शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

प्रक्रिया उद्योगांची भासतेय उणीव

By admin | Updated: June 17, 2017 03:10 IST

केळी, कापूस ही खान्देशची प्रमुख पिके असताना त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची मोठी आवश्यकता आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतर सरकारने

- मिलिंद कुलकर्णी केळी, कापूस ही खान्देशची प्रमुख पिके असताना त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची मोठी आवश्यकता आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतर सरकारने या विषयावर लक्ष केंद्रित करायला हवे. कर्जमाफीसंबंधी राज्य सरकारने निर्णय घेतल्याने त्याचा खान्देशातील सुमारे तीन लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने लाभ होणार आहे. त्यांना सुमारे १५०० कोटी रुपयांचे कर्ज मिळून त्यांचा खरीप हंगाम मार्गी लागणार आहे. मात्र यासोबतच सिंचनाची व्यवस्था आणि प्रक्रिया उद्योगाकडे शासनाने लक्ष दिल्यास बळीराजा खऱ्या अर्थाने कर्जमुक्त आणि चिंतामुक्त होईल.खान्देशात शेतकरी आंदोलन झाले; पण ते टोकाचे नव्हते. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुकावगळता शेतकरी संघटनेचे अस्तित्व तिन्ही जिल्ह्यात फारसे नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडी घेतल्याने परिणाम दिसून आला. नोटाबंदी आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना नाकारलेले कर्ज यामुळे जिल्हा बँकांविषयी शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. ९६५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जामुळे सुमारे सव्वादोन लाख शेतकरी यंदा पीक-कर्जापासून वंचित राहिले. परंतु धुळे-नंदुरबार बँक ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात, तर जळगाव बँकेत खडसेंची कन्या अध्यक्ष असली तरी सर्वपक्षीय नेते संचालक मंडळात आहेत. त्यामुळे आंदोलनाचा रोख बँकेकडे न नेता राज्य सरकारवर कसा राहील, याची आंदोलनात काळजी घेण्यात आली. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत शेतीसंबंधी आखलेले धोरण बांधापर्यंत पोहोचल्यास बळीराजा सक्षम होईल. जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा होत असला तरी त्या कामांविषयी आता लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था तक्रार करू लागल्या आहेत. प्रामुख्याने कृषी आणि वनविभागाच्या कामांविषयी तक्रारीचे प्रमाण अधिक आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पाणी परिषदेत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी ही योजना ठेकेदारमुक्त करण्याची मागणी केल्याने या योजनेचे स्वरूप अधोरेखित झाले आहे.जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे खान्देशचे असल्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी वर्षभरापूर्वी पाहणी केलेल्या तापीवरील महाकाय प्रकल्पाची गाडी अद्याप पुढे सरकलेली नाही. गिरणा नदीवर चार बलून बंधारे, बोदवड उपसा सिंचन योजना, पाडळसरे धरणाला गती, प्रकाशा आणि सारंगखेडा बंधाऱ्याचे पाणी कालव्यांद्वारे शेतीपर्यंत पोहचविणे, बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करणे अशी प्रलंबित प्रकल्पांची लांबलचक यादी आहे. यातील काही कामे मंजूर झाली आहेत, केंद्र वा राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे; पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही. त्यामुळे केवळ घोषणा होत आहेत, अंमलबजावणी नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून खान्देशात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याची घोषणा केली होती. खान्देशात सर्वाधिक कापूस पिकविला जात असताना तो प्रक्रियेसाठी गुजरातमध्ये येतो, हे आम्ही थांबवू असे मोदी म्हणाले होते. जामनेर येथे टेक्सटाईल पार्कच्या घोषणेशिवाय अडीच वर्षात काहीही प्रगती झालेली नाही. अजूनही कमी दराने व्यापारी कापूस खरेदी करून गुजरातला प्रक्रियेसाठी पाठवत आहे. केंद्र सरकारच्या चाळीसगाव व धुळे येथे कापड गिरण्या होत्या, त्या कधीच बंद पडल्या. त्यांची जागा अजून केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. सहकारी सूतगिरण्या एखाद-दुसरा अपवादवगळता रडतखडत सुरू आहे. धरणगाव, पाचोरा व जामनेर तालुक्यांमध्ये खासगी सूतगिरण्या मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या अर्थसाहाय्य, वीजपुरवठा, निर्यात यासंबंधी अडचणी आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले तरी हा उद्योग टिकू शकतो. हीच स्थिती केळीची आहे. फळपिकाचा दर्जा देण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे फेब्रुवारी २०१५ पासून प्रलंबित आहे. केळीपासून धागानिर्मितीचे आमदार हरिभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग प्रॉडक्टसारखे उपक्रम वाढले तर केळी उत्पादकांना दिलासा मिळेल. सरकारशी संबंधित हे सगळे विषय आहेत.