शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

या एकोप्याला नेताही हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:08 AM

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३१ टक्के मते मिळाली.

१९७५ ची अंतर्गत आणीबाणी मागे घेताच १९७७ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशातील सर्व काँग्रेसविरोधी पक्षांची जशी एकजूट दिल्लीच्या रामलीला मैदानावर दिसली, नेमकी तशीच सर्व भाजपविरोधी पक्षांची एकी परवा कर्नाटकात कुमारस्वामींनी घेतलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या वेळी आढळली. काँग्रेसच्या सोनिया गांधी, कम्युनिस्टांचे विजयन आणि येचुरी, उत्तर प्रदेशच्या मायावती व अखिलेश, बिहारचे तपस्वी यादव, राष्ट्रवादीचे शरद पवार, आंध्रचे चंद्राबाबू नायडू, बंगालच्या ममता बॅनर्जी हे सारेच विरोधी पक्षनेते यावेळी नुसते एकत्रच आले नाहीत तर त्यांच्यात भाजपविरोधी एकवाक्यता दिसून आली. पंजाबचे अमरिंदरसिंग यात दिसले नाहीत. मात्र ते काँग्रेसचेच नेते आहेत. आश्चर्य याचे की ‘पालघरमधील पोटनिवडणुकीत अडकलो नसतो तर आम्हीही आलो असतो’ हे रालोआतील शिवसेनेनेही या मेळाव्याला कळविलेले दिसले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३१ टक्के मते मिळाली. त्या हिशेबाने कर्नाटकात परवा जमलेल्या पक्षांच्या मतांची तेव्हाची एकूण बेरीज ६५ टक्क्यांच्या पुढे जाणारी आहे. ही मते या पक्षांना अशीच राखता आली तर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे पारडे जड होण्याची शक्यता मोठी आहे. तथापि या पक्षात अजून मतभेद शिल्लक आहेत. ममता बॅनर्जींचे डाव्यांशी जुळत नाही आणि मायावती व अखिलेश एकत्र असले तरी त्यांना काँग्रेसलाही सोबत घ्यावे लागणार आहे. झालेच तर व्यापक मतैक्यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचे पारडे भारी, वा ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची मते अधिक ती राज्ये व ते संघ त्या पक्षांकडे सोपविण्याचे राजकीय औदार्यही या नेत्यांना दाखवावे लागेल. तसे समझोते होण्यात सध्या कोणत्या अडचणी मात्र नाहीत. यापैकी प्रत्येकच पक्षाला त्याची मर्यादा आता समजली आहे आणि ज्या भाजपाशी लढत द्यायची त्याचे राजकीय व आर्थिक बळही साऱ्यांच्या ध्यानात आहे. दुसरी महत्त्वाची अडचण केंद्रीय नेतृत्वाबाबतची आहे. मायावती, ममता आणि मुलायमसिंग यांच्याएवढेच पंतप्रधानपदाचे आकर्षण शरद पवारांनाही आहे. कधीकाळी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे मागे फारसे पाठबळ नसताना विरोधकांच्या मतांची बेरीज जुळवून त्या पदावर आले होते. तसेच काहीसे आपणही जमवू शकू असे पवारांसह अनेकांना वाटते. यातले वास्तव हे की हे सारे नेते व त्यांचे पक्ष प्रादेशिक आहेत. त्यांना त्याच मर्यादाही आहेत. या साºयात राष्टÑीय पातळीवर समर्थ असणारा व जनतेत पाठबळ असणारा पक्ष काँग्रेस हाच आहे. त्याचमुळे सोनिया गांधी या अजूनही संयुक्त पुरोगामी दलाच्या अध्यक्ष आहेत. त्या पक्षाने राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड केली आणि कर्नाटकातील निवडणुकीत सर्वाधिक परिश्रम केलेले नेतेही तेच आहेत. झालेच तर साºया देशात फिरून पक्षाची राष्टÑीय बांधणीही तेच करीत आहेत. त्यांनी पंजाब जिंकले, राजस्थानातील लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या आणि त्यांच्याखेरीज आपल्या राज्याबाहेर जाणारा दुसरा नेताही या पक्षांजवळ आज नाही. त्यामुळे आताच्या एकोप्यासोबतच राष्टÑीय नेतृत्वाबाबतही त्यांच्यात एकवाक्यता होणे अवघड नाही व ती तशी लवकर होणे आवश्यकही आहे. आपला देश व समाज प्रकृतीने मध्यममार्गी आहे आणि काँग्रेस पक्ष त्या मार्गाचा म्हणून ओळखला जाणारा आहे. शिवाय त्या पक्षात नेतृत्वाबाबत वाद नाही आणि अन्य नेत्यांशी राहुल गांधींचे संबंधही सलोख्याचे आहेत. सबब पक्षीय एकोप्याला नेतृत्वाबाबतच्या एकमताची जोड लवकर मिळाली तर सारेच पक्ष तात्काळ कामाला लागू शकतील. तसे होणे गरजेचे आहे कारण सार्वत्रिक निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. प्रादेशिक नेत्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षांना जरा आवर घातला तर हे राष्टÑीय ऐक्य साधता येणे सहज शक्यही आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी