शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
7
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
8
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
9
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
10
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
11
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
12
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
13
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
14
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
15
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
16
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
17
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
18
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
19
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
20
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

उशिरा सुचलेले शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 04:09 IST

कमला मिल कंपाउंडमधील जळीतकांडानंतर सर्वसामान्य मुंबईकर अस्वस्थ आहे. कोसळणाºया गृहनिर्माण सोसायट्या, घसरणारी लोकल, गुदमरून टाकणारे रेल्वेपूल, तुंबलेले रस्ते असे विविध कटू अनुभव गेल्या वर्षात मुंबईकरांनी अनुभवले. धकाधकीच्या जीवनात विरंगुळा शोधण्यासाठी ज्या हॉटेल, पब, रेस्टॉरंटमध्ये बहुतांश मंडळी जातात, ती जागाही मृत्यूचा सापळा असल्याची जाणीव वर्षाच्या शेवटी कमला मिल जळीतकांडाने दिली.

कमला मिल कंपाउंडमधील जळीतकांडानंतर सर्वसामान्य मुंबईकर अस्वस्थ आहे. कोसळणाºया गृहनिर्माण सोसायट्या, घसरणारी लोकल, गुदमरून टाकणारे रेल्वेपूल, तुंबलेले रस्ते असे विविध कटू अनुभव गेल्या वर्षात मुंबईकरांनी अनुभवले. धकाधकीच्या जीवनात विरंगुळा शोधण्यासाठी ज्या हॉटेल, पब, रेस्टॉरंटमध्ये बहुतांश मंडळी जातात, ती जागाही मृत्यूचा सापळा असल्याची जाणीव वर्षाच्या शेवटी कमला मिल जळीतकांडाने दिली. साकीनाका येथील आगीत बारा कामगारांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच कमला मिलमध्ये आगीचा भडका उडाला आणि चौदा जणांनी हकनाक जीव गमावला. या दोन्ही घटनांनी या महानगराचा कारभार हाकणाºया पालिका प्रशासनाचा भेसूर चेहरा मात्र पुरता उघड केला. या दुर्घटनेनंतरची तोडक कारवाई ही पालिकेच्या भ्रष्टाचाराची पावतीच होती. या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांत पाचशेहून अधिक ठिकाणी हातोडे चालविल्याचे सांगत पालिका प्रशासनाने स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या कारवाईसाठी पालिकेला चौदा बळी हवे होते का? हा प्रश्न गंभीर आहे. साकीनाका येथील जळीतकांडातून पालिका प्रशासनाने काही बोध घेतला नाही का? कोणतीही दुर्घटना घडली की लगेच बळीचे बकरे शोधायचे आणि वेळ मारून न्यायची ही चलाखी आता मुंबईकरांनाही कळून चुकली आहे. दुर्दैवाने या वृत्तीला चाप लावू शकेल, अशी कोणतीच शक्ती आजघडीला जनतेच्या हातात नाही. भ्रष्टाचाराचा पर्यायवाचक शब्द बनलेल्या राजकारण्यांना एक वेळ मतदार म्हणून उत्तर देता येईलही, पण अधिकारी, कर्मचाºयांचा भ्रष्टाचार थांबवायचा कोणी? दलाली आणि भागीदारीत मश्गूल असणाºया राजकीय जमातीकडून अशी काही अपेक्षा बाळगणेच मूर्खपणाचे आहे. मुंबईतील विविध मिलच्या जागांवर जे अनधिकृत बांधकामांचे इमले उभे राहिले, त्यात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग आहे. नातलग आणि आप्तस्वकीयांच्या आडून आजी-माजी उच्चपदस्थ अधिकारी स्वत:चे दुकान थाटतायत तर त्यांच्याखालचे रोजंदारीवर चिरीमिरी घेत गब्बर होताहेत. या खेळात राजकीय वर्ग मात्र कधी दलाली, कधी भागीदारी घेत शहामृगी पवित्रा स्वीकारतो. टक्केवारीच्या गणितात जोवर आपल्या गरजा भागताहेत, तोवर त्यांना कशाशीच कसलेच देणेघेणे नसते. लुटुपुटुच्या राजकीय लढाया रंगवल्या की जनता त्यात मश्गूल होते. या आभासी युद्धामागील सर्वपक्षीय सहकार मतदारराजाच्या नजरेत येतच नाही. त्यामुळे एका दुर्घटनेकडून दुसºया दुर्घटनेकडे इतकाच प्रवास जनतेच्या हाती राहतो. ज्यांच्याकडे कारभार सोपविला त्यांनी रचलेले मृत्यूचे सापळे भेदायचे असतील तर नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. अन्यथा पालिकेला ‘कारवाई’चे अचानक सुचलेले शहाणपणच अधिक चर्चेचे ठरेल.

टॅग्स :Kamala Mills fireकमला मिल अग्नितांडवMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका