शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

पत्ते पे पत्ता

By admin | Updated: March 24, 2015 23:25 IST

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने तीन पत्ते टाकले. भाजपा सेनेबरोबर युती करणार की स्वतंत्र लढणार हा विषय बाकी आहे. दोन्ही पक्षांमध्ये खुमखुमी उघड दिसते.

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने तीन पत्ते टाकले. भाजपा सेनेबरोबर युती करणार की स्वतंत्र लढणार हा विषय बाकी आहे. दोन्ही पक्षांमध्ये खुमखुमी उघड दिसते.औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजपा या दोघांसाठी कसोटी ठरणार आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या तोंडावर सेनेने पुन्हा एकदा ‘संभाजीनगर’चा जुनाच पत्ता फेकला. या शहराचे नामांतर करून ते ‘संभाजीनगर’ करण्यात यावे, अशी घोषणा १८ एप्रिल १९९१ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी तत्कालीन महापौर सुनंदा कोल्हे यांनी हा नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर वादळी चर्चा झाली आणि तो मंजूर झाला. २ एप्रिल १९९५ रोजी त्या वेळचे नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. पुढे विलासराव देशमुखांच्या काळात आघाडी सरकारने ३ डिसेंबर २००२ मध्ये ही अधिसूचना रद्द ठरविली. तेव्हापासून हा प्रश्न कधी पुढे आला नाही आणि आता अचानक शिवसेनेने पुन्हा जुनाच पत्ता वापरण्याचे ठरविले.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना आणि भाजपा यांनी अगोदरच पावले टाकायला सुरुवात केली होती. विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा एमआयएमकडून झालेला पराभव हा शिवसैनिकांच्या जिव्हारी लागणारा होता. या पराभवामुळे काही दिवस सेनेत मरगळ दिसत होती; पण या पराभवाचा वापर सेनेने पुन्हा संघटनेत नवचैतन्य आणण्यासाठी केला; कारण एमआयएमसारखा मुस्लीम पक्ष त्यांच्यासाठी सोयीचा होता. महापालिकेत एमआयएम सत्तेवर आली तर काय होईल? हा सवाल सगळीकडे फिरत होता; आणि या एकाच मुद्द्यावर शिवसेना भर देत आहे. गेल्या पंचवीस वर्षांत महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. या पाव शतकात शहराचे काय भले झाले, याचा हिशेब मांडायचा विचार केला तर औरंगाबादकरांच्या हाती भोपळाच दिसतो. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरात रस्त्याची अवस्था भीषण आहे. वेगाने वाढणारे शहर म्हणून या शहराची ओळख; पण त्यासाठी कोणतेही नियोजन महानगरपालिकेकडे नाही. शहराचा विस्तार प्रचंड झाला तशा समस्या वाढल्या. पाणी ही शहराची मुख्य समस्या बनली. पावसाळा असो की उन्हाळा; चौथ्या दिवशी पाणी मिळते. उलट जायकवाडी जलाशयात पाणीसाठा पुरेसा असताना प्रशासन पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नाही. शिवाय पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करणारी ही देशातील पहिली महापालिका आहे. खाजगीकरण करूनही लोकांना पाणी मिळत नाही आणि पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. पाण्याप्रमाणे शहराची स्वच्छता, आरोग्य अशा मूलभूत सोयींचाही असाच प्रश्न असल्याने सुविधांच्या मुद्द्यांवर नागरिकांची सेनेवर उघड नाराजी आहे; पण एमआयएममुळे पुन्हा सेनेला हिंदू-मुस्लीम हा त्यांचा मते मिळविण्याचा जुनाच फंडा आयता मिळाला आणि त्याचा वापर अधिक प्रभावीपणे करण्याकडे त्यांचा रोख असेल.आचारसंहिता लागू करण्यापूर्वी एक दिवस अगोदर सरकारने गुंठेवारी जमिनीवरील मालमत्ता अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ भाजपापेक्षा सेनेला अधिक होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहरात किमान २५ ते ३० हजार घरांना या निर्णयाचा लाभ होईल. खरे तर हा प्रश्न गेल्या दहा वर्षांपासून सरकारकडे मांडला जात होता; पण त्याचे श्रेय या सरकारला मिळाले. पालकमंत्री रामदास कदम हे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून याचे जाहीर आश्वासन देत होते आणि आता त्याचा लाभ त्यांच्याच पक्षाला मिळेल. निर्णय सरकारचा असला तरी श्रेय घेण्यात भाजपा कमी पडली. औरंगाबाद शहरात गुंठेवारीच्या ११९ वसाहती असून, ३८ वॉर्डांमध्ये ४ लाख लोक राहतात. शिवसेनेचे घोंगडे झटकण्याचा भाजपाचा प्रयत्न राज्य पातळीवर उघड दिसतो आणि त्यांनी येथे स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली. याचाच एक भाग म्हणजे सेना व काँग्रेसमधील काही मंडळी भाजपाच्या तंबूत डेरेदाखल झाली. यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सक्रीय झाले; कारण ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वावर मोहोर लावणारी ठरणार असल्याने शिवसेनेपेक्षा जास्त आघाडी घेणे ही त्यांची व्यूहरचना असेल.- सुधीर महाजन