शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

वरून कीर्तन अन् आतून....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:08 IST

मंडळी आज निरुपणाला नाथबाबांचे (संत एकनाथ) भारुड घेतले म्हणून चकित होऊ नका. आम्हांस ठाऊक आहे की, कीर्तन परंपरेनुसार नामस्मरणानंतर अभंग घेण्याची प्रथा आहे. पण नाथषष्ठी येऊ घातली आहेच. शिवाय, आजचा प्रसंगही तसा बाका आहे. काल आम्ही जळगावी होतो. नाथाभाऊंचा सध्या तिथं हरिनाम सप्ताह सुरू आहे.

- नंदकिशोर पाटीलभूत जबर मोठं ग बाईझाली झडपड करू गत काई ।।सूप चाटून केले देवऋषी,या भूताने धरिली केशी।।लिंबू नारळ कोंबडा उतारात्या भूताने धरिला थारा।।मंडळी आज निरुपणाला नाथबाबांचे (संत एकनाथ) भारुड घेतले म्हणून चकित होऊ नका. आम्हांस ठाऊक आहे की, कीर्तन परंपरेनुसार नामस्मरणानंतर अभंग घेण्याची प्रथा आहे. पण नाथषष्ठी येऊ घातली आहेच. शिवाय, आजचा प्रसंगही तसा बाका आहे. काल आम्ही जळगावी होतो. नाथाभाऊंचा सध्या तिथं हरिनाम सप्ताह सुरू आहे. अनेक संत-महंत येऊन हजेरी लावत आहेत. म्हटलं आपणही पायधूळ झाडून यावी. ज्या नाथाभाऊंनी खान्देशात भाजपधर्माचा पाया रचिला त्यांना पक्षाने किंकरासारखे बाजूला सारिले म्हणून काय झाले? आपल्या खान्देशी संप्रदायाची पताका त्यांनी अजून खाली ठेवलेली नाही बरं का! नाथाभाऊंच्या हरिनाम सप्ताहासाठी राष्टÑवादी सेवा संस्थानचे ह.भ. अजित (बुवा) बारामतीकर देखील आले होते. सर्वांसमक्ष त्यांनी नाथाभाऊंना आलिंगन दिलं. आहाहा! काय तो दुर्मीळ क्षण! हल्ली अशा संतभेटी होतात कुठे महाराज? म्हणून तो क्षण याचि डोळा, याचि मोबाईल साठविण्याची संधी आम्ही दवडली नाही. आम्ही धन्य जाहलो! वस्तुत: दादा-भाऊंच्या मनीच्या गुजगोष्टी ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले होते. पण थोरामोठ्यांची बातच निराळी. आपल्या कानगोष्टींची त्यांनी कुणाला कानोकानी खबर लागू दिली नाही महाराज! तेही सहाजिकच म्हणा. ‘सत्तेविना स्वारी, मन रमेना संसारी’ असं जगजाहीर कसं सांगणार?अनुभवातून माणंस शहाणी होतात महाराज!(बोला विठ्ठलंऽ विठ्ठलंऽऽ विठ्ठलं ऽऽऽ)-तर मंडळी, सांगायचं तात्पर्य काय? नाथबाबा म्हणतात, लोकसेवेपेक्षा परमार्थ हीच खरी ईश्वरसेवा. प्रपंचाशिवाय, परमार्थ आणि परमार्थाशिवाय परमेश्वर प्राप्ती होणे नाही. राजे हो, सत्तासुंदरी ही तर मोहमाया. तिच्या नादी लागून रावांचे रंक, नाथांचे अनाथ अन् योगींचे भोगी झाले. या भुताटकीला उतारा गंडेदोरे टाळा...(बोला, विठ्ठलंऽ विठ्ठलंऽऽ विठ्ठलं ऽऽऽ)-तर मंडळी, नाथबाबांनी आपल्या भारुडातून समाजाच्या अंगातील अंधश्रद्धेची भुताटकी उतरवली. पण सत्तेची भुताटकी गेलीच नाही. सत्ता आणि सीतेच्या मोहापायी लंका जळाली. बिभीषण हुशार होता महाराज. काळाची गरज ओळखून त्यानं पक्ष बदलला. सुग्रीवानं हनुमंतांना बाहेरुन पाठिंबा दिला आणि शकुनीनं पांडवांचा पक्ष फोडला!(बोला, पुंडलिका हरी विठ्ठलऽऽ)-तर मंडळी कीर्तनाच्या उतरार्र्धाकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो ती नीट ध्यानात ठेवा. तुम्हाला राजकारणात पाऊल ठेवायचं असेल, तर नारद मंडळीपासून सावध राहा. नारद देवलोकांत गेलेच नाहीत. वेशांतर करून ते भूलोकीच आहेत. कधी ‘आरटीआय’ टाकून तर कधी ब्रेकिंग न्यूज देऊन कुणाला अडचणीत आणतील याचा नेम नाही! सत्तेची ‘लक्ष्मणरेषा’ आणि संघाचा कावा वेळीच ओळखा. देवेंद्राचा धावा कामाचा नाही. नाही तर, लक्ष्मी चतुर्भूज झाली नि सत्तेबाहेर घेऊनी आली, अशी नाथाभाऊंसारखी गत व्हायची महाराज!

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे