शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 03:14 IST

एकंदरीत कर्जमाफीचे गाजर दाखविताना लादलेल्या अटींची पूर्तता करता करता पात्र शेतक-यांची पुरती गोची होत आहे. ‘ग्रीन’ यादीमध्ये अपात्र शेतक-यांच्या नावाचा उल्लेख आलाच कसा, हाच खरा संशोधनाचा विषय आहे.

एकंदरीत कर्जमाफीचे गाजर दाखविताना लादलेल्या अटींची पूर्तता करता करता पात्र शेतकºयांची पुरती गोची होत आहे. ‘ग्रीन’ यादीमध्ये अपात्र शेतक-यांच्या नावाचा उल्लेख आलाच कसा, हाच खरा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे शेतकºयांच्या खात्यात कर्जाची रक्कम केव्हा जमा होईल, हेही एक कोडेच आहे.बँकांनी कर्जमाफीच्या याद्या तयार करताना केलेल्या अक्षम्य चुकांमुळे शेतकºयांची दिवाळी काळोखातच गेली. याद्यांमधील घोळ सावरत असताना कर्जमाफीची नुकतीच जाहीर झालेली ‘ग्रीन यादी’ही संशयाच्या भोवºयात सापडली आहे. यादी सदोष असल्याने सुमारे ६ लाख ५० हजार शेतकरी कर्जमाफीला मुकले असताना नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीत अपात्र शेतकºयांच्या नावाचा शिरकाव झाल्याने हा गोंधळ सावरण्यासाठी पुन्हा एका समितीचे गठन करण्यात आले. म्हणे ही समिती आता अपात्र शेतकºयांचा शोध घेऊन पात्र शेतकºयांना न्याय देईल. सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अशी समिती नेमण्याची शक्कल जिल्हा प्रशासनाने लढविली. ‘ग्रीन यादी’मधील शेतकºयांकडे अन्य बँक खाते आढळल्यास त्या खात्यांचीसुद्धा माहिती ही समिती घेणार आहे, त्यातील माफीची रक्कम दीड लाखापेक्षा अधिक झाल्यास बँकेला त्याचे माफीचे क्लेम रोखण्याबाबत कळविण्याचे आदेश दिले जातील. ज्या शेतकºयांनी जिल्हा बँकेचे थकीत कर्ज असूनही आॅनलाईन अर्ज भरताना या कर्जाचा उल्लेख केला नाही, अशी नावे ‘ग्रीन यादी’मध्ये असल्यास बँकेला त्यांचे क्लेम रोखण्याची सूचना ही समिती देणार आहे. अर्थात प्रशासनाला उशिरा सुचलेल्या या शहाणपणामुळे राज्य शासनाचीच नाचक्की होत आहे.एकंदरीत कर्जमाफीचे गाजर दाखविताना लादलेल्या अटींची पूर्तता करता करता पात्र शेतकºयांची पुरती गोची होत आहे. ‘ग्रीन’ यादीमध्ये अपात्र शेतकºयांच्या नावाचा उल्लेख आलाच कसा, हाच खरा संशोधनाचा विषय आहे. यवतमाळच्या जिल्हा उपनिबंधकाने या यादीतून अपात्र शेतकºयांची नावे हुडकून काढण्यासाठी तालुकानिहाय समिती गठित केली असताना यादीत घोळ करणाºयांचाही शोध घेणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या या शेतकरी सन्मान योजनेत शेतकºयाला सन्मानाची वागणूक मिळते तरी कुठे? बँकेचे अधिकारी व्यवस्थित बोलत नाहीत, प्रमाणपत्राचे वाटप करून लोकप्रतिनिधी मोकळे झाले, त्यामुळे २५ नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के कर्जमाफीची सरकारची घोषणा हवेतच विरण्याची शक्यता अधिक आहे. शेतकरी पुरता खचला आहे. आत्महत्येचे सत्र संपता संपेना. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पात्र शेतकºयांच्या याद्याच तयार करायला आणखी किती कालावधी लागेल, हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे शेतकºयाच्या खात्यात कर्जाची रक्कम केव्हा जमा होईल, हेही एक कोडेच आहे. हाती आलेल्या पिकाला भाव मिळत नसल्याने कास्तकार आपल्याच शेतात जनावरे सोडत आहेत. सवंगणीच्या कामावर झालेला खर्च निरर्थक गेला. आता मळणीवर खर्च करायचा नाही, अशी भूमिका घेत वर्धा जिल्ह्यातील एका शेतकºयाने शेतातील सोयाबीन जनावरांच्या हवाली केले. हे चित्र शासनाविरुद्ध बळीराजाने पुकारलेल्या एल्गाराची नांदी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी