शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

पोटनिवडणुकांचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:01 IST

अर्थमंत्री अरूण जेटली हे २०१८-१९ चा ‘निवडणूक अर्थसंकल्प’ लोकसभेत सादर करीत असतानाच राजस्थानपासून बंगालपर्यंत झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये भाजपचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी पराभूत होत होते. राजस्थान हा भाजपचा बालेकिल्ला. त्यात वसुंधरा राजे यांचे दीर्घकाळचे सरकार अधिकारारूढ.

अर्थमंत्री अरूण जेटली हे २०१८-१९ चा ‘निवडणूक अर्थसंकल्प’ लोकसभेत सादर करीत असतानाच राजस्थानपासून बंगालपर्यंत झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये भाजपचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी पराभूत होत होते. राजस्थान हा भाजपचा बालेकिल्ला. त्यात वसुंधरा राजे यांचे दीर्घकाळचे सरकार अधिकारारूढ. त्यांच्या राजकारणासाठी त्या राज्यात ‘पद्मावत’ या सिनेमाचे राजकारणही मोठ्या प्रमाणावर आयोजित झाले. तरीही अल्वार आणि अजमेर या लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेस पक्षाने भाजपच्या उमेदवारांचा लाख-लाख मतांनी पराभव करून जिंकल्या. त्याचवेळी बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने भाजपच्या उमेदवारांचा विधानसभेच्या दोन पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यानिशी पराभव करीत त्यांना धूळ चारली. भाजपच्या घसरणीची सुरुवात प्रत्यक्ष गुजरातमध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत झाली. गुजरातचे नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदावर असताना, त्यांचे उजवे हात असणारे अमित शहा हे पक्षाध्यक्षही गुजराती असताना आणि विधानसभेत १५० जागा मिळतील याची खात्री ते दोघेही पक्षाला देत असताना त्यांच्या पक्षाला केवळ ९९ जागा मिळविता आल्या आणि काँग्रेसचे त्या विधानसभेतील संख्याबळ २० सभासदांनी वाढले. त्याचवेळी हिमाचल प्रदेशात झालेली विधानसभेची निवडणूक भाजपने जिंकली असली तरी त्याचे मताधिक्य ४६ टक्क्यावरून ३९ टक्क्यांपर्यंत खाली आले. विकासाच्या गर्जना आणि त्यांची जमिनीवरील अंमलबजावणी यात अंतर पडले की राजकीय पक्षाच्या स्थानाला सुरुंग लागतो ही लोकशाहीचीच परिणती आहे. त्याचवेळी एकीकडे विकासाचे अर्थकारण सांगत असताना दुसरीकडे धर्माचे छुपे समाजकारण करणे आणि समाजात दुहीचे वातावरण उभे करणे या विसंगतीचा फटकाही निवडणुकीत बसला आहे. त्यातून मोदींच्या सरकारचे प्रशासन दिवसेंदिवस एकछत्री होताना देशाला दिसले आहे. संसदेला भाव नाही, पक्षाला कोणी मोजत नाही. मंत्रिमंडळ शिक्क्यापुरते वापरले जाते आणि मोदी प्रशासनाधिकाºयांच्या मदतीने सरकार व अमित शहांच्या साहाय्याने पक्ष चालवितात. हे वास्तव देशाएवढेच पक्षाला, संघाला व जनतेलाही दिसावे असे आहे. असे राजकारण क्रमश: जनतेपासून दूरही जात असते. पोटनिवडणुकांचे आताचे निकाल ही याचीच साक्ष देणारे आहे. यापूर्वी मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा, लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकाही भाजपने अशाच गमविल्या आहेत. त्यामुळे तो पक्ष राजकारण व अर्थकारणाचा नाद सोडून पुन: रामकारणाच्या मागे जाताना दिसत आहे. ४० वर्षानंतर त्याला बोफोर्स तोफांच्या खटल्याची आठवण होत आहे आणि याचवेळी गांधीजींच्या खुनाचा खटला आता उकरून काढण्याची तयारी त्याने चालविली आहे. याआधी त्याने सुभाषबाबंूच्या नावाचे राजकारणही करून पाहिले पण त्याला बंगालमध्येच साथ मिळाली नाही. गाधीजींच्या खटल्यामुळे गुजरातमध्ये गेलेले बळ आपण पुन: मिळवू शकतो की काय हे त्याला आता आजमावायचे आहे. शिवाय ‘राम’ त्यांच्या हाताशीच आहे. मात्र रामाच्या विषयाचे श्रेय मोदी आणि शहा यांना मिळण्याऐवजी ते आदित्यनाथांना मिळेल आणि तसे ते मिळणे मोदींना मानवणारे नाही. विकासाचे राजकारण करणाºयांना जात, धर्म, भाषा वगैरेंच्या कुबड्या घेऊन चालत नाही. त्यांच्या बोलण्यातला विकास जमिनीवर दिसावा लागतो आणि जनतेच्या अनुभवाला यावा लागतो. बेकारी वाढत असताना, भाववाढ आभाळाला टेकत असताना, कारखाने बंद पडत असताना आणि शेतकºयांच्या आत्महत्या वाढत असताना आर्थिक आकडेवारीचे गौडबंगाल लोकांना नुसते ऐकविण्यात अर्थ नसतो. मग राजस्थान विरोधात जात असते. बंगालचा विरोध वाढला असतो आणि गुजरात व हिमाचलसह मध्य प्रदेशातील पक्षबळ कमी होत असते. सबब विकासाला पर्याय नाही आणि तो जनतेपर्यंत नेण्याखेरीज पक्षाजवळ दुसरा मार्ग नसतो.

टॅग्स :Rajasthanराजस्थानElectionनिवडणूकBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस