शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

वृक्षतोड अन् लागवडीचा कोल्हापुरी तिढा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:35 IST

कोल्हापुरात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचे आढळून आल्यास संबंधितांस दहा हजार रुपयांचा दंड, तसेच फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. पण, अपुऱ्या यंत्रणेवर याची अंमलबजावणी शक्य आहे का?

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापुरात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचे आढळून आल्यास संबंधितांस दहा हजार रुपयांचा दंड, तसेच फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. पण, अपुऱ्या यंत्रणेवर याची अंमलबजावणी शक्य आहे का?वृक्ष ही पर्यावरणाचा समतोल राखणारी निसर्गसंपदा आहे. ती कमी झाल्यानेच पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ठिकठिकाणी दुष्काळ पडत आहेत. यामुळे वृक्षसंपदा वाढीबाबत शासन जागरूक झाले आहे. बेकायदा वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा कायदा देशात, तसेच राज्यात पूर्वीपासूनच लागू आहे. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांचे वृक्षतोड आणि लागवडीबाबत स्वतंत्र नियम आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेने गेल्या आठवड्यात या नियमांत सुधारणा केली आहे.त्यानुसार महापालिका हद्दीत यापुढे बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचे आढळून आल्यास संबंधितांस दहा हजार रुपयांचा दंड, तसेच फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. खासगी तसेच शासकीय जागेतील धोकादायक वृक्षांच्या फांद्या, तसेच वृक्ष तोडायचा झाल्यास प्रतिवृक्ष एक हजार रुपये अनामत, तसेच एकास पाच वृक्ष लावावे लागणार आहेत. याशिवाय एक हजारापासून पाच हजार रुपयांपर्यंत अनामतही भरावी लागणार आहे. किरकोळ फांद्या तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने हे दर निश्चित केले आहेत. कागदावर हे नियम एकदम कडक भासतात; पण त्याची अंमलबजावणी किती काटेकोर होते. ती करण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा आहे का? याबाबत नागरिंकांमध्ये पुरेशी जागरुकता आहे का? नसेल तर ती करण्याबाबत महानगरपालिका प्रशासन काही करते का? यासारख्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळत नाहीत. असे असेल तर मग कायदा अथवा नियम कागदोपत्रीच राहतो. किंवा सोयीनुसार त्याचा वापर केला जातो.ही परिस्थीती कमी अधिक प्रमाणात राज्यातील सर्वच महापालिका क्षेत्रांमध्ये आहे. कोल्हापूर तसे जैवविविधतेने नटलेले शहर आहे. पुरेसा पाऊस असल्याने येथील वृक्षराजीही भरपूर आहे. महापालिकेने या वृक्षराजीची गणना दर पाच वर्षांनी करणे गरजेचे आहे. कोल्हापूर महापालिकेने२००९ मध्ये अशी गणना करण्याचा ठेका एका कंपनीला दिला होता. मात्र, या कंपनीकडून होण्याºया वृक्षगणनेबाबत तक्रारी झाल्यानंतर दुसºया एजन्सीकडे हे काम देण्यात आले. त्या एजन्सीने ही गणना पूर्ण करून महापालिकेकडे अहवाल दिला आहे. मात्र, महापालिकेने तो अद्याप जाहीरच केलेला नाही. यामागचे गौडबंगाल काय? मागणी करूनही हा अहवाल वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीतही दिला गेला नसल्याचे सांगण्यात येते. वास्तविक २०१९ मध्ये या गणनेला १० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दहा वर्षांत काय झाले? याचा अहवाल कधी मिळणार? वृक्षतोडीचे किंवा फांद्या तोडीचे परवाने मागणारे अर्ज आल्यानंतर ते तत्काळ मंजूर झाले तर ठीक, नाहीतर या मंजुरीसाठी नागरिकांनी आपली नियोजित कामे थांबवायची काय? वृक्षप्राधिकरणाच्या बैठकाही नियमित होत नाहीत. शहरात५४ उद्याने आहेत. शिवाय रस्ते, वॉर्ड येथील झाडांची देखभाल करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. यावर नियंत्रणाची जबाबदारी केवळ एकाच सहायक उद्यान अधीक्षकांवर आहे. अशा अपुºया यंत्रणेवर आपण यशाची आशा कशी बाळगणार? सध्या सर्वत्र कृषी दिनानिमित्ताने होत असलेल्या वृक्षारोपणाची चर्चा आहे. यातील जगतात किती? हा प्रश्न आहेच; पण असलेल्या झाडांचे जतन, संवर्धनाबाबत केवळ कोल्हापूरच नव्हे, तर राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी यंत्रणेतील त्रुटी दूर करून उपाययोजना करायला हव्यात. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर