शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहरांच्या स्पर्धेने शिकवलेले धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:21 IST

- सुलक्षणा महाजन गेली काही वर्षे भारतामधील शहरांची स्वच्छता विषयाची वार्षिक परीक्षा केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून घेतली जात आहे. ...

- सुलक्षणा महाजनगेली काही वर्षे भारतामधील शहरांची स्वच्छता विषयाची वार्षिक परीक्षा केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून घेतली जात आहे. या परीक्षेसाठी शहरांनी वर्षभरात केलेल्या कामगिरीचे तपशील केंद्र शासनाला उत्तरपत्रिकेच्या स्वरूपात सादर करावे लागतात. पाच हजार मार्कांच्या या परीक्षेत शहरांना गुण दिले जातात. त्यांची टक्केवारी काढून त्यांना चार रंग दिले जातात. हिरवा, निळा, काळा आणि लाल. आजपर्यंत भारतामधील एकाही शहराला हिरवा, म्हणजेच विशेष स्वच्छतेचा मान मिळालेला नसला तरी त्यांची होणारी प्रगती-अधोगती त्यामधून लक्षात आणून दिली जाते. परीक्षेचे गुण तीन प्रकारे दिले जातात. ४५ टक्के गुण हे प्रशासनाने दिलेल्या वर्षभरातील कामाला, त्यांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे दिले जातात. ३० टक्के गुण हे नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाशी निगडित असतात. तर उरलेले २५ टक्के गुण सातत्याने केल्या जाणाऱ्या निरीक्षणाला तसेच अचानकपणे प्रत्यक्षात केलेल्या पाहणीला दिले जातात.या परीक्षेत काही उपविषय असतात. त्यात सार्वजनिक रस्त्यांची रोजची झाडणी, घनकचरा संकलन व वाहतूक तसेच त्यावर होणारी प्रक्रिया आणि विल्हेवाट या बरोबरच हागणदारीमुक्ती, सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय यांनाही गुण असतात. माहिती संकलन, नागरिक-कर्मचारी प्रशिक्षण, सक्षमता आणि नागरिकांच्या स्वच्छतावृत्ती आणि आचरणामधील बदल अशा बाबींचाही समावेश त्यात असतो. २०१० साली ही परीक्षा सुरू केली, तेव्हा त्यात फक्त महानगरांचाच समावेश केला होता. नंतर लोकसंख्येनुसार शहरांचे चार गट करून ही परीक्षा घेतली जाऊ लागली. ह्या स्पर्धा-परीक्षेत दरवर्षी शहरांची भर पडते आहे, तसेच दरवर्षी या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत सुधारणाही होत आहे. महाराष्ट्रातील खेड्यांसाठी राबविलेले गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि त्याचे यशापयश बघून ही नगर-चाचणी सुरू झाली. २०१५ सालापासून ती नियमितपणे होते आहे.२०१८ सालच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. भारतामधील चार हजार २३७ शहरांनी त्यात भाग घेतला. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये काही शहरांनी आपला दर्जा आणि रंग टिकविण्यात यश मिळवले आहे. काही शहरांच्या गुणांमध्येही सुधारणा झाल्या आहेत; परंतु काहींच्या मार्कांमध्ये आणि क्रमवारीत पीछेहाट झाली आहे. २०१८ च्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर प्रत्येक राज्याने आणि प्रत्येक शहराने आपल्या निकालाचे विश्लेषण केले आहे. विशेषत: प्रत्येक राज्यातल्या वर्तमानपत्रांनी आपापल्या शहरांचे आणि राज्याचे प्रगतिपुस्तक मांडले आहे. या यादीमधील पहिले २० नंबर बघितले, तर गेल्या वर्षीच्या यादीमधील बहुतेक शहरांनी यंदाही आपले स्थान राखण्यात यश मिळविले आहे.विशेषत: गेली तीन वर्षे इंदूर महानगराने सातत्याने पहिला क्रमांक मिळविला आहे, याचाच अर्थ आता तेथील स्वच्छता व्यवस्थापनेत आणि लोकांच्या वृत्तीमध्ये नागरी स्वच्छतेचे भान बºयापैकी रुजले आहे. भोपाळ, चंदिगड, अंबिकापूर अशी शहरेही आपले यादीतील स्थान राखून आहेत. महाराष्ट्रातील नवी मुंबईनेही २० शहरांच्या क्रमवारीत आपले स्थान राखले आहे. मात्र, गेल्या वर्षी पहिल्या २० शहरांच्या यादीत स्थान मिळविणाºया पुण्याला आपले स्थान राखता आलेले नाही. कोल्हापूरने मात्र सोळावा क्रमांक मिळवून यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. तसेच या वर्षीच्या परीक्षेत नवी दिल्ली महापालिकेने गेल्या वर्षीचेच स्थान कायम राखले आहे.मुंबईला मात्र सातत्य राखता आलेले नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबई महापालिका घनकचरा संकलन करआकारणी करीत नाही, त्यामुळे क्रमांक खाली गेला असे एक कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे. खरे तर याचा दोष मुंबईच्या लोकप्रतिनिधींकडे जातो. मुंबई केवळ स्वच्छतेच्या बाबतीतच नाही तर एकूणच राहणीमानाच्या शर्यतीमध्ये झपाट्याने मागे पडत असल्याचे ते लक्षण आहे, असे मला वाटते.५० वर्षांपूर्वी इतर शहरे मुंबईकडे मोठ्या अपेक्षेने बघत असत. कारण मुंबई हे नागरी व्यवस्थापन क्षेत्रात अव्वल स्थान पटकावून असे. जगातील इतर प्रगत शहरांकडून नवनवीन गोष्टी, तंत्रे शिकून घेत असे; परंतु आता मात्र आर्थिक, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय सुधारणा करण्यात मुंबई सातत्याने मागे पडते आहे. प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रामधील ताण हे मुंबईच्या अस्वच्छतेचे सर्वात महत्त्वाचे कारण असावे. शहरांच्या स्वच्छता परीक्षेच्या निकालानंतर मुंबईच्या प्रशासनाने, राजकीय नेत्यांनी आणि नागरिकांनीही इंदूर शहराच्या यशाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. नगरविज्ञान क्षेत्रातील संशोधक आणि विद्यापीठांमधील तज्ज्ञांच्या मदतीने हा अभ्यास करता येईल. इंदूरकडून काय शिकता येईल, याचाही धांडोळा त्यातून घेता येईल.महाराष्ट्र शासनाने यशस्वी शहरांच्या स्वच्छता व्यवस्थेचा तपशीलवार अभ्यास करून प्रगती केलेल्या शहरांच्या यशाच्या अनुकरणासाठी राज्यातील सर्वच लहान-मोठ्या शहरांना प्रोत्साहन द्यायला हवे. केवळ याच बाबतीत नाही; तर पाणी, सांडपाणी, वाहतूक, रस्ते बांधकाम अशा सर्वच नागरी सेवांबाबत स्वत:ची परीक्षा पद्धत महाराष्ट्राने तयार करणे आवश्यक आहे. सर्वाधिक नागरी लोकसंख्येच्या राज्याची पुढची वाटचाल ही नावीन्यपूर्ण नागरी सेवांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असणार आहे.

(नगररचना तज्ज्ञ)