शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

पठाणकोटचा धडा

By admin | Updated: January 5, 2016 00:09 IST

पंतप्रधान मोदी यांच्या लाहोर भेटीमुळे भारत-पाक यांचे संबंध सुधारण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, ती प्रत्यक्षात येऊ नये, यासाठी दहशतवादी संघटना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार

पंतप्रधान मोदी यांच्या लाहोर भेटीमुळे भारत-पाक यांचे संबंध सुधारण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, ती प्रत्यक्षात येऊ नये, यासाठी दहशतवादी संघटना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार, हे अपेक्षितच होते. त्यामुळे हवाई दलाच्या पठाणकोट तळावर दहशतवादी हल्ला झाला, त्याबद्दल आश्चर्य वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र या हल्ल्याला तोंड देताना भारतीय राज्यसंस्थेचा जो कमकुवतपणा दिसून आला आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रिया व सुरक्षा यंत्रणांची संरचना यांतील ज्या त्रुटी उघड होत आहेत, त्या निश्चितच अनपेक्षित होत्या. चर्चा कसली करता, असा सूर या हल्ल्यानंतर देशातून निघू लागला आहे. पण चर्चा करीत राहणे आवश्यकच आहे. जगभर जेथे जेथे असे संघर्ष सुरू असतात, तेथे चर्चा होतच असते. पण संघर्षात सहभागी असलेले परस्पर विरोधी देश निकराने लढतही असतात आणि त्यासाठी लागेल ती सर्व तयारी करीत राहिलेले असतात. अगदी व्हिएतनाम युद्धापासून ते सध्या गाजत असलेल्या सीरियातील संघर्षापर्यंत नुसती नजर टाकली, तरी हे स्पष्ट होते. व्हिएतनाम युद्धाचींंंंंं धुमश्चक्र ी उडालेली असताना अमेरिकेतर्फे हेन्री किसिंजर व उत्तर व्हिएतनामतर्फे ल-डक-थो पॅरिस येथे नियमितपणे चर्चा करीत राहिले होते. असाच प्रकार अमेरिका व सोविएत युनियन यांच्या शीतयुद्धाच्या काळात झाला होता. दोन्ही देश एकमेकाना नामोहरम करण्यासाठी सतत डावपेच लढवत असत. पण त्याचवेळी मध्यस्थांमार्फत चर्चाही करीत राहत. त्याचवेळी आपली लष्करी क्षमता वाढवत आणि जगभरातील इतर देश आपल्या पाठीशी कसे उभे राहतील, यासाठी रणनीतीही आखत राहत असत. आज सीरियातील संघर्ष इतका पराकोटीला गेला आहे, तरीही त्या देशाच्या प्रतिनिधींशी अमेरिका व इतर देश आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे चर्चा करीतच आहे. लक्षात घ्यायचा मुद्दा इतकाच की, अशी चर्चा करावीच लागते. पण चर्चा केली, म्हणजे सामर्थ्य व क्षमता वाढवत राहण्याला लगाम घालायचा किंवा आपली दक्षता वा सुरक्षा ढिली ठेवायची, असा होत नाही. नेमके येथेच आपण कमी पडत आलो आहोत. पठाणकोट हल्ल्याच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. होते आहे काय की, आपण फक्त वाचाळपणा करीत राहतो. भाषणे देत राहतो. शांततेची महती सांगत राहतो. पण शांतता हवी असेल व युद्ध नको असेल, तर तसे ते खेळावयास लावणाऱ्याला, ‘तुम्ही हरू शकता’, हे जाणवेल इतकी चोख तयारी करीत राहावे लागते. नुसते हवेत विरणारे शब्द काही कामी येत नाहीत. अटलबिहारी वाजपेयी लाहोरला बसने गेले. लगेच कारगील झाले. पाक सैन्याच्या तुकड्या कारगील भागात आल्याचे आपल्याला उशिराने कळले. मग कंदहारचे विमान अपहरण प्रकरण घडले. त्यावेळी सोडाव्या लागलेल्या मसूद अझर या दहशतवाद्याने स्थापन केलेल्या ‘जैश-ए--महमद’ या संघटनेनेच पठाणकोट येथे हल्ला केला आहे. पुढे संसदेवर हल्ला झाला. ‘अभी आर या पार की लढाई’, असे वाजपेयी यांनी जाहीर केले. मग मुंबईवर हल्ला झाला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची तीच भाषा व तसाच कमकुवत ढिला प्रतिसाद. आताही पठाणकोट येथे तेच घडत आहे. हल्ला होण्याआधी निदान २० तास दहशतवाद्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गाडी ताब्यात घेऊन त्याला व त्याच्या अंगरक्षकाला बांधून रस्त्यावर टाकून दिले होते आणि या अधिकाऱ्याच्या मित्राला सोबत नेऊन नंतर त्याचा गळा चिरून टाकला होता. हा मित्र जगला. पण ही माहिती त्याने व या अधिकाऱ्याने पोलिसांना दिली, तरी त्यावर सुरूवातीस विश्वास ठेवण्यात आला नाही; कारण म्हणे पंजाब पोलिसात तो अधिकारी रंगेल म्हणून ओळखला जातो. शिवाय दहशतवादी जेथून आले, तो भाग अमली पदर्थांच्या तस्करीचा म्हणून ओळखला जातो. पंजाबातील अनेक मंत्री व अकाली दलाचे नेते या तस्करीत अडकले असल्याचे आरोप सतत होत आले आहेत. या गोष्टी महत्वाच्या आहेत; कारण कायदा व सुव्यवस्था ही असे हल्ले रोखण्याची पूर्वअट असते. तीच जर पुरी होत नसेल, तर आपल्या सर्व सुरक्षा उपायात मोठीच त्रुटी राहणार. हल्ला हवाईदलाच्या तळावर झाला. पण ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’चे (एनएसजी) कमांडो पथक पाठवण्यात आले. वस्तुत: हे सगळे ‘आॅपरेशन’ लष्कराच्या हाती द्यायला हवे होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे पंजाब पोलीस, एनएसजी आणि लष्कर व हवाईदल अशा चार यंत्रणा सुसूत्रतेच्या अभावात हल्ल्याला तोंड देत राहिल्या. त्यामुळे दहशतवादी किती होते, ते सर्व मारले गेले काय, येथपासून ते किती जवान व अधिकारी शहीद वा जखमी झाले, येथपर्यंत तपशील व माहिती यात गोंधळ उडत गेला. त्यात देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह काही ‘ट्विट’ करीत होते आणि इतर सरकारी यंत्रणा आणखी काही सांगत होत्या. इतका सगळा घोळ झाल्यावर दहशतवाद्यांना निपटण्यास वेळ लागत गेला, हे ओघानेच येते. शांततेसाठी युद्ध खेळण्याचे सामर्थ्य मिळवावे लागते आणि समाजमनाचीही त्यासाठी योग्य ती मशागत करावी लागते, हाच धडा पठाणकोट हल्ल्याने पुन्हा एकदा दिला आहे. तो आपण जितक्या लवकर अंगी बाणवू तेवढा पोकळ शब्दांपलीकडचा खरा ‘करारा’ जबाब पाकला आपण देऊ शकू.