शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:24 IST

धर्मापासून राजकारणापर्यंत नेता लागतो आपल्याला जय म्हणायला.

किशोर पाठक|माणसं जास्तीत जास्त विरोधी वागताहेत म्हणजे एकीकडे ते कट्टर धर्म, जातीचे अभिमानी होत आहेत आणि दुसरीकडे देव, मंदिरं नाकारत आहेत. धर्म, देव, आस्तिकता, पूजा या सर्वच व्यवहारात गल्लत होतीय असं वाटतं. आता अधिक महिन्यात तर हे कट्टरत्व फार वाढत आहे. एका मित्राकडे नवी सून घरात आली. मुलीचा बाबा म्हणाला, अधिकात मुलीने नवऱ्याचं तोंड पाहू नये. निदान पहिले तीन दिवस. सगळे गप्प. म्हटलं घेऊन जा. आता मुलं-मुली लग्नाच्या आधीच खूप पोझेसचे फोटो घेतात. तसे ते एकमेकांचे असतात. मग आपण नक्की काय नाकारतो. हे विधी अध्यात्म्याच्या आड येतात. प्रत्येकाने धर्माचे स्वत:चे अधिष्ठान केले आहे. हा माझा मार्ग. पटला तर बघा. म्हणजे सगळे एकाच परमेश्वराकडे जातात. पण प्रत्येकाचा रस्ता वेगळा. मग माझाच मार्ग खरा हा एक प्रकारचा अहंगंड तयार होतो. मग तो वारकरी, दासपंथी, साधूपंथी, विरागी, योगी, स्वामी प्रत्येकाचा मार्ग वेगळा त्याची शिकवण वेगळी. मग ‘सर्वदेव नमस्कार: केशवं प्रति गच्छति’ हे जर खरे तर तो सगळ्यातच आहे. म्हणजे नास्तिक, देव न मानणाºयातही आहे. देहाचे विभ्रम दूर करून आत्मस्वरूपी लीन होणे म्हणजे अध्यात्म.आता हा प्रत्येकाचा मार्ग वेगळा म्हणून रस्ता वेगळा, पंथ वेगळा. मग याचे अनुयायी वेगळे, त्याचे वेगळे. त्यांची भांडणे होणार. एखाद्या माणसाला फितवायचे असेल तर त्याची धार्मिक भावना जागवायला हवी, त्याला कट्टर जातीयवादी बनवायला हवं. म्हणजे तो राम, बुद्ध, येशूला मानत असेल तर इतर धर्मांबाबत त्याला द्वेषच वाटायला हवा. एकदा प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी मिळालं की तो निवांत. मग तो कशाला भांडेल. म्हणून त्याला कायम अभावात जगवायला पाहिजे. तुला काही तरी कमी आहे ही भावना त्याच्यात रुजवली आणि ती कमी अमूकमुळे आहे हे सांगितलं की तो युद्धाला तयार, खरा संत शांती, दया, क्षमाच सांगतो. भांडतात आणि भांडवतात अनुयायीच.धर्मापासून राजकारणापर्यंत नेता लागतो आपल्याला जय म्हणायला. याबाबत आपण अंध आहोत. सत्यासाठी लढणारे, बलिदान देणारे वेगळे पण सत्तेसाठी कलह करणारे वेगळे. त्याचा अभाव कायम वाढवत राहिला तर तो कायम लढायला तयार. नेत्यांनी तो अभावच जगवला, वाढविला म्हणून भगतगण वाढले. अभाव नसतोच. तो निर्माण केला जातो. सांगा काय नाही आपल्याकडे सगळंच आहे. नीट बघा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक