शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

दिवाळीत घ्या ज्ञानदीप उजळवण्याचा वसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 04:57 IST

पेटलेली पणती मानवी अस्तित्वाची चाहूल देत असते. श्रीमंतांची घरे इलेक्ट्रिकच्या माळांनी सुशोभित असतात. तर गरिबाच्या झोपडीच्या दारात थरथरणारी पणतीतील वात दिलासा देत असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा यातून दिसते.

‘नेमेचि येतो मग पावसाळा’, ‘त्याच धर्तीवर नेमेचि येते दिवाळी’ असे जरी म्हणता येत असले, तरी दिवाळी साजरी करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. आपापल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती दिवाळी साजरी करीत असते. घराला रंग देऊन, नवे कपडे परिधान करून, नव्या वस्तूंची खरेदी करून, नवनवीन खाद्यपदार्थ करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तसा प्रयत्न यंदाच्या दिवाळीत सर्वजण करताना दिसत आहेत. महागाई वाढली आहे, असे म्हणत-म्हणत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी बिनभोबाट सुरू आहे. मुलाबाळांसाठी आणि स्वत:साठीदेखील पालकांकडून नवीन कपडे खरेदी केले जात आहेत. आॅनलाइन खरेदीला ऊत आला असला, तरी मॉलमध्ये जाऊन खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. जनतेचा महापूर सर्वच दुकानांमधून ओसंडून वाहताना दिसत आहे आणि हेच दिवाळीचे वैशिष्ट्य आहे. दिवाळी हा ‘सण’ कमी आणि आनंदोत्सव जास्त असे, या सणाचे वर्णन करता येईल. आपण आनंदित राहायचे आणि हा आनंद इतरांना वाटायचा, असा प्रयत्न प्रत्येक जणच करीत असतो. आनंदी राहण्याचा जणू मंत्रच हा सण देत असतो. यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाची छाया आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता, पण हवामान हे लहरी असते आणि या लहरीपणाचा अंदाज कोणत्याही यंत्रणेला अचूक घेता येत नाही. या अंदाजावर विसंबून राहणाºयांना फजितीला आणि त्यामुळे हवामान खात्याला लोकांच्या टीकेला तोंड द्यावे लागते, पण कधी-कधी हे अंदाज अचूक ठरून लोकांना वादळाचा आणि पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो, हेही विसरून चालणार नाही. माणूस ज्याप्रमाणे ज्योतिषांच्या भाकितांवर पूर्णपणे विसंबून राहात नाही. त्याचप्रमाणे, हवामान खात्याचे अंदाजही माणसाने आधार म्हणून वापरले, तर त्यांची फसगत होणार नाही. सरकारने काही तालुक्यांपुरता दुष्काळ घोषित केला आहे. त्यामुळे त्या तालुक्यातील लोकांना दुष्काळात मिळणाºया सवलती मिळू शकतील, तसेच सरकारी मदतही मिळू शकेल. त्या आधारे त्यांनी भविष्यासाठी नियोजन केले, तर एखादा ऋतू कोरडा जरी गेला, तरी त्यामुळे त्यांचेवर देशोधडीला लागण्याची वेळ येणार नाही. सरकार हे लोककल्याणकारी असते. ते लोकांना वाºयावर सोडू शकत नाही, हे जरी खरे असले, तरी प्रत्येक व्यक्तीने भविष्याचा विचार करून, स्वत:च्या भविष्यासाठी तरतूद करून ठेवणेच गरजेचे असते. मुंगीसारखा क्षुल्लक जीव स्वत:च्या भविष्याची तरतूद करून ठेवीत असतो. उलट टोळासारखा कीटक ‘आता कशाला उद्याची बात’ या विचाराने जीवन जगत असतो. आपण कसे जगायचे, मुंगीसारखे की टोळासारखे, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. जीवनाचा आनंद तर घ्यायचा, पण भविष्याचाही विचार करायचा, अशी प्रवृत्ती बाळगणाºयांना जीवनात निराश व्हायची वेळ सहसा येत नाही. दिवाळी साजरी करताना, संपूर्ण परिसर उजळून टाकण्याचा प्रयत्नही माणसाकडून होत असतो. दुष्ट शक्तीवर सुष्ट शक्तीचा विजय, अंधारावर प्रकाशाची मात, पती-पत्नीच्या, बहीण-भावाच्या नात्यांचा उजाळा आणि गोवत्साच्या पूजनातून सकल प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचा संकेत असे अनेक पैलू या दिवाळीच्या सणाला लाभलेले आहेत. म्हणून हा सण विशिष्ट जाती-धर्मापुरता मर्यादित राहिलेला नाही. अशा स्थितीत सकल मानव जातीला एका सूत्रात बांधणारा सण म्हणून सर्वांनी साजरा केला, तर मानवाच्या जीवनात प्रसन्नता आणि आनंद बहरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात तर या सणाच्या निमित्ताने संगीत आणि साहित्य हे प्रकार सर्वत्र जोपासले जातात, ते दिवाळी पहाट व दिवाळी अंकांच्या माध्यमातून. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी या सणाचे वर्णन ज्ञानाची दिवाळी असे पुढीलप्रमाणे केले आहे, सूर्ये अधिष्ठिली प्राची, जया राजीव दे प्रकाशाची, तैसी श्रोतिया ज्ञानाची, दिवाळी करी. आपण सर्वांनी त्याप्रमाणे वर्तन करून दिवाळीचा आनंद लुटत असताना, सर्वत्र ज्ञानदीप पाजळण्याचा वसाही घ्यावा आणि सारे जीवन संपन्न व सुसंस्कृत करून सोडावे, हीच अपेक्षा.

टॅग्स :Diwaliदिवाळी