शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

अहंकार सोडावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 06:25 IST

मध्ययुगीन कालखंडातील सर्वच प्रांतांतील संतांनी स्वत:मधील ‘अहंकाराचा’ जाणीवपूर्वक त्याग केला, म्हणूनच ते आपल्या कालखंडात का असेना समाजाच्या मानगुटीवरील अहंकाराचे भूत उतरवू शकले.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेमध्ययुगीन कालखंडातील सर्वच प्रांतांतील संतांनी स्वत:मधील ‘अहंकाराचा’ जाणीवपूर्वक त्याग केला, म्हणूनच ते आपल्या कालखंडात का असेना समाजाच्या मानगुटीवरील अहंकाराचे भूत उतरवू शकले. जोपर्यंत मीपणाची जाणीव सरत नाही, तोपर्यंत दिव्यत्वाची आणि देवत्वाची प्रचिती येऊ शकत नाही. मीपणा हाच मोक्षमार्गातील सर्वांत मोठा अडथळा आहे. ज्ञानाचा आणि अहंकाराचा जवळचा संबंध आहे. एकदा ज्ञानाला अहंकाराची नशा चढली, की स्वत:ला स्वत:भोवती गिरक्या घालायला लावून ती जगाला तुच्छ लेखायला लावते. कर्तेपणाची ही लागण ज्ञानी म्हणवून घेणाऱ्यालाही उद्धट बनविते. ज्ञानाचा उन्मादर् सामान्यांच्या जीवनात ज्ञानेच्छेच्या कोवळ्या किरणांऐवजी अंधकाराचेच काळेकुट्ट मेघ निर्माण करतो, हे तथाकथित आचार्य, शास्त्री, पंडित, गुरू, स्वयंघोषित जगद्गुरू ईश्वराचे प्रति अवतार यांनी लक्षात ठेवावे. अहंकाराच्या विलक्षण मिठीचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात -नवल अहंकाराचे गोठी ।विषेश न लगे अज्ञान्यांचे पाठी ।सज्ञानाच्या झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ।।ज्ञानी माणसाच्या कंठाला अहंकार झोंबला की, तो त्याला नाना संकटाने नाचवितो. आम्ही तर रात्रंदिवस माझ्या व मीपणाच्या पोषणासाठी अहंकाराची मदिरा बरोबरच घेऊन फिरत आहोत. तर दुसºया बाजूला कुणी मठ, मंदिरासाठी शिष्याची पिलावळ वाढविण्यासाठी स्वत:च्या पारमार्थिक प्रदर्शनासाठी अहंकाराचे अदृश्य पोषण करतो. स्वत:ला पारमार्थिक म्हणवून घेणारी व अहंता-ममतेचा त्याग न करणारी मंडळी अहंकाराचे अदृश्य पोषक आहेत आणि हे अदृश्य पोषक दृश्यापेक्षा खूपच घातक आहेत.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक