शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची ‘पॉवर’ लक्षात घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:58 IST

भाजपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांची ‘आॅडिओ क्लिप’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे. पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांची माहिती विचारण्यासाठी डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. यावेळी संभाषणादरम्यान थेट खासगी गुंडे लावण्याची धमकी देत आपल्या ‘पॉवर’चे मोठमोठे दाखले दिले.

भाजपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांची ‘आॅडिओ क्लिप’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे. पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांची माहिती विचारण्यासाठी डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. यावेळी संभाषणादरम्यान थेट खासगी गुंडे लावण्याची धमकी देत आपल्या ‘पॉवर’चे मोठमोठे दाखले दिले. यासंदर्भात आता डॉ.पोतदार यांच्याकडून सारवासारवीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र देश, राज्य व जिल्ह्यात सत्तास्थानी असलेल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने अशाप्रकारची भाषा वापरणे हे निंदनीयच आहे. पक्षाची कवचकुंडले असली म्हणजे आपण काहीही करू शकतो, असा त्यांचा बहुधा समज झाला असावा. त्यामुळेच तर अगदी सत्ता डोक्यात गेल्यासारखी भाषा त्यांनी वापरली. मात्र हा अशा प्रकारचा पहिलाच प्रसंग नाही. सत्तास्थानी असलेला पक्ष कुठलाही असो, अगदी गल्लीतील कार्यकर्तादेखील नगरसेवकाच्या तोऱ्यात वावरतो. ‘चहापेक्षा किटली गरम’ असा एक वाक्प्रचार आहे. शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासारख्या ठिकाणी अनेकदा अशा अनेक ‘किटली’ दिसून येतात अन् नियम आणि नीतिमत्ता धाब्यावर बसवत ‘हम करे सो कायदा’ याच धोरणाने वागतात. डॉ.पोतदार यांना जिल्ह्यात मान आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना भावनांवर नियंत्रण ठेवून सारासार विवेकबुद्धीने वर्तन करावे लागते, हे त्यांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. संबंधित प्रकरणात पोलिसांनीदेखील शोध घेतला होता. अशा स्थितीत डॉ.पोतदार यांनी स्वत:कडूनदेखील चौकशी सुरू केली. यातून त्यांना पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही की काय, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. सत्ता ही कधीही शाश्वत नसते. दर पाच वर्षांनी खुर्चीवरील नेते बदलतात, मात्र जनता कायम असते. सार्वजनिक पातळीवर प्रत्येक नेता, कार्यकर्त्याने ही बाब डोक्यात ठेवूनच वावरायला हवे. मुळात एखाद्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद किंवा मिळालेली सत्ता ही स्वत:ला जनतेच्या नजरेत सिद्ध करून दाखविण्याची एक संधी असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्यातील भाजपाचेच तीन मोठे नेते यासाठी जीवाचे रान करत आहेत. मात्र डॉ.पोतदार यांनी केलेला असंसदीय भाषाप्रयोग ‘स्मार्टफोन्स’च्या माध्यमातून जनतेपर्यंत गेला आहे. लोकशाहीत राजकीय शक्तीपेक्षा जनता जास्त शक्तिशाली असते. त्यामुळे आपली ताकद सांगत असताना डॉ.पोतदार यांनी जनतेची ‘पॉवर’देखील लक्षात घ्यायला हवी. 

टॅग्स :Politicsराजकारणnewsबातम्या