शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

खैैरेंच्या शेंगा अन् कदमांची टरफले

By सुधीर महाजन | Updated: December 21, 2017 00:04 IST

शिवसेनेत भाजपविषयीचा सवतीमत्सर जोरावर असतानाच अंतर्गत हाणामारीसुद्धा तितक्याच मनापासून चाललेली दिसते. मराठवाड्यात सेना तशी औरंगाबादेत प्रभावी म्हणून येथील हाणामारीचा कांगावा थेट ‘मातोश्री’पर्यंत जातो. पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील ‘लव्ह-हेट’ स्टोरीला अनेक छटा आहेत.

शिवसेनेत भाजपविषयीचा सवतीमत्सर जोरावर असतानाच अंतर्गत हाणामारीसुद्धा तितक्याच मनापासून चाललेली दिसते. मराठवाड्यात सेना तशी औरंगाबादेत प्रभावी म्हणून येथील हाणामारीचा कांगावा थेट ‘मातोश्री’पर्यंत जातो. पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील ‘लव्ह-हेट’ स्टोरीला अनेक छटा आहेत. कधी अट्टी-बट्टी, तर कधी गळाभेट गट्टी अशी ती दिसत असली तरी वेळेवर डंख मारण्याची संधी कुणीही सोडत नाही. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे ही शिवसेनेची जुनी मागणी. दरम्यान, दोनवेळा सरकार आले तरी अजून ती पुढे सरकली नाही, म्हणून परवा शिवसेनेने आंदोलन केले. या आंदोलनाच्या विरोधात खरे तर विरोधकांनी आगपाखड करावी; पण पालकमंत्री रामदास कदमांनीच खैरेंवर टीका केली ती अशी, ‘खैरेंनी आता दुसºयाच्या नावावर शेंगा खाऊ नये स्वत: काही तरी करावे’, एका अर्थाने शिवसेनेच्या आंदोलनावर सेनेचाच मंत्री टीका करतो ही गोष्ट पचनी पडण्यासारखी नाही.पालकमंत्री रामदास कदम ज्या-ज्या वेळी येतात तेव्हा काहीतरी वाद निर्माण होतो, आता शेंगा आणि टरफलांचा वाद पेटला. कारण शहराचे नामांतर होत नाही त्याला सेनेचे मंत्री जबाबदार आहेत, असा आरोप केला होता, तर प्रस्ताव केंद्रात असताना खैरे संसदेत काय करतात, असा सवाल कदमांनी उभा केला. खैरेंनी आपले मित्र नंदकुमार घोडेले यांना महापौरपदावर बसवले त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून अभय घेतले. त्यासाठी घोडेलेंना घेऊन ते थेट ‘वर्षा’वर धडकले होते. येथे पालकमंत्र्यांना त्यांनी अंधारात ठेवले, ही कदमांची सल आहे. शेंगा आणि टरफलाचे मूळ येथे सापडते.नामांतराच्या या आंदोलनातही सेनेतील गटबाजी उघड दिसली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे गैरहजर होते. चार दिवसांपूर्वीच सिल्लोडचे नगरसेवक घरमोडे यांच्यावरील गुन्ह्यांसंदर्भात खैरे शिष्टमंडळासह जिल्हाधिकाºयांना भेटले त्यावेळीसुद्धा दानवे नव्हते. त्यांचा दानवेविरोध नवा नाही, तर दुसरीकडे दानवे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचे चांगलेच गूळ-पीठ आहे. त्यात जाधव आता गप्प बसले असले तरी खैरे-जाधवांची खडाखडी आजवर अनेक वेळा दिसून आली. दानवेंना जसा खैरेंचा विरोध तसा सेनेतील बिगर मराठा लॉबीचा विरोध; पण त्यांची जागा घेण्याची एकाचीही तयार नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खैरे कधी दानवेंच्या गळ्यात गळा घालतील याचा नेम नाही, म्हणून सगळेच सावध आहेत.सेनेच्या संघटनात्मक बांधणीत पदांची खिरापत वाटली गेली. शहरात २४ शहर उपप्रमुख आहेत, तर तेवढेच उपजिल्हाप्रमुख नियुक्त केले, तसे महानगरपद निर्माण करून त्यावर प्रदीप जैस्वालांची नियुक्ती केली, अशी पदांची खिरापत वाटण्यात आली याचाच अर्थ निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली. आता आनंद तांदुळवाडीकर आणि गिरिजाराम हाळनोर यांना कोणती पदे मिळणार याची उत्सुकता आहे. तसेच सुहास दाशरथेंची व्यवस्था कुठे लागणार?(sudhir.mahajan@lokmat.com)

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेRamdas Kadamरामदास कदम