शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कोहली-शास्त्री सुपरहिट जोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 05:08 IST

आधी तीन सामन्यांची कसोटी मालिका, नंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर अखेरचा व एकमेव टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने श्रीलंका दौ-याची ९-० अशी विजयी सांगता केली.

आधी तीन सामन्यांची कसोटी मालिका, नंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर अखेरचा व एकमेव टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने श्रीलंका दौ-याची ९-० अशी विजयी सांगता केली. विशेष म्हणजे या दौºयात एकही सामना न गमावता भारताने बलाढ्य आॅस्टेÑलियाची बरोबरी केली. आॅस्टेÑलियाने याआधी अशीच कामगिरी २००९ साली पाकिस्तानविरुध्द केली होती. श्रीलंका दौºयात भारताचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, इतक्या निर्विवाद वर्चस्वाची अपेक्षा कोणीच केली नसेल. निदान टी-२० सामन्यात तरी लंका संघ भारताला झुंजवेल अशी अपेक्षा होती. पण येथेही भारताने बाजी मारली.मुळात लंका दौरा भारतीय संघापेक्षा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी मोठी परीक्षा होती. या दौºयाच्या काही दिवसांआधी अनिल कुंबळे यांनी कोहलीसह संबंध बिघडल्याच्या कारणावरून प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कोहलीच्या पसंतीच्या शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून वर्णी लागली, तसेच शास्त्री यांच्या पसंतीच्या स्टाफचीही निवड झाली. यामध्ये भारताचा माजी गोलंदाज झहिर खान सारख्या दिग्गज गोलंदाजाला संघापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळेच, पसंतीचा प्रशिक्षक मिळाल्याने कोहलीपुढे आणि पसंतीचा स्टाफ मिळाल्याने शास्त्री यांच्यापुढे खरे आव्हान होते. पण या दोघांनी आपआपली जबाबदारी चोखपणे सांभाळताना स्वत:ला सिध्द केले.मालिकेतील एकही सामना न गमावताना कोहलीने आपले नेतृत्वगुण पुन्हा एकदा सिध्द केलेच, पण शास्त्री यांनीही योग्यप्रकारे संघ व्यवस्थापन करताना प्रशिक्षक म्हणून दौºयावर गेलेल्या प्रत्येक खेळाडूला संधी दिली. आगामी विश्वचषक स्पर्धेपूर्वी मजबूत भारतीय संघ तयार करण्याचे लक्ष्य बाळगलेल्या कोहली-शास्त्री यांनी या दौºयात अनेक प्रयोग केले आणि ते सर्व प्रयोग यशस्वीही ठरले. तरी, आगामी आॅस्टेÑलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौºयात याहून चांगली कामगिरी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. पण तूर्तास तरी भारतीय संघाची भक्कम वाटचाल सुरू असल्याचे मान्य करावेच लागेल.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीRavi Shastriरवी शास्त्री