शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा

By admin | Updated: January 21, 2017 00:07 IST

मानवा-मानवात कोणताही फरक नसावा; स्त्री सकट प्रत्येक व्यक्तीचा माणूस म्हणून विचार व्हावा

मानवा-मानवात कोणताही फरक नसावा; स्त्री सकट प्रत्येक व्यक्तीचा माणूस म्हणून विचार व्हावा, हे विचार आधुनिक काळात महात्मा फुले, महर्षी कर्वे, न्यायमूर्ती रानडे, आगरकर व भांडारकर यांनी अधोरेखित केले. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जगण्यातून स्त्री मुक्तीच्या त्या आद्य प्रणेत्या होत्या हे सिद्ध केले. त्या पहिल्या भारतीय शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका आणि ‘अर्वाचीन मराठी काव्याच्या जननी’ आहेत. सन १८५४ मध्ये त्यांचा ‘काव्यफुले’ हा ४१ कवितांचा संग्रह केशवसुतांच्या अंदाजे ३० वर्षे आधी प्रसिद्ध झाला. भारतातील प्रबोधन युगात नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्याकडे सावित्रीबार्इंचा ३ जानेवारी १८३१ रोजी जन्म झाला. १८४० साली जोतिबांशी त्यांचा विवाह झाला. थॉमस पेन यांच्या ‘जस्टिस अँड ह्युमॅनिटी’ तसेच ‘राईटस् आॅफ मॅन’ या ग्रंथांनी घडलेल्या जोतिबांना स्त्रीच्या बुद्धीची, भावनांची, व्यक्तिमत्त्वाची जाणीव होती. त्यांच्याच प्रेरणेने १८४७ मध्ये सावित्रीबाई नॉर्मल स्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. जोतिराव व सावित्रीबाई ही दोन स्वतंत्र प्रस्फुरणे होती. फुले दाम्पत्याने भारतातील पहिली मुलींची शाळा १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केली. पुरोगामी भिड्यांनी शाळेसाठी भाडे न घेता उलट रु. १०१ देणगी म्हणून दिले. तसेच दरमहा पाच रुपयांची मदत शाळेला देऊ केली, असा उल्लेख आढळतो. या आधी मिशनरींनी मुलींची शाळा सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. १८२० साली मिस कुकने बंगालमध्ये आणि नंतर त्याच बाई मिसेस विल्सन झाल्यावर पुण्याच्या मंगळवारी परिसरात स्कॉटिश मिशनतर्फे शाळा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.भिडे वाड्यातील शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या सावित्रीबार्इंनी समाजाकडून होणाऱ्या अवमानाला धैर्याने तोंड दिले. त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. १८ ठिकाणी शाळा सुरू करणाऱ्या जोतिबा व सावित्रीबार्इंचा या शिक्षण कार्यासाठी १२ फेब्रुवारी १८५३ ला मेजर कँडी यांनी विश्रामवाड्यात मोठा सत्कार केला.१८५३ लाच फुले वाड्यात भ्रूणहत्त्या प्रतिबंधक गृह त्यांनी सुरू केले. १८७३ साली अडचणीत आलेल्या काशीतार्इंचे त्यांनी बाळंतपण केले आणि यशवंतराव या तिच्या मुलाचा पुत्र म्हणून सांभाळ केला. १८०६ च्या दुष्काळात सत्यशोधक समाजातर्फे दोन हजार मुले व मुलींची जेवण व्यवस्था केली होती.नापितांचे हृदयपरिवर्तन करून केशवपनाची क्रूर पद्धत त्यांनी बंद केली. शेतकरी व मजूर स्त्री-पुरुषांसाठी प्रौढ शिक्षण देणाऱ्या रात्रीच्या शाळा आणि १८६४ ला अनाथ बालकाश्रम काढण्याचे अमोल कार्य त्यांनी केले.१८९० ला जोतिबांच्या निधनानंतर अखंड कार्यरत असणाऱ्या या करुणामय मूर्तीचे प्लेग पीडितांची सेवा करताना निधन झाले.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे