शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
6
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
7
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
8
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
9
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
10
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
11
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
12
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
13
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
14
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
15
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
16
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
17
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
18
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
19
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
20
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...

कायद्याच्या वेशीवर बेपर्वाईची लक्तरे

By admin | Updated: February 13, 2015 00:09 IST

वाळूच्या तस्करीत सोकावलेल्यांच्या पाठिंब्यावर गुंडगिरीचे दुकान मांडणाऱ्या पिन्या कापसे या अट्टल बदमाशाने भर सायंकाळी पोलीस नाईक दीपक कोलते

अनंत पाटील -

वाळूच्या तस्करीत सोकावलेल्यांच्या पाठिंब्यावर गुंडगिरीचे दुकान मांडणा-या पिन्या कापसे या अट्टल बदमाशाने भर सायंकाळी पोलीस नाईक दीपक कोलते यांची हत्त्या केली आणि नगर-मराठवाड्याच्या सीमेवरील गोदापात्र रक्ताने माखले गेले. यानंतरही पोलीस दल आणि सरकार अतिशय ढिम्मपणे पावले टाकत आहे. एकूणच सोकावलेल्यांची हिंमत वाढविणाऱ्या या प्रकाराने नगर जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे अद्याप वेशीलाच टांगलेली आहेत, याची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली. शेवगाव तालुक्यातील मुंगी परिसरातील वाळू तस्करी अन् अनुषंगिक गुन्हेगारी कारनाम्यांच्या नोंदीची डायरी एव्हाना ओसंडून वाहते आहे. अहमदनगर, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरील हा भूभाग ‘बिहार’सदृश म्हणावा लागेल. त्यावर शासनाचे नियंत्रण नाहीच. पोलीस असो वा महसूल, या यंत्रणांवर वाळू तस्कर आणि त्यांच्या टोळीचे अप्रत्यक्ष वर्चस्व. काही तस्करांना राजकीय टिळा लागल्याने, त्यांच्यासाठी हा अधिकृत परवानाच! सामान्य जनतेला जीव मुठीत घेऊनच जगावे लागते. आवाज केलाच तर मुस्कटदाबी करण्यासाठी शासकीय यंत्रणाच सरसावतात. याची धास्ती सामान्य जनता तर घेणारच. त्यांना अद्याप आशेचा किरण गवसलेला नाही.३ फेब्रुवारीला झालेल्या हत्त्याकांडानंतर पोलिसांना मुख्य संशयित पिन्या कापसे अद्याप सापडलेला नाही. पिन्या कापसे आणि भाजपातील संबंधही पुढे आले आहेत. त्याचे वडील भारत कापसे शेवगाव तालुक्यातील आंतरवाली बुद्रुक या गावाचे सरपंच आहेत. तेही भाजपाचे! त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणी दाखविलेली ढिलाई संशयाच्या भोवऱ्यात आहे. एका दुय्यम संशयिताला पकडणे आणि शेवगावचा पोलीस निरीक्षक अजित लकडे यास तपासात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित करणे हीच काय ती तपासातील ‘कामगिरी’! यातील लकडेचे निलंबन हलगर्जीपणा केला म्हणून झाले, असा दावा पोलीस दलाकडून होत आहे. याच लकडेवर मयताच्या नातेवाइकांनी गुन्हेगारांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या आरोपांशीही हे निलंबन जोडून पाहिले जात आहे. तसे असेल तर गुन्हेगारांशी असलेल्या संबंधांचा त्यांनी अप्रत्यक्ष पुरावाच दिला, असे म्हटले पाहिजे. नगर-नाशिक जिल्ह्यातील गोदावरी-मुळा, तर खान्देशातील तापी, गिरणा, पांझरा नदीपात्रे वाळू तस्कर आणि त्यांच्या पैशातून फोफावलेल्या गुंडगिरीच्या उच्छादाने कायम तप्त असतात. निर्ढावलेल्या या टोळ्यांनी आजवर कायद्याचा खून पाडला, सामान्य जनतेला भीतीच्या खाईत लोटले. आता तर ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी त्यांचेच खून पडत आहेत. या खाईतून जनतेला बाहेर कोण काढणार?राळेगणची लगबगज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांचे राळेगणसिद्धी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. म्हणजे मध्यंतरी त्यांच्याकडे चुकूनही न पाहणाऱ्या टीव्हीवाल्यांचे लाईट अन् कॅमेरे पुन्हा एकदा या परिसरात लकाकत आहेत. प्रसन्न चेहऱ्यानिशी अण्णांचे दर्शन पुन्हा एकवार देशाला होत आहे. त्यात पूर्वशिष्योत्तम अरविंद केजरीवालांनी दिल्लीत अटकेपार झेंडा रोवल्याने एक कळी अधिकची खुलली आहे. नऊ महिन्यांच्या नरेंद्र मोदी सरकारची लक्षणे ठीक नाहीत, हे अण्णांना आता उमगले आहे. त्यांना कधी काय उमगेल याचा काही नेम नसतो. म्हणजे कालपर्यंत मोदींना कारभार करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे, असे म्हणणाऱ्या अण्णांनी आता ‘मोदींनी जनतेला फसवले’ असे सांगत ‘पुन्हा चलो दिल्ली’चा नारा देऊन टाकला आहे. जनलोकपाल करत नाही, काळे धन भारतात आणले नाही, गरिबांऐवजी धनाढ्य उद्योजकांचे भले केले, असे अण्णांचे मोदींवरील आक्षेप. याच मुद्द्यांवर अण्णा दिल्लीत आंदोलन उभारणार आहेत. आंदोलनाची घोषणा होताच नव्या ‘टीम अण्णा’ची चर्चा सुरू झाली आहे. आपणही त्यात असावे, या अपेक्षेने हौश्या-नवश्यांनी सध्या राळेगणकडे धाव घेतली आहे.