शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाच्या कोल्हापुरी ब्रँडला हवे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 05:41 IST

कोेल्हापूर ऐतिहासिक तसेच पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळेच ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ते ‘पर्यटन हब’ बनावे, पर्यटनाचा कोल्हापुरी ब्रॅँड तयार व्हावा, यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील प्रयत्न करीत आहेत.

- चंद्रकांत कित्तुरेमहाराष्टÑातील पहिला ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ कोल्हापुरात झाला. पर्यटनवाढीसाठी त्याचे आयोजन केले होते. मात्र, पर्यटकांसाठी सोईसुविधा कधी वाढविणार ?कोेल्हापूर ऐतिहासिक तसेच पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळेच ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ते ‘पर्यटन हब’ बनावे, पर्यटनाचा कोल्हापुरी ब्रॅँड तयार व्हावा, यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील प्रयत्न करीत आहेत. त्यासाठीच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पहिला ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या महोत्सवातील फुलांच्या रंगीबेरंगी दुनियेत कोल्हापूरकर हरवून गेले होते. या फुलांच्या सुवासाचा गंध महाराष्ट्रदेशी सर्वदूर पसरला आणि पर्यटनाचा नवा कोल्हापुरी ब्रॅँड तयार झाला, असा दावा मंत्री पाटीलप्रेमी करीत आहेत. शंभरहून अधिक जातींची सुमारे दीड लाखांवर फुलझाडे त्यात होती; शिवाय फुलांनी सजविलेली धरणाची प्रतिकृती, पुतळे, मूर्ती, हत्ती, बैलगाडी सर्वकाही फुलांच्या आकर्षक रंगसंगतीने मनोहारी बनले होते. ते पाहून जो तो सेल्फीच्या अथवा मोबाईल फोटोच्या रूपात हे सर्व संस्मरणीय करू पाहत होता. सुमारे सात लाख लोकांनी या फेस्टिव्हलला भेट दिली.कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत (केएसबीपी) कसबा बावडा येथील पोलीस उद्यानात या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. याच उद्यानात राज्यातील सर्वात उंच राष्टÑध्वजही डौलाने फडकत आहे. मंत्री पाटील यांच्याच प्रेरणेने नवरात्रातही नवदुर्गा ऊर्जा महोत्सव भरविण्यात आला होता. पर्यटनवाढीचा एक भाग म्हणूनच त्याचेही आयोजन करण्यात आले होते. यापुढचा टप्पा म्हणून फेब्रुवारीत कला महोत्सव आणि एप्रिल-मेमध्ये कोल्हापूर दर्शन सहलीचे आयोजन करण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त आहेत. मात्र, हा शाश्वत पर्यटन विकास म्हणता येईल का? पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा पुरेशा उपलब्ध आहेत का? याची उत्तरे नकारात्मक मिळतात. कारण वाहतुकीची कोंडी, पार्किंगचा प्रश्न, स्वच्छतागृहांचा, निवासाचा प्रश्न यासारख्या अनेक समस्यांना पर्यटकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ते कोकण, गोव्याला अधिक पसंती देतात.आदिमाता अंबाबाई आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूर प्रसिद्ध आहेच. शिवाय कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल, ‘तांबडा-पांढरा’ यासाठी या शहराची जगभर ख्याती आहे. समृद्ध निसर्गसंपदा, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे, अनुकूल हवामान यामुळे पर्यटकांचा ओढा कोल्हापूरकडे असतो. वर्षाला सुमारे ६० लाख पर्यटक कोल्हापूरला भेट देतात. यातील सुमारे २५ लाख केवळ नवरात्रातच येतात. कोल्हापूर हे पर्यटन केंद्र बनविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असतात; परंतु घोषणा अधिक अन् अंमलबजावणी कमी, अशी त्यांची स्थिती असते. एखादा शासकीय अधिकारी किंवा मंत्री एखादा उपक्रम सुरू करतो. ते गेले की तो उप्रकमही बंद पडतो. लक्ष्मीकांत देशमुख यांनी जिल्हाधिकारी असताना ‘कोल्हापूर फेस्टिव्हल’ सुरू केला होता. ते बदलून गेल्यानंतर तो बंद पडला आहे. मंत्री पाटील यांनी सुरू केलेल्या या उपक्रमांचे तसे होऊ नये. हे उपक्रम कायमस्वरूपी झाले, पर्यटकांच्या सोयीसुविधांचा विकास प्राधान्याने केला तरच पर्यटनाचा हा कोल्हापुरी ब्रॅँड जगभरात नावारूपास येईल .

टॅग्स :kolhapurकोल्हापूर