शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:24 IST

धर्मापासून राजकारणापर्यंत नेता लागतो आपल्याला जय म्हणायला.

किशोर पाठक|माणसं जास्तीत जास्त विरोधी वागताहेत म्हणजे एकीकडे ते कट्टर धर्म, जातीचे अभिमानी होत आहेत आणि दुसरीकडे देव, मंदिरं नाकारत आहेत. धर्म, देव, आस्तिकता, पूजा या सर्वच व्यवहारात गल्लत होतीय असं वाटतं. आता अधिक महिन्यात तर हे कट्टरत्व फार वाढत आहे. एका मित्राकडे नवी सून घरात आली. मुलीचा बाबा म्हणाला, अधिकात मुलीने नवऱ्याचं तोंड पाहू नये. निदान पहिले तीन दिवस. सगळे गप्प. म्हटलं घेऊन जा. आता मुलं-मुली लग्नाच्या आधीच खूप पोझेसचे फोटो घेतात. तसे ते एकमेकांचे असतात. मग आपण नक्की काय नाकारतो. हे विधी अध्यात्म्याच्या आड येतात. प्रत्येकाने धर्माचे स्वत:चे अधिष्ठान केले आहे. हा माझा मार्ग. पटला तर बघा. म्हणजे सगळे एकाच परमेश्वराकडे जातात. पण प्रत्येकाचा रस्ता वेगळा. मग माझाच मार्ग खरा हा एक प्रकारचा अहंगंड तयार होतो. मग तो वारकरी, दासपंथी, साधूपंथी, विरागी, योगी, स्वामी प्रत्येकाचा मार्ग वेगळा त्याची शिकवण वेगळी. मग ‘सर्वदेव नमस्कार: केशवं प्रति गच्छति’ हे जर खरे तर तो सगळ्यातच आहे. म्हणजे नास्तिक, देव न मानणाºयातही आहे. देहाचे विभ्रम दूर करून आत्मस्वरूपी लीन होणे म्हणजे अध्यात्म.आता हा प्रत्येकाचा मार्ग वेगळा म्हणून रस्ता वेगळा, पंथ वेगळा. मग याचे अनुयायी वेगळे, त्याचे वेगळे. त्यांची भांडणे होणार. एखाद्या माणसाला फितवायचे असेल तर त्याची धार्मिक भावना जागवायला हवी, त्याला कट्टर जातीयवादी बनवायला हवं. म्हणजे तो राम, बुद्ध, येशूला मानत असेल तर इतर धर्मांबाबत त्याला द्वेषच वाटायला हवा. एकदा प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी मिळालं की तो निवांत. मग तो कशाला भांडेल. म्हणून त्याला कायम अभावात जगवायला पाहिजे. तुला काही तरी कमी आहे ही भावना त्याच्यात रुजवली आणि ती कमी अमूकमुळे आहे हे सांगितलं की तो युद्धाला तयार, खरा संत शांती, दया, क्षमाच सांगतो. भांडतात आणि भांडवतात अनुयायीच.धर्मापासून राजकारणापर्यंत नेता लागतो आपल्याला जय म्हणायला. याबाबत आपण अंध आहोत. सत्यासाठी लढणारे, बलिदान देणारे वेगळे पण सत्तेसाठी कलह करणारे वेगळे. त्याचा अभाव कायम वाढवत राहिला तर तो कायम लढायला तयार. नेत्यांनी तो अभावच जगवला, वाढविला म्हणून भगतगण वाढले. अभाव नसतोच. तो निर्माण केला जातो. सांगा काय नाही आपल्याकडे सगळंच आहे. नीट बघा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक