शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोटचा धडा

By admin | Updated: January 5, 2016 00:09 IST

पंतप्रधान मोदी यांच्या लाहोर भेटीमुळे भारत-पाक यांचे संबंध सुधारण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, ती प्रत्यक्षात येऊ नये, यासाठी दहशतवादी संघटना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार

पंतप्रधान मोदी यांच्या लाहोर भेटीमुळे भारत-पाक यांचे संबंध सुधारण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, ती प्रत्यक्षात येऊ नये, यासाठी दहशतवादी संघटना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार, हे अपेक्षितच होते. त्यामुळे हवाई दलाच्या पठाणकोट तळावर दहशतवादी हल्ला झाला, त्याबद्दल आश्चर्य वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र या हल्ल्याला तोंड देताना भारतीय राज्यसंस्थेचा जो कमकुवतपणा दिसून आला आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रिया व सुरक्षा यंत्रणांची संरचना यांतील ज्या त्रुटी उघड होत आहेत, त्या निश्चितच अनपेक्षित होत्या. चर्चा कसली करता, असा सूर या हल्ल्यानंतर देशातून निघू लागला आहे. पण चर्चा करीत राहणे आवश्यकच आहे. जगभर जेथे जेथे असे संघर्ष सुरू असतात, तेथे चर्चा होतच असते. पण संघर्षात सहभागी असलेले परस्पर विरोधी देश निकराने लढतही असतात आणि त्यासाठी लागेल ती सर्व तयारी करीत राहिलेले असतात. अगदी व्हिएतनाम युद्धापासून ते सध्या गाजत असलेल्या सीरियातील संघर्षापर्यंत नुसती नजर टाकली, तरी हे स्पष्ट होते. व्हिएतनाम युद्धाचींंंंंं धुमश्चक्र ी उडालेली असताना अमेरिकेतर्फे हेन्री किसिंजर व उत्तर व्हिएतनामतर्फे ल-डक-थो पॅरिस येथे नियमितपणे चर्चा करीत राहिले होते. असाच प्रकार अमेरिका व सोविएत युनियन यांच्या शीतयुद्धाच्या काळात झाला होता. दोन्ही देश एकमेकाना नामोहरम करण्यासाठी सतत डावपेच लढवत असत. पण त्याचवेळी मध्यस्थांमार्फत चर्चाही करीत राहत. त्याचवेळी आपली लष्करी क्षमता वाढवत आणि जगभरातील इतर देश आपल्या पाठीशी कसे उभे राहतील, यासाठी रणनीतीही आखत राहत असत. आज सीरियातील संघर्ष इतका पराकोटीला गेला आहे, तरीही त्या देशाच्या प्रतिनिधींशी अमेरिका व इतर देश आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे चर्चा करीतच आहे. लक्षात घ्यायचा मुद्दा इतकाच की, अशी चर्चा करावीच लागते. पण चर्चा केली, म्हणजे सामर्थ्य व क्षमता वाढवत राहण्याला लगाम घालायचा किंवा आपली दक्षता वा सुरक्षा ढिली ठेवायची, असा होत नाही. नेमके येथेच आपण कमी पडत आलो आहोत. पठाणकोट हल्ल्याच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. होते आहे काय की, आपण फक्त वाचाळपणा करीत राहतो. भाषणे देत राहतो. शांततेची महती सांगत राहतो. पण शांतता हवी असेल व युद्ध नको असेल, तर तसे ते खेळावयास लावणाऱ्याला, ‘तुम्ही हरू शकता’, हे जाणवेल इतकी चोख तयारी करीत राहावे लागते. नुसते हवेत विरणारे शब्द काही कामी येत नाहीत. अटलबिहारी वाजपेयी लाहोरला बसने गेले. लगेच कारगील झाले. पाक सैन्याच्या तुकड्या कारगील भागात आल्याचे आपल्याला उशिराने कळले. मग कंदहारचे विमान अपहरण प्रकरण घडले. त्यावेळी सोडाव्या लागलेल्या मसूद अझर या दहशतवाद्याने स्थापन केलेल्या ‘जैश-ए--महमद’ या संघटनेनेच पठाणकोट येथे हल्ला केला आहे. पुढे संसदेवर हल्ला झाला. ‘अभी आर या पार की लढाई’, असे वाजपेयी यांनी जाहीर केले. मग मुंबईवर हल्ला झाला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची तीच भाषा व तसाच कमकुवत ढिला प्रतिसाद. आताही पठाणकोट येथे तेच घडत आहे. हल्ला होण्याआधी निदान २० तास दहशतवाद्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गाडी ताब्यात घेऊन त्याला व त्याच्या अंगरक्षकाला बांधून रस्त्यावर टाकून दिले होते आणि या अधिकाऱ्याच्या मित्राला सोबत नेऊन नंतर त्याचा गळा चिरून टाकला होता. हा मित्र जगला. पण ही माहिती त्याने व या अधिकाऱ्याने पोलिसांना दिली, तरी त्यावर सुरूवातीस विश्वास ठेवण्यात आला नाही; कारण म्हणे पंजाब पोलिसात तो अधिकारी रंगेल म्हणून ओळखला जातो. शिवाय दहशतवादी जेथून आले, तो भाग अमली पदर्थांच्या तस्करीचा म्हणून ओळखला जातो. पंजाबातील अनेक मंत्री व अकाली दलाचे नेते या तस्करीत अडकले असल्याचे आरोप सतत होत आले आहेत. या गोष्टी महत्वाच्या आहेत; कारण कायदा व सुव्यवस्था ही असे हल्ले रोखण्याची पूर्वअट असते. तीच जर पुरी होत नसेल, तर आपल्या सर्व सुरक्षा उपायात मोठीच त्रुटी राहणार. हल्ला हवाईदलाच्या तळावर झाला. पण ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’चे (एनएसजी) कमांडो पथक पाठवण्यात आले. वस्तुत: हे सगळे ‘आॅपरेशन’ लष्कराच्या हाती द्यायला हवे होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे पंजाब पोलीस, एनएसजी आणि लष्कर व हवाईदल अशा चार यंत्रणा सुसूत्रतेच्या अभावात हल्ल्याला तोंड देत राहिल्या. त्यामुळे दहशतवादी किती होते, ते सर्व मारले गेले काय, येथपासून ते किती जवान व अधिकारी शहीद वा जखमी झाले, येथपर्यंत तपशील व माहिती यात गोंधळ उडत गेला. त्यात देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह काही ‘ट्विट’ करीत होते आणि इतर सरकारी यंत्रणा आणखी काही सांगत होत्या. इतका सगळा घोळ झाल्यावर दहशतवाद्यांना निपटण्यास वेळ लागत गेला, हे ओघानेच येते. शांततेसाठी युद्ध खेळण्याचे सामर्थ्य मिळवावे लागते आणि समाजमनाचीही त्यासाठी योग्य ती मशागत करावी लागते, हाच धडा पठाणकोट हल्ल्याने पुन्हा एकदा दिला आहे. तो आपण जितक्या लवकर अंगी बाणवू तेवढा पोकळ शब्दांपलीकडचा खरा ‘करारा’ जबाब पाकला आपण देऊ शकू.