शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पण, अंतिम उपाय विकासच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:03 AM

दोन्ही बाजूंनी कितीही गोळ्या झाडल्या तरी नक्षल चळवळ कायमची हद्दपार करण्यासाठी या वंचितांच्या क्षेत्राचा विकास हाच अंतिम व प्रभावी उपाय आहे.

२४ मे १९६७ रोजी पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावातून सुरू झालेली नक्षल चळवळ आज तब्बल चार दशकांचा प्रवास करून पार दमून गेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दलित, अतिगरीबमजूर, भूमिहीन शेतकरी आणि आदिवासींच्या जीवनात पारतंत्र्याचा काळोख कायम होता. त्यामुळेच या शोषितांचा प्रशासनाबद्दलचा असंतोष वाढत होता. याचाच फायदा घेत नक्षल चळवळीने आपले पाय रोवायला सुरुवात केली अन् अवघ्या देशात सातत्याने हिंसाचार घडवून आणला. हा हिंसाचार इतका तीव्र की पोलीस आणि निमलष्करी दलालाही अनेकदा मागे पाहावे लागले. परंतु आता चार दशकांच्या अखंड रक्तपातानंतर या चळवळीचे कंबरडे मोडले आहे. याचे श्रेय अर्थातच अनोळखी निबिड अरण्यात प्राण हातावर घेऊन नक्षल्यांशी थेट भिडणाऱ्या पोलिसांचे आहे. नक्षल्यांचे ‘रेस्ट झोन’ ठरत असलेल्या सिरोंचासारख्या परिसरात याच बहादूर पोलिसांनी जेव्हा बंदुकीच्या टोकावर त्या भागापुरते नक्षल्यांचे अस्तित्वच संपूवन टाकले तेव्हाच या चळवळीला लागलेल्या वाळवीने तिला पुरते पोखरून टाकले आहे, याचे संकेत मिळत होते. सिरोंचाची सुवार्ता लवकरच अवघ्या गडचिरोली जिल्ह्याची सुवार्ता ठरेल, अशी आशा त्यातूनच व्यक्त व्हायला लागली होती. एका झटक्यात १६ नक्षल्यांचे मुडदे पाडून पोलिसांनी हा आशावाद बºयाचअंशी सार्थ ठरवला आहे. आकड्यातच बोलायचे झाल्यास यंदा नऊ महिन्याच्या आतच तब्बल ४१ नक्षल्यांना पोलिसांनी यमसदनी पाठवले आहे. कायदा व हिंसाचाराच्या या समरांगणात पहिल्यांदा पोलिसांनी इतके भव्य यश संपादन केले आहे. यासाठी निश्चितच पोलीस अभिनंदनास पात्र आहेत. परंतु हा लढा पोलीस विरुद्ध नक्षल असा अजिबात नाही. नक्षल्यांचा चोला पांघरूण ज्यांनी ज्यांनी पहिल्याक्षणी बंदुका हाती घेतल्या त्या सर्वांचा राग सामाजिक तसेच आर्थिक विषमतेला खतपाणी घालणाºया व्यवस्थेविरुद्ध होता. पुढे ही चळवळ भरकटली, नक्षल नेते भ्रष्ट झाले. पण, ज्यांच्या बळावर ती ही लढाई लढत होते ते सर्वसाधारण नक्षली मात्र व्यवस्थेविरुद्धच लढत राहिले, अजूनही लढताहेत. व्यवस्थेबद्दलचा हा सनातन राग प्रत्येक वेळी बंदुकीच्या धाकावरच मिटवणे शक्य नाही. ही व्यवस्था ४० वर्षांआधी होती इतकी क्रूर नाही, आता तिने आपलेही ‘माणूस’ असणे मान्य केले आहे आणि अन्न, वस्त्र, निवाºयासोबतच आरोग्य, शिक्षणाची गंगा आपल्याही दुर्गम झोेपडीपर्यंत पोहोचणार आहे, हा विश्वास या आदिवासी तरुणांच्या मनात निर्माण करणे गरजेचे आहे. कारण, दोन्ही बाजूंनी कितीही गोळ्या झाडल्या तरी नक्षल चळवळ कायमची हद्दपार करण्यासाठी या वंचितांच्या क्षेत्राचा विकास हाच अंतिम व प्रभावी उपाय आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी