खेळ असतो. तो प्रेक्षकांनी फक्त पहावा, अशी अपेक्षा असते. पण काही अतिउत्साही भाविक वारकऱ्यांच्या खेळात व्यत्यय आणतात. रिंगणाचाही बऱ्याच वेळा आनंद हिरावून घेतात. वारीच्या वाटेवर कधीही तुम्हाला चिडचिड, शिवीगाळी किंवा बाचाबाची पाहायला मिळत नाही. १५-२० दिवसांची वारी वारकरी आनंदमयी करतो, पण गावोगावचे अतिउत्साही कार्यकर्ते त्यामध्ये व्यत्यय आणतात. तसे न होऊ देता वारकऱ्यांना त्यांच्या मार्गाने व परंपरेने जाऊ द्या. त्यांची वारी सुखेनैव वारी होऊ द्या.