शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वृक्षतोड अन् लागवडीचा कोल्हापुरी तिढा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:35 IST

कोल्हापुरात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचे आढळून आल्यास संबंधितांस दहा हजार रुपयांचा दंड, तसेच फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. पण, अपुऱ्या यंत्रणेवर याची अंमलबजावणी शक्य आहे का?

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापुरात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचे आढळून आल्यास संबंधितांस दहा हजार रुपयांचा दंड, तसेच फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. पण, अपुऱ्या यंत्रणेवर याची अंमलबजावणी शक्य आहे का?वृक्ष ही पर्यावरणाचा समतोल राखणारी निसर्गसंपदा आहे. ती कमी झाल्यानेच पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ठिकठिकाणी दुष्काळ पडत आहेत. यामुळे वृक्षसंपदा वाढीबाबत शासन जागरूक झाले आहे. बेकायदा वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा कायदा देशात, तसेच राज्यात पूर्वीपासूनच लागू आहे. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांचे वृक्षतोड आणि लागवडीबाबत स्वतंत्र नियम आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेने गेल्या आठवड्यात या नियमांत सुधारणा केली आहे.त्यानुसार महापालिका हद्दीत यापुढे बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचे आढळून आल्यास संबंधितांस दहा हजार रुपयांचा दंड, तसेच फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. खासगी तसेच शासकीय जागेतील धोकादायक वृक्षांच्या फांद्या, तसेच वृक्ष तोडायचा झाल्यास प्रतिवृक्ष एक हजार रुपये अनामत, तसेच एकास पाच वृक्ष लावावे लागणार आहेत. याशिवाय एक हजारापासून पाच हजार रुपयांपर्यंत अनामतही भरावी लागणार आहे. किरकोळ फांद्या तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने हे दर निश्चित केले आहेत. कागदावर हे नियम एकदम कडक भासतात; पण त्याची अंमलबजावणी किती काटेकोर होते. ती करण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा आहे का? याबाबत नागरिंकांमध्ये पुरेशी जागरुकता आहे का? नसेल तर ती करण्याबाबत महानगरपालिका प्रशासन काही करते का? यासारख्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळत नाहीत. असे असेल तर मग कायदा अथवा नियम कागदोपत्रीच राहतो. किंवा सोयीनुसार त्याचा वापर केला जातो.ही परिस्थीती कमी अधिक प्रमाणात राज्यातील सर्वच महापालिका क्षेत्रांमध्ये आहे. कोल्हापूर तसे जैवविविधतेने नटलेले शहर आहे. पुरेसा पाऊस असल्याने येथील वृक्षराजीही भरपूर आहे. महापालिकेने या वृक्षराजीची गणना दर पाच वर्षांनी करणे गरजेचे आहे. कोल्हापूर महापालिकेने२००९ मध्ये अशी गणना करण्याचा ठेका एका कंपनीला दिला होता. मात्र, या कंपनीकडून होण्याºया वृक्षगणनेबाबत तक्रारी झाल्यानंतर दुसºया एजन्सीकडे हे काम देण्यात आले. त्या एजन्सीने ही गणना पूर्ण करून महापालिकेकडे अहवाल दिला आहे. मात्र, महापालिकेने तो अद्याप जाहीरच केलेला नाही. यामागचे गौडबंगाल काय? मागणी करूनही हा अहवाल वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीतही दिला गेला नसल्याचे सांगण्यात येते. वास्तविक २०१९ मध्ये या गणनेला १० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दहा वर्षांत काय झाले? याचा अहवाल कधी मिळणार? वृक्षतोडीचे किंवा फांद्या तोडीचे परवाने मागणारे अर्ज आल्यानंतर ते तत्काळ मंजूर झाले तर ठीक, नाहीतर या मंजुरीसाठी नागरिकांनी आपली नियोजित कामे थांबवायची काय? वृक्षप्राधिकरणाच्या बैठकाही नियमित होत नाहीत. शहरात५४ उद्याने आहेत. शिवाय रस्ते, वॉर्ड येथील झाडांची देखभाल करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. यावर नियंत्रणाची जबाबदारी केवळ एकाच सहायक उद्यान अधीक्षकांवर आहे. अशा अपुºया यंत्रणेवर आपण यशाची आशा कशी बाळगणार? सध्या सर्वत्र कृषी दिनानिमित्ताने होत असलेल्या वृक्षारोपणाची चर्चा आहे. यातील जगतात किती? हा प्रश्न आहेच; पण असलेल्या झाडांचे जतन, संवर्धनाबाबत केवळ कोल्हापूरच नव्हे, तर राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी यंत्रणेतील त्रुटी दूर करून उपाययोजना करायला हव्यात. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर