शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

केशवसुतांनी सव्वाशे वर्षांपूर्वी स्वप्राणाने फुंकलेली ‘तुतारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:14 IST

‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कविवर्य केशवसुतांनी विविध विषयांवर काव्यलेखन केले. त्यांनी लिहिलेल्या समाजप्रबोधनपर कविता सर्वाधिक सरस आहेत. या कवितांत ‘तुतारी’ या कवितेला मानाचं स्थान आहे. त्यांच्या सुप्रसिद्ध ‘तुतारी’ या कवितेला नुकतीच सव्वाशे वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त या अजरामर काव्याचे केलेले स्मरण...

- विजय बाविस्कर‘एक तुतारी द्या मज आणूनफुंकील मी जी स्वप्राणानेभेदुनि टाकीन सगळी गगनेदीर्घ जिच्या त्या किंकाळीने...सव्वाशे वर्षांपूर्वी कविवर्य केशवसुतांनी लिहिलेल्या ‘तुतारी’ या कवितेची सुरुवात या ओळींनी होते. त्यांच्या या कवितेने व्यक्तिस्वातंत्र्यांची, क्रांतीची, समतेची, नव्या मनूची ‘तुतारी’ फुंकली. एकोणिसाव्या शतकात इंग्रजी काव्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करून मराठी काव्यांत त्या संकल्पना रुजवण्याचे श्रेय केशवसुतांना जाते. त्यांनी संतकाव्य-पंतकाव्याचा प्रभाव असलेल्या मराठी काव्याला एक धीट वळण दिलं. त्यामुळे ‘आधुनिक मराठी काव्याचे जनक’ असा मान त्यांना मिळाला. आपल्या कवितांद्वारे त्यांनी महाराष्ट्रावर सुधारकी संस्कार केले.केशवसुतांनी सतत २२ वर्षे काव्यलेखन केलं. ‘कविता आणि कवी’पासून ‘प्रतिभा’ या कवितेपर्यंत त्यांनी अव्याहतपणे विविध विषय हाताळले. दिव्य भास, आम्ही कोण, झपूर्झा, हरपले श्रेय, शब्दांनो मागुते या अशा त्यांच्या विविध कविता अजरामर झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या समाजप्रबोधनपर कवितांत रसिक, समीक्षकांनी ‘तुतारी’ या काव्याला सर्वश्रेष्ठ कवितेचा मान दिला. केशवसुतांनी ही कविता पहिल्यांदा लिहिली तेव्हा ती १७ कडव्यांची होती. ती त्यांनी मुंबईत लिहिल्याचा उल्लेख आढळतो. कालांतरानं त्यातील तेराव्या आणि चौदाव्या कडव्यात त्यांनी बदल केला व नंतर ही कविता २० कडव्यांची केली. ही कविता नावाप्रमाणे महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचं ‘रणशिंग’ ठरली. या कवितेनं मराठी मनांवर एवढा खोल ठसा उमटवला, की या कवितेत मांडलेल्या तत्त्वज्ञानावर आधारित कविता करणाऱ्या कवींचा एक ‘तुतारी संप्रदाय’च तयार झाला. झोपी गेलेल्या समाजाला जागं करण्याचं काम या ‘तुतारी’नं केलं. त्यामुळे ‘तुतारी’ ही सामाजिक क्रांतीचे खºया अर्थानं समरगीत ठरली. यातील ओळींना मंत्राक्षरांसारखं अमरत्व प्राप्त झालं. आजही या कवितेतील ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि..., प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा... सावध ऐका पुढल्या हाका... समतेचा ध्वज उंच धरा रे... या गाजलेल्या ओळी एखाद्या वाक्प्रचाराप्रमाणे वापरल्या जातात. सामाजिक विषमतेमुळे केशवसुत अस्वस्थ झाले होते. चुकीच्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान, जातिभेद या सर्वांविरुद्ध त्यांनी ‘तुतारी’द्वारे रणशिंगच फुंकले. सारंगी, सतार, सनई अशी वाद्ये नादमधुर आणि श्रवणीय असतात. पण विषमतेच्या, अज्ञानाच्या गोंधळात झोपी गेलेल्या सामान्य जनतेला जागं करण्यासाठी ही वाद्यं योग्य नाहीत. त्यासाठी कर्कश्श तुतारीच आवश्यक आहे. या हेतूनेच केशवसुतांनी ‘तुतारी’ वाद्य या कवितेसाठी निवडलं. ते प्रतीकात्मक आहे. ते म्हणतात, ‘सारंगी, ती सतार सुंदरवीणा, बीनही, मृदंग, बाजा,सूरही, सनई, अलगुज माझ्याकसची ही हो पडतील काजा?कालबाह्य रूढी, अंधश्रद्धा, अज्ञान, अन्यायाच्या अंधकारात समाजाचं पतन होत आहे. गोड वाद्ये वाजवत उत्सव साजरा करण्याचा हा काळ नाही. त्यामुळे या आव्हानांचा समूळ नायनाट करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारणे, त्यासाठी ‘तुतारी’ पुकारून निद्रिस्त समाजाला भानावर आणण्याचा केशवसुतांचा हेतू होता. दुर्दैवानं सव्वाशे वर्षांनंतरही या समस्या न संपल्याने ‘तुतारी’ ही कविता कालबाह्य ठरत नाही. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, जाळुनी किंवा पुरूनी टाका’ हा केशवसुतांचा संदेश मानून प्राप्तकाळात नवीन सुंदर अक्षरलेणी खोदणे, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :marathiमराठी