शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

जनतेची ‘पॉवर’ लक्षात घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:58 IST

भाजपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांची ‘आॅडिओ क्लिप’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे. पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांची माहिती विचारण्यासाठी डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. यावेळी संभाषणादरम्यान थेट खासगी गुंडे लावण्याची धमकी देत आपल्या ‘पॉवर’चे मोठमोठे दाखले दिले.

भाजपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांची ‘आॅडिओ क्लिप’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे. पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांची माहिती विचारण्यासाठी डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. यावेळी संभाषणादरम्यान थेट खासगी गुंडे लावण्याची धमकी देत आपल्या ‘पॉवर’चे मोठमोठे दाखले दिले. यासंदर्भात आता डॉ.पोतदार यांच्याकडून सारवासारवीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र देश, राज्य व जिल्ह्यात सत्तास्थानी असलेल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने अशाप्रकारची भाषा वापरणे हे निंदनीयच आहे. पक्षाची कवचकुंडले असली म्हणजे आपण काहीही करू शकतो, असा त्यांचा बहुधा समज झाला असावा. त्यामुळेच तर अगदी सत्ता डोक्यात गेल्यासारखी भाषा त्यांनी वापरली. मात्र हा अशा प्रकारचा पहिलाच प्रसंग नाही. सत्तास्थानी असलेला पक्ष कुठलाही असो, अगदी गल्लीतील कार्यकर्तादेखील नगरसेवकाच्या तोऱ्यात वावरतो. ‘चहापेक्षा किटली गरम’ असा एक वाक्प्रचार आहे. शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासारख्या ठिकाणी अनेकदा अशा अनेक ‘किटली’ दिसून येतात अन् नियम आणि नीतिमत्ता धाब्यावर बसवत ‘हम करे सो कायदा’ याच धोरणाने वागतात. डॉ.पोतदार यांना जिल्ह्यात मान आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना भावनांवर नियंत्रण ठेवून सारासार विवेकबुद्धीने वर्तन करावे लागते, हे त्यांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. संबंधित प्रकरणात पोलिसांनीदेखील शोध घेतला होता. अशा स्थितीत डॉ.पोतदार यांनी स्वत:कडूनदेखील चौकशी सुरू केली. यातून त्यांना पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही की काय, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. सत्ता ही कधीही शाश्वत नसते. दर पाच वर्षांनी खुर्चीवरील नेते बदलतात, मात्र जनता कायम असते. सार्वजनिक पातळीवर प्रत्येक नेता, कार्यकर्त्याने ही बाब डोक्यात ठेवूनच वावरायला हवे. मुळात एखाद्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद किंवा मिळालेली सत्ता ही स्वत:ला जनतेच्या नजरेत सिद्ध करून दाखविण्याची एक संधी असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्यातील भाजपाचेच तीन मोठे नेते यासाठी जीवाचे रान करत आहेत. मात्र डॉ.पोतदार यांनी केलेला असंसदीय भाषाप्रयोग ‘स्मार्टफोन्स’च्या माध्यमातून जनतेपर्यंत गेला आहे. लोकशाहीत राजकीय शक्तीपेक्षा जनता जास्त शक्तिशाली असते. त्यामुळे आपली ताकद सांगत असताना डॉ.पोतदार यांनी जनतेची ‘पॉवर’देखील लक्षात घ्यायला हवी. 

टॅग्स :Politicsराजकारणnewsबातम्या