शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञान-गोदेचे वासी

By admin | Updated: June 20, 2014 09:31 IST

उपासना किंवा साधना करायची म्हटलं, तरी त्यासाठी लोक वेगवेगळ्या पवित्र तीर्थांना जातात.

अध्यात्म- डॉ. यू. म. पठाणज्ञानगोदेचे वासी। सोवळे-वोवळे नाहीं आम्हांसी ।।१।।जळ-आंघोळी मळ त्यागी। ज्ञान-आंघोळी शुच योगी ।।२।।प्रेमबोधाचा प्रयाग।शुद्ध जाले अष्टहि अंग।।३।।त्रिवेणी सत्रावीचा झरा।नाही त्रिगुण मळ शरीरा।।४।।शांति-विवेक भट सद्रुरु। शेख महंमद केले स्थिरु।।५।।उपासना किंवा साधना करायची म्हटलं, तरी त्यासाठी लोक वेगवेगळ्या पवित्र तीर्थांना जातात. ही तीर्थक्षेत्रंं बहुधा पवित्र नद्यांच्या काठीच असतात. या नद्यांमध्ये स्नान केलं, की आपण शुचिर्भूत झालो, असं मानलं जातं. भाविकांची अशी श्रद्धा असणं स्वाभाविक आहे. तथापि, या अभंगात संतकवी शेख महंमद यांनी एका वेगळ्या महत्त्वाच्या तीर्थाचं नि तिथल्या नदीचं रुपकात्मक वर्णन केलेलं आहे. ही नदी आहे ‘ज्ञानरूपी गोदावरी.’ ‘आम्ही या ज्ञानगोदेचेचवासी आहोत,’ असं शेख महंमद म्हणतात. इथं सोवळ्या-ओवळ्याचा प्रश्नच येत नाही. या ज्ञानरूपी गोदावरीमध्ये जे ‘ज्ञानाचं’ स्नान करतात ते सर्व पवित्रच असतात. त्यामुळं त्यांना परमेश्वराच्या प्रीतीचाच (भक्तिभावाचाच) ‘बोध’ किंवा ‘ज्ञान’ होत असतं. या अष्टांग स्नानामुळं कुठलाही ‘मळ’ (कुविचार) त्यांना स्पर्शच करू शकत नाही. त्यांना हे मार्गदर्शन कोण करतं? शांती आणि सद्सद्विवेकबुद्धी याच त्यांच्या ‘सद्गुरू’ होत व त्याच त्यांच्या परमार्थमार्गाची वाटचाल सुलभ करतात आणि त्यामुळंच त्यांचं मन कुठंही आणि कधीही भरकटत नाही. ते नेहमी समेवर असतं... म्हणजे एकाग्र आणि स्थिर असतं. साधकाचं मन असं एकाग्र असलं, की ते अत्यंत निष्ठेनं परमात्म्यावर केंद्रित होतं. एका अर्थानं अशा प्रकारे त्यांच्या मनाचं ‘उननयन’ (र४ु’्रें३्रङ्मल्ल) होऊ लागतं व त्यांचा उद्धार होतो.या ज्ञान-गोदेत स्नान करण्यासाठी साधकाला अन्यत्र कुठंही यावं-जावं लागत नाही. आपले ऐहिक जीवन व्यवहार करता-करताच त्याची ही ‘तीर्थयात्रा’ घरच्या घरीदेखील होते!