शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानाच्या सरोवराचे पाट लोकांपर्यंत पोहोचावेत, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 06:12 IST

‘मराठी संवर्धन पंधरवड्या’चे आज समापन होत आहे! त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वाटचालीचा आढावा!

प्रा. रणधीर शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक

भाषा साहित्य संस्कृती वाटचालीत व्यक्तींबरोबरच संस्थात्मक कार्याचादेखील महत्त्वाचा सहभाग असतो. बऱ्याचदा अशा संस्थांचे कार्य दुर्लक्षिले जाण्याची शक्यता असते. एकोणिसाव्या शतकापासून विविध संस्थांनी मराठी भाषा, साहित्य, इतिहास, संस्कृतीविषयक महत्त्वाचे कार्य केले आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. 

यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून १९६० साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना  झाली. भौतिक संस्कृतीच्या विकासाबरोबर सांस्कृतिक जीवनाची भरभराट त्यांना महत्त्वाची वाटत होती. सांस्कृतिक जीवनाची इयत्ता वर्धमान होण्यासाठी पायाभूत स्वरूपाचे कार्य व्हावे, असे त्यांना वाटे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ही भारतीय पातळीवरील आरंभ काळात राज्य पातळीवरील पहिलीच साहित्यविषयक संस्था आहे. ‘ज्ञानाच्या सरोवराचे पाट लोकांच्या जीवनापर्यंत पोहोचविले पाहिजेत, यासाठी भाषा, इतिहास व साहित्यासंबंधी मौलिक कार्य उभे करावे,’ अशी यशवंतराव चव्हाण यांची इच्छा होती. १९५४ साली स्थापन झालेल्या साहित्य अकादमीची रचना व कार्य त्यांच्यापुढे असावे. 

मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत भाषा, साहित्यासंबंधी विविध प्रकारची उल्लेखनीय पायाभूत स्वरूपाची कामे झाली आहेत. साहित्य, संस्कृती आणि इतिहास या विषयांवरील ग्रंथरचना, प्रकाशनाबरोबरच काळानुरूप विविध योजना मंडळाने सुरू केल्या. यामध्ये ललित आणि ललितेतर वाङ्मय प्रकाशनार्थ अनुदान, नवलेखक अनुदान योजना, नवलेखक कार्यशाळा, साहित्य संस्था व संमेलनांना अनुदान, नियतकालिके व साहित्यसंस्थांना मदत व विविध स्वरूपाचे पुरस्कार अशा त्या योजना आहेत. नवोदित लेखकांच्या प्रथम प्रकाशन अनुदान योजनेतून अनेक नामवंत लेखकांची पुस्तके आजपर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. अगदी अलीकडे २०१८ साली मंडळाच्या नव लेखक अनुदान योजनेतून प्रकाशित झालेल्या नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीस युवा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या सत्तर एक वर्षांतील मंडळाची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे विविध स्वरूपाच्या मौलिक ग्रंथांची निर्मिती व त्यांचे प्रकाशन! आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीसंदर्भात महत्त्वाची ग्रंथप्रकाशने मंडळाच्या वतीने प्रकाशित झाली. महाराष्ट्राच्या समाज-संस्कृतीच्या इतिहासाचे काही एक मापन या लेखनातून झाले. यात एकोणिसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या काळातील महाराष्ट्रीय समाजाच्या वाटचालीविषयीचे काहीएक लेखन विविध प्रकारच्या ग्रंथांद्वारे झाले.

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समाजसुधारक व विचारवंतांचे लेखन प्रकाशित झाले. समग्र वाङ्मय व निवडक वाङ्मयाचे खंड प्रसिद्ध झाले. लोकहितवादी, महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, प्रबोधनकार ठाकरे, कृ. अ. केळुसकर, अण्णा भाऊ साठे, अमर शेख, नामदेव ढसाळ अशा विचारवंत लेखकांचे वाङ्मय प्रकाशित झाले. एका अर्थाने महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेच्या विचारमंथनाबरोबर मराठी मनाचे भरणपोषण करण्याचे काम या वाङ्मयाने केले. याबरोबर दुर्मीळ वाङ्मयाचेदेखील प्रकाशन मंडळाने केले आहे. हस्तलिखिते, संतवाङ्मय, महानुभाव वाङ्मय, जैन वाङ्मय ते एकोणिसाव्या शतकातील काही लेखन तसेच पुनर्मुदण मंडळाने प्रकाशित केले आहे. यामध्ये ज्ञानोदयलेखनसारसूची खंड महत्त्वाचे होत.  महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समाजसुधारकांची, विचारवंतांची चरित्रे ‘ शिल्पकार चरित्रमाला’ या मालेद्वारे  प्रकाशित करण्यात आली आहेत. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासावरील काही मौलिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. आजवर मंडळाने पाचशेहून अधिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. 

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार मंडळाचे अध्यक्ष व मंडळाच्या सदस्यांनी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या वाङ्मयीन धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी मंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेकडून  केली जाते. मंडळाने गेल्या सत्तर वर्षांत प्रकाशित केलेल्या बहुविध ग्रंथांकडे नजर टाकली तर महाराष्ट्राच्या समाज, संस्कृती, इतिहास वाटचालीचे विहंगदर्शन घडते ज्याचे मूळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ध्येयधोरणात दिसून येते. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राच्या साहित्यसंस्कृतीक्षेत्रात मंडळाने बजावलेली भूमिका अनन्य महत्त्वाची आहे.