शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

ज्ञानाच्या सरोवराचे पाट लोकांपर्यंत पोहोचावेत, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 06:12 IST

‘मराठी संवर्धन पंधरवड्या’चे आज समापन होत आहे! त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वाटचालीचा आढावा!

प्रा. रणधीर शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक

भाषा साहित्य संस्कृती वाटचालीत व्यक्तींबरोबरच संस्थात्मक कार्याचादेखील महत्त्वाचा सहभाग असतो. बऱ्याचदा अशा संस्थांचे कार्य दुर्लक्षिले जाण्याची शक्यता असते. एकोणिसाव्या शतकापासून विविध संस्थांनी मराठी भाषा, साहित्य, इतिहास, संस्कृतीविषयक महत्त्वाचे कार्य केले आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. 

यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून १९६० साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना  झाली. भौतिक संस्कृतीच्या विकासाबरोबर सांस्कृतिक जीवनाची भरभराट त्यांना महत्त्वाची वाटत होती. सांस्कृतिक जीवनाची इयत्ता वर्धमान होण्यासाठी पायाभूत स्वरूपाचे कार्य व्हावे, असे त्यांना वाटे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ही भारतीय पातळीवरील आरंभ काळात राज्य पातळीवरील पहिलीच साहित्यविषयक संस्था आहे. ‘ज्ञानाच्या सरोवराचे पाट लोकांच्या जीवनापर्यंत पोहोचविले पाहिजेत, यासाठी भाषा, इतिहास व साहित्यासंबंधी मौलिक कार्य उभे करावे,’ अशी यशवंतराव चव्हाण यांची इच्छा होती. १९५४ साली स्थापन झालेल्या साहित्य अकादमीची रचना व कार्य त्यांच्यापुढे असावे. 

मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत भाषा, साहित्यासंबंधी विविध प्रकारची उल्लेखनीय पायाभूत स्वरूपाची कामे झाली आहेत. साहित्य, संस्कृती आणि इतिहास या विषयांवरील ग्रंथरचना, प्रकाशनाबरोबरच काळानुरूप विविध योजना मंडळाने सुरू केल्या. यामध्ये ललित आणि ललितेतर वाङ्मय प्रकाशनार्थ अनुदान, नवलेखक अनुदान योजना, नवलेखक कार्यशाळा, साहित्य संस्था व संमेलनांना अनुदान, नियतकालिके व साहित्यसंस्थांना मदत व विविध स्वरूपाचे पुरस्कार अशा त्या योजना आहेत. नवोदित लेखकांच्या प्रथम प्रकाशन अनुदान योजनेतून अनेक नामवंत लेखकांची पुस्तके आजपर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. अगदी अलीकडे २०१८ साली मंडळाच्या नव लेखक अनुदान योजनेतून प्रकाशित झालेल्या नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीस युवा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या सत्तर एक वर्षांतील मंडळाची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे विविध स्वरूपाच्या मौलिक ग्रंथांची निर्मिती व त्यांचे प्रकाशन! आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीसंदर्भात महत्त्वाची ग्रंथप्रकाशने मंडळाच्या वतीने प्रकाशित झाली. महाराष्ट्राच्या समाज-संस्कृतीच्या इतिहासाचे काही एक मापन या लेखनातून झाले. यात एकोणिसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या काळातील महाराष्ट्रीय समाजाच्या वाटचालीविषयीचे काहीएक लेखन विविध प्रकारच्या ग्रंथांद्वारे झाले.

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समाजसुधारक व विचारवंतांचे लेखन प्रकाशित झाले. समग्र वाङ्मय व निवडक वाङ्मयाचे खंड प्रसिद्ध झाले. लोकहितवादी, महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, प्रबोधनकार ठाकरे, कृ. अ. केळुसकर, अण्णा भाऊ साठे, अमर शेख, नामदेव ढसाळ अशा विचारवंत लेखकांचे वाङ्मय प्रकाशित झाले. एका अर्थाने महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेच्या विचारमंथनाबरोबर मराठी मनाचे भरणपोषण करण्याचे काम या वाङ्मयाने केले. याबरोबर दुर्मीळ वाङ्मयाचेदेखील प्रकाशन मंडळाने केले आहे. हस्तलिखिते, संतवाङ्मय, महानुभाव वाङ्मय, जैन वाङ्मय ते एकोणिसाव्या शतकातील काही लेखन तसेच पुनर्मुदण मंडळाने प्रकाशित केले आहे. यामध्ये ज्ञानोदयलेखनसारसूची खंड महत्त्वाचे होत.  महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समाजसुधारकांची, विचारवंतांची चरित्रे ‘ शिल्पकार चरित्रमाला’ या मालेद्वारे  प्रकाशित करण्यात आली आहेत. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासावरील काही मौलिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. आजवर मंडळाने पाचशेहून अधिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. 

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार मंडळाचे अध्यक्ष व मंडळाच्या सदस्यांनी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या वाङ्मयीन धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी मंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेकडून  केली जाते. मंडळाने गेल्या सत्तर वर्षांत प्रकाशित केलेल्या बहुविध ग्रंथांकडे नजर टाकली तर महाराष्ट्राच्या समाज, संस्कृती, इतिहास वाटचालीचे विहंगदर्शन घडते ज्याचे मूळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ध्येयधोरणात दिसून येते. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राच्या साहित्यसंस्कृतीक्षेत्रात मंडळाने बजावलेली भूमिका अनन्य महत्त्वाची आहे.