शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पत्ते पे पत्ता

By admin | Updated: March 24, 2015 23:25 IST

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने तीन पत्ते टाकले. भाजपा सेनेबरोबर युती करणार की स्वतंत्र लढणार हा विषय बाकी आहे. दोन्ही पक्षांमध्ये खुमखुमी उघड दिसते.

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने तीन पत्ते टाकले. भाजपा सेनेबरोबर युती करणार की स्वतंत्र लढणार हा विषय बाकी आहे. दोन्ही पक्षांमध्ये खुमखुमी उघड दिसते.औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजपा या दोघांसाठी कसोटी ठरणार आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या तोंडावर सेनेने पुन्हा एकदा ‘संभाजीनगर’चा जुनाच पत्ता फेकला. या शहराचे नामांतर करून ते ‘संभाजीनगर’ करण्यात यावे, अशी घोषणा १८ एप्रिल १९९१ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी तत्कालीन महापौर सुनंदा कोल्हे यांनी हा नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर वादळी चर्चा झाली आणि तो मंजूर झाला. २ एप्रिल १९९५ रोजी त्या वेळचे नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. पुढे विलासराव देशमुखांच्या काळात आघाडी सरकारने ३ डिसेंबर २००२ मध्ये ही अधिसूचना रद्द ठरविली. तेव्हापासून हा प्रश्न कधी पुढे आला नाही आणि आता अचानक शिवसेनेने पुन्हा जुनाच पत्ता वापरण्याचे ठरविले.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना आणि भाजपा यांनी अगोदरच पावले टाकायला सुरुवात केली होती. विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा एमआयएमकडून झालेला पराभव हा शिवसैनिकांच्या जिव्हारी लागणारा होता. या पराभवामुळे काही दिवस सेनेत मरगळ दिसत होती; पण या पराभवाचा वापर सेनेने पुन्हा संघटनेत नवचैतन्य आणण्यासाठी केला; कारण एमआयएमसारखा मुस्लीम पक्ष त्यांच्यासाठी सोयीचा होता. महापालिकेत एमआयएम सत्तेवर आली तर काय होईल? हा सवाल सगळीकडे फिरत होता; आणि या एकाच मुद्द्यावर शिवसेना भर देत आहे. गेल्या पंचवीस वर्षांत महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. या पाव शतकात शहराचे काय भले झाले, याचा हिशेब मांडायचा विचार केला तर औरंगाबादकरांच्या हाती भोपळाच दिसतो. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरात रस्त्याची अवस्था भीषण आहे. वेगाने वाढणारे शहर म्हणून या शहराची ओळख; पण त्यासाठी कोणतेही नियोजन महानगरपालिकेकडे नाही. शहराचा विस्तार प्रचंड झाला तशा समस्या वाढल्या. पाणी ही शहराची मुख्य समस्या बनली. पावसाळा असो की उन्हाळा; चौथ्या दिवशी पाणी मिळते. उलट जायकवाडी जलाशयात पाणीसाठा पुरेसा असताना प्रशासन पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नाही. शिवाय पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करणारी ही देशातील पहिली महापालिका आहे. खाजगीकरण करूनही लोकांना पाणी मिळत नाही आणि पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. पाण्याप्रमाणे शहराची स्वच्छता, आरोग्य अशा मूलभूत सोयींचाही असाच प्रश्न असल्याने सुविधांच्या मुद्द्यांवर नागरिकांची सेनेवर उघड नाराजी आहे; पण एमआयएममुळे पुन्हा सेनेला हिंदू-मुस्लीम हा त्यांचा मते मिळविण्याचा जुनाच फंडा आयता मिळाला आणि त्याचा वापर अधिक प्रभावीपणे करण्याकडे त्यांचा रोख असेल.आचारसंहिता लागू करण्यापूर्वी एक दिवस अगोदर सरकारने गुंठेवारी जमिनीवरील मालमत्ता अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ भाजपापेक्षा सेनेला अधिक होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहरात किमान २५ ते ३० हजार घरांना या निर्णयाचा लाभ होईल. खरे तर हा प्रश्न गेल्या दहा वर्षांपासून सरकारकडे मांडला जात होता; पण त्याचे श्रेय या सरकारला मिळाले. पालकमंत्री रामदास कदम हे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून याचे जाहीर आश्वासन देत होते आणि आता त्याचा लाभ त्यांच्याच पक्षाला मिळेल. निर्णय सरकारचा असला तरी श्रेय घेण्यात भाजपा कमी पडली. औरंगाबाद शहरात गुंठेवारीच्या ११९ वसाहती असून, ३८ वॉर्डांमध्ये ४ लाख लोक राहतात. शिवसेनेचे घोंगडे झटकण्याचा भाजपाचा प्रयत्न राज्य पातळीवर उघड दिसतो आणि त्यांनी येथे स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली. याचाच एक भाग म्हणजे सेना व काँग्रेसमधील काही मंडळी भाजपाच्या तंबूत डेरेदाखल झाली. यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सक्रीय झाले; कारण ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वावर मोहोर लावणारी ठरणार असल्याने शिवसेनेपेक्षा जास्त आघाडी घेणे ही त्यांची व्यूहरचना असेल.- सुधीर महाजन