शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

पण, अंतिम उपाय विकासच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:03 IST

दोन्ही बाजूंनी कितीही गोळ्या झाडल्या तरी नक्षल चळवळ कायमची हद्दपार करण्यासाठी या वंचितांच्या क्षेत्राचा विकास हाच अंतिम व प्रभावी उपाय आहे.

२४ मे १९६७ रोजी पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावातून सुरू झालेली नक्षल चळवळ आज तब्बल चार दशकांचा प्रवास करून पार दमून गेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दलित, अतिगरीबमजूर, भूमिहीन शेतकरी आणि आदिवासींच्या जीवनात पारतंत्र्याचा काळोख कायम होता. त्यामुळेच या शोषितांचा प्रशासनाबद्दलचा असंतोष वाढत होता. याचाच फायदा घेत नक्षल चळवळीने आपले पाय रोवायला सुरुवात केली अन् अवघ्या देशात सातत्याने हिंसाचार घडवून आणला. हा हिंसाचार इतका तीव्र की पोलीस आणि निमलष्करी दलालाही अनेकदा मागे पाहावे लागले. परंतु आता चार दशकांच्या अखंड रक्तपातानंतर या चळवळीचे कंबरडे मोडले आहे. याचे श्रेय अर्थातच अनोळखी निबिड अरण्यात प्राण हातावर घेऊन नक्षल्यांशी थेट भिडणाऱ्या पोलिसांचे आहे. नक्षल्यांचे ‘रेस्ट झोन’ ठरत असलेल्या सिरोंचासारख्या परिसरात याच बहादूर पोलिसांनी जेव्हा बंदुकीच्या टोकावर त्या भागापुरते नक्षल्यांचे अस्तित्वच संपूवन टाकले तेव्हाच या चळवळीला लागलेल्या वाळवीने तिला पुरते पोखरून टाकले आहे, याचे संकेत मिळत होते. सिरोंचाची सुवार्ता लवकरच अवघ्या गडचिरोली जिल्ह्याची सुवार्ता ठरेल, अशी आशा त्यातूनच व्यक्त व्हायला लागली होती. एका झटक्यात १६ नक्षल्यांचे मुडदे पाडून पोलिसांनी हा आशावाद बºयाचअंशी सार्थ ठरवला आहे. आकड्यातच बोलायचे झाल्यास यंदा नऊ महिन्याच्या आतच तब्बल ४१ नक्षल्यांना पोलिसांनी यमसदनी पाठवले आहे. कायदा व हिंसाचाराच्या या समरांगणात पहिल्यांदा पोलिसांनी इतके भव्य यश संपादन केले आहे. यासाठी निश्चितच पोलीस अभिनंदनास पात्र आहेत. परंतु हा लढा पोलीस विरुद्ध नक्षल असा अजिबात नाही. नक्षल्यांचा चोला पांघरूण ज्यांनी ज्यांनी पहिल्याक्षणी बंदुका हाती घेतल्या त्या सर्वांचा राग सामाजिक तसेच आर्थिक विषमतेला खतपाणी घालणाºया व्यवस्थेविरुद्ध होता. पुढे ही चळवळ भरकटली, नक्षल नेते भ्रष्ट झाले. पण, ज्यांच्या बळावर ती ही लढाई लढत होते ते सर्वसाधारण नक्षली मात्र व्यवस्थेविरुद्धच लढत राहिले, अजूनही लढताहेत. व्यवस्थेबद्दलचा हा सनातन राग प्रत्येक वेळी बंदुकीच्या धाकावरच मिटवणे शक्य नाही. ही व्यवस्था ४० वर्षांआधी होती इतकी क्रूर नाही, आता तिने आपलेही ‘माणूस’ असणे मान्य केले आहे आणि अन्न, वस्त्र, निवाºयासोबतच आरोग्य, शिक्षणाची गंगा आपल्याही दुर्गम झोेपडीपर्यंत पोहोचणार आहे, हा विश्वास या आदिवासी तरुणांच्या मनात निर्माण करणे गरजेचे आहे. कारण, दोन्ही बाजूंनी कितीही गोळ्या झाडल्या तरी नक्षल चळवळ कायमची हद्दपार करण्यासाठी या वंचितांच्या क्षेत्राचा विकास हाच अंतिम व प्रभावी उपाय आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी