शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लक्ष्मीदर्शनाचा खेळ!

By admin | Updated: December 31, 2015 03:02 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘लक्ष्मी’कांत प्यारेलालच्या संगीतावर लक्ष्मीदर्शनाचा खेळ झाला हे उघड सत्य आहे. मात्र, या निवडणुकीला केवळ आर्थिक नव्हे तर त्या-त्या ठिकाणचे

विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘लक्ष्मी’कांत प्यारेलालच्या संगीतावर लक्ष्मीदर्शनाचा खेळ झाला हे उघड सत्य आहे. मात्र, या निवडणुकीला केवळ आर्थिक नव्हे तर त्या-त्या ठिकाणचे राजकीय संदर्भदेखील होते. राष्ट्रवादीला सोलापूरची जागा गमवावी लागल्याने मोठा धक्का बसला. पंढरपूरचे राजकीय मठाधिपती सुधाकरपंत परिचारक यांचे वारसदार प्रशांत यांनी भाजपाच्या साथीने आमदारकी मिळवून राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांना चित करण्याचा चमत्कार केला. परिचारक यांना ‘सुशील’ साथ मिळाल्याने ते ‘विजय’ मिळवू शकले हे या निकालाचे सार आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांना मानणाऱ्यांनी अजित पवार यांना मानणाऱ्यांवर केलेली ही मात आहे. भाजपा स्वबळावर जिंकली नसती म्हणून परिचारकांना समोर करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली. मुंबईत भाजपाच्या उमेदवाराला माघार घ्यायला सांगून त्या मोबदल्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरची जागा काँग्रेसकडून बिनविरोध मिळवून घेतली. मुंबईत अपक्ष प्रसाद लाड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसचे भाई जगताप यांना भाजपाने दमविले. राष्ट्रवादीने मुंबईत काँग्रेसला साथ दिली की प्रसाद यांचे लाड केले हे राजकीय जाणकारांना माहिती आहेच. भाई जगताप यांचा अभिमन्यू करण्याचे प्रयत्न बरेच झाले पण भाई सगळ्यांना पुरून उरत जिंकले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना ८६ मतांसह विजय मिळाल्याने शिवसेनेत कोणतीही दगाबाजी झाली नसल्याचे स्पष्ट झाले. अकोला-बुलडाणा-वाशीममध्ये नाशिकनजीकच्या त्र्यंबकेश्वरचे फाईव्हस्टार शिक्षणसम्राट रवींद्र सपकाळ यांचा बहुजनांच्या झेंड्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर करवून घेण्याचा प्रयत्न फसलाच नाही तर तसे करणे हे त्यांच्या अंगलटदेखील आले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून प्रचंड संख्याबळ असतानाही शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया निवडून आले ही आघाडीसाठी चपराक आहे. ऐनवेळी आलेल्या आगंतुक सपकाळांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने स्वत:चे हसे करून घेतले. कोल्हापुरात महादेवरावांनी ज्यांना म्हणून आतापर्यंत अंगावर घेतले त्या सगळ्यांनी मालकांचा हिशेब चुकता केला. राष्ट्रवादीची मते मोठ्या प्रमाणात फोडू हा महाडिकांचा होरा चुकला. विधानसभा निवडणुकीत बंटी पाटलांची आमदारकीची गाडी चुकली ती आता त्यांनी गाठली आहे. धुळे-नंदुरबारमध्ये काँग्रेसचे अमरिशभाई पटेल यांनी भाजपाचे पानिपत केले. युतीकडे असलेली मतेही भाजपाचे वाणी यांना मिळू न शकण्याची नामुष्की ओढवली. अहमदनगरमध्ये काँग्रेसचे जयंतराव ससाणे यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अरुण जगताप यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. या निवडणुकीत आघाडी व युतीमध्ये कुठे एकीचे तर कुठे बेकीचे दर्शन घडले. आठपैकी एकही जागा भाजपाकडे नव्हती. आता या पक्षाकडे दोन जागा आल्या आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील संख्याबळ प्रत्येकी एकने कमी झाले आहे.