शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निदान क्रिकेटला (तरी) धर्मापासून दूर राहू  द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 07:08 IST

cricket : जे कधीही देशात घडलं नाही, ते आता घडतं आहे. धार्मिक विखाराच्या वणव्यात देशाला एकतेच्या सूत्रात जोडणारा क्रिकेट नावाचा धागा जळता कामा नये!

- मेघना ढोके(मुख्य उपसंपादक,लोकमत)

‘मुझे स्टेट के नाम ना सुनाई देते है, ना दिखाई देते है... सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है... इं-डि-या!’‘चक दे  इंडिया’ सिनेमातलं  प्रशिक्षक कबीर खानच्या तोंडचं हे वाक्य. हे वाक्य सिनेमातच; एरव्ही भारतीय संघराज्यात राज्य, धर्म, जात, पोटजात, भाषा असे अनेक भेद. मात्र, या साऱ्याला या देशात जर काही अपवाद असेल तर ते म्हणजे ‘क्रिकेट’.

या खेळात मैदानावर कामगिरी करायची, भारतीय संघात अंतिम किमान १६ जणांत स्थान मिळवायचं तर ना भाईभतीजा राजकारण चालतं, ना घराणेशाही, ना धन आणि बलसत्तेचा जोर. तिथं चालते फक्त कामगिरी. त्याच कामगिरीच्या जोरावर एका प्राध्यापकाचा मुलगा तेंडुलकर नावाचा देव होतो, पंपमॅनचा मुलगा द ग्रेट धोनी होतो आणि रिक्षाचालकाचा मुलगा, आपले वडील निवर्तले तरी आपण राष्ट्रीय कामगिरीवर आहोत याचं भान् ठेवून  मैदानात उतरतो आणि देशासाठी खेळण्याचं वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून राष्ट्रगीताला उभं असताना साऱ्या दुनियेसमोर अभिमानानं डोळ्यातल्या अश्रूंना वाट करुन देतो.

भारत नावाच्या या देशाला जर कुठल्या सुत्रानं बांधलं असेल, तर ते सूत्र आहे - क्रिकेट. हातात बॅट घेऊन क्रिकेटर व्हायचं स्वप्न पाहणारा कुठल्याही जात-धर्म-पंथ-भाषेतला मुलगा आणि मुलीचं ध्येय एकच असतं -  ‘मला देशासाठी खेळायचंय!’ भारतीय क्रिकेटचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षांचा इतिहास सांगतो की, बीसीसीआयचा संघ म्हणून कुणी, कितीही नाकं मुरडली तरी क्रिकेटने या देशाला जोडून ठेवलं. भारतीय संघ खेळतो तेव्हा त्यांचा विजय-पराजय साऱ्या देशाचा असतो.

सन १९४७ ते २०२१ या दरम्यान हे वास्तव बदललं नाही. हे असं असताना या देशाच्या क्रिकेट वर्तुळात ‘धर्म’ कधी आणि कसा पोहोचला?निमित्त आहे वसीम जाफरला द्याव्या लागलेल्या राजीनाम्याचं. देशभरातल्या क्रिकेट वर्तुळाला जाफरचं क्रिकेट पॅशन, त्याची निष्ठा, त्याचं कमबॅक करणं हे सारं माहितीच आहे. त्या जाफरवर आरोप झाले की, त्याने उत्तराखंड क्रिकेट संघात धार्मिक भेदभाव करत मुस्लिम खेळाडूंना पुढे केलं, धर्माच्या आधारावर संघ निवड करण्याचा प्रयत्न केला.

उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव माहिम वर्मा यांनी तसा आरोप केला. त्यावर राजीनामा देताना जाफरने स्पष्ट केलं की, आपण धार्मिक भेदभाव केला नाही तर उत्तराखंड संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनीच ‘लायक’ नसलेल्या खेळाडूंना  संघात स्थान देत संघ निवडीत हस्तक्षेप केला! -  आता हा वाद पेटलेला आहे. माध्यमं ते समाजमाध्यमं यावर आपापले कंपू करत लोक लिहीत सुटले आहेत. मात्र, या वादाने जे आजवर कधी घडलं नव्हतं ते केलं. ते जास्त गंभीर, घातक, भयप्रद आहे. ती धोक्याची सूचना सांगते की,  पदाधिकाऱ्यांसह प्रेक्षकांनीही वेळीच भानावर येत क्रिकेटच्या ड्रेसिंग रुमपासून तरी धर्म-भेद लांब ठेवले पाहिजेत. ते इतकी वर्षे लांबच होते, म्हणून तर क्रिकेट हा ‘भारताचा’ खेळ झाला.  

आजवरचा इतिहास पहा, भारतानं स्वातंत्र्योत्तर पहिला कसोटी सामना खेळला तेव्हा कप्तान होते नवाब इफ्तीकार पतौडी. भारत-पाकिस्तान फाळणी नुकतीच झालेली होती, हिंदू-मुस्लिम भेदाची जखम भळभळतच होती, पण म्हणून पतौडी कप्तान असण्याला कुणी धार्मिक रंग दिले नाहीत. (हे पतौडी म्हणजे तैमूर सैफ अली खानचे पणजोबा, माहितीस्तव!) त्यांच्यानंतर नवाब मन्सूर अली खान पतौडी भारताचा कप्तान झाला. सलीम दुराणी, दिलावर हुसेन, सय्यद किरमाणी, फारुक इंजिनिअर, अब्बास अली बेग ते झहीर खान, कैफ, मुनाफ पटेल, युसुफ आणि इरफान पठाण, मोहंमद शामी ते मोहंमद सिराज इथपर्यंत अनेक नामांकित मु्स्लीम खेळाडू भारतीय संघात खेळले आणि भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले.  

सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे मोहंमद अझरुद्दीन. नव्वदच्या भयानक अस्वस्थ दशकात अझर कप्तान होता. त्याच्यावर सामना निश्चितीचे आरोप झाले. पण अत्यंत धार्मिक असलेल्या अझरवर कधीही धार्मिक भेदभावाचे आरोप झाले नाहीत. धर्म कधीही क्रिकेटपेक्षा मोठे झाले नाहीत. जे कधीही देशात घडलं नाही, ते आता घडतं आहे. वेळीच सावरलं नाही तर धार्मिक विखाराचा हा वणवा  देशाला एकतेच्या सुत्रात जोडणाऱ्या क्रिकेट नावाच्या धाग्यालाही जाळून टाकेल. तात्कालिक वादापेक्षा हे भय मोठं आहे.  

टॅग्स :Indiaभारत