शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोहली-शास्त्री सुपरहिट जोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 05:08 IST

आधी तीन सामन्यांची कसोटी मालिका, नंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर अखेरचा व एकमेव टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने श्रीलंका दौ-याची ९-० अशी विजयी सांगता केली.

आधी तीन सामन्यांची कसोटी मालिका, नंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर अखेरचा व एकमेव टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने श्रीलंका दौ-याची ९-० अशी विजयी सांगता केली. विशेष म्हणजे या दौºयात एकही सामना न गमावता भारताने बलाढ्य आॅस्टेÑलियाची बरोबरी केली. आॅस्टेÑलियाने याआधी अशीच कामगिरी २००९ साली पाकिस्तानविरुध्द केली होती. श्रीलंका दौºयात भारताचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, इतक्या निर्विवाद वर्चस्वाची अपेक्षा कोणीच केली नसेल. निदान टी-२० सामन्यात तरी लंका संघ भारताला झुंजवेल अशी अपेक्षा होती. पण येथेही भारताने बाजी मारली.मुळात लंका दौरा भारतीय संघापेक्षा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी मोठी परीक्षा होती. या दौºयाच्या काही दिवसांआधी अनिल कुंबळे यांनी कोहलीसह संबंध बिघडल्याच्या कारणावरून प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कोहलीच्या पसंतीच्या शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून वर्णी लागली, तसेच शास्त्री यांच्या पसंतीच्या स्टाफचीही निवड झाली. यामध्ये भारताचा माजी गोलंदाज झहिर खान सारख्या दिग्गज गोलंदाजाला संघापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळेच, पसंतीचा प्रशिक्षक मिळाल्याने कोहलीपुढे आणि पसंतीचा स्टाफ मिळाल्याने शास्त्री यांच्यापुढे खरे आव्हान होते. पण या दोघांनी आपआपली जबाबदारी चोखपणे सांभाळताना स्वत:ला सिध्द केले.मालिकेतील एकही सामना न गमावताना कोहलीने आपले नेतृत्वगुण पुन्हा एकदा सिध्द केलेच, पण शास्त्री यांनीही योग्यप्रकारे संघ व्यवस्थापन करताना प्रशिक्षक म्हणून दौºयावर गेलेल्या प्रत्येक खेळाडूला संधी दिली. आगामी विश्वचषक स्पर्धेपूर्वी मजबूत भारतीय संघ तयार करण्याचे लक्ष्य बाळगलेल्या कोहली-शास्त्री यांनी या दौºयात अनेक प्रयोग केले आणि ते सर्व प्रयोग यशस्वीही ठरले. तरी, आगामी आॅस्टेÑलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौºयात याहून चांगली कामगिरी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. पण तूर्तास तरी भारतीय संघाची भक्कम वाटचाल सुरू असल्याचे मान्य करावेच लागेल.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीRavi Shastriरवी शास्त्री