शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

काट्याच्या वाडीची गादी आणि पेशवाई वस्त्रे

By admin | Updated: July 1, 2016 04:46 IST

शरद पवार यांच्यासारखा निधर्मी, नि:जातीयवादी, तत्त्वनिष्ठ आणि कधीही खंजीर न बाळगणारा नेता इत:पर होणे नाही, यावर तमाम ‘राष्ट्रवाद्यां’ची अपरंपार श्रद्धा आहे.

शरद पवार यांच्यासारखा निधर्मी, नि:जातीयवादी, तत्त्वनिष्ठ आणि कधीही खंजीर न बाळगणारा नेता इत:पर होणे नाही, यावर तमाम ‘राष्ट्रवाद्यां’ची अपरंपार श्रद्धा आहे. ते त्यांना कवतिकाने जाणता राजा म्हणूनही अधूनमधून संबोधीत असतात. पवार केवळ निधर्मीच आहेत असे नव्हे तर ते निरीश्वरवादीदेखील आहेत आणि त्याच्या जोडीला निरक्षरवाद्यांचे पाठीराखे आणि त्यांच्यात आपले समर्थक पाहाणारे व म्हणूनच त्यांच्यावर मन:पूत प्रेम करणारे पुढारीदेखील आहेत. त्यांच्या ठायी असलेल्या अगणित अलौकीक गुणांपैकी एक म्हणजे ते कधीही भूतकाळात रमत नाहीत. वर्तमानकाळ हाच खरा भविष्यातील ऐश्वर्याच्या शिखराकडे घेऊन जाणारा सोपान या सिद्धांतावर त्यांची अलोट श्रद्धा आहे. त्यांच्या या सश्रद्ध भावनेकडे वाकुडेपणाने बघणारे आणि पवारांना संधीसाधू अशी उपाधी जोडणारे लोक भले असतीलही पण पवार अशांचे म्हणणे कधीच मनावर घेत नाहीत. निंदकांकडेही लोण्याच्या ममतेने बघण्याची कला त्यांना अवगत आहे. संतांच्या भूमीत बागडल्याचाच बहुधा तो परिणाम असावा. इतके सारे गोमटे असताना त्यांच्यासारखा नेता अचानक भूतकाळात आणि तेही इतिहास काळात व त्यातही परत मराठेशाहीच्या इतिहासात शिरुन तिथे का रममाण व्हावा हे भल्या भल्यांच्याही आकलनापलीकडचे ठरले आहे. तूर्तास दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या सत्ताधीशांना महाराष्ट्रातील जनतेच्या शिवशाहीवर (अस्सल, बेगडी नव्हे!) असलेल्या प्रेमाचा आणि थोरल्या महाराजांच्या वंशजांप्रती असलेल्या आदरभावाचा आठव पडला आणि त्यांनी छत्रपतींच्या करवीरकर वंशजास अत्याधुनिक काळातील मनसबदारी म्हणजेच राज्यसभेतील एक गादी आदरपूर्वक बहाल करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हेतु फार शुद्ध आणि प्रामाणिक होता वा आहे असा आरोप कोणीही सांप्रतच्या दिल्लीश्वरांवर करणार नाही. पण त्यांनी एक बेरीज करुन पाहिली. ती आपण करु शकलो नाही या उद्वेगाने असेल वा अन्य काही कारणानी असेल पवारांचा पित्तप्रकोप अचानक उसळून वरती आला. मराठेशाहीत छत्रपतींनी पेशवाई वस्त्रे बहाल केली पण आज पेशव्यांनी छत्रपतींना वस्त्रे बहाल केली, असे काहीसे ते म्हणाले. थोरल्या महाराजांचे चौथे वंशज छत्रपती शाहू महाराज यांनी बाळाजी विश्वनाथ बल्लाळ यास पेशवाईची म्हणजे मराठेशाहीची वस्त्रे प्रदान केली होती, त्याचाच संदर्भ बहुधा पवारांनी दिला असावा. इतिहासातील छत्रपती शाहू महाराज जन्माने मराठे होते आणि बाळाजी विश्वनाथ हा बामण होता आणि आज करवीरकर मराठा छत्रपतीस देवेन्द्र फडणवीस नावाच्या बामणाने मनसबदारीची वस्त्रे बहाल केली गेली, असा जो काही संदर्भ पवारांच्या वक्तव्यामधून निघतो, तो निव्वळ योगायोग समजावा आणि कोणत्याही जीवित वा मृत व्यक्ती अथवा संस्थेशी तिचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणी करु नये हेच खरे. कारण पवार असे जातीयवादी बोलतीलच कसे? पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी उगाचच खुलासा करताना छत्रपतींना आपण काही वस्त्रे बहाल केली नाहीत, तर दिल्लीश्वरांकडून आलेली वस्त्रे केवळ छत्रपतींकडे सुपूर्द करण्याचे काम केले असे म्हटले. खरे तर त्याची काहीही गरज नव्हती. कारण फडणवीस आणि बाळाजी विश्वनाथ दोघेही बामण असले तरी तो कोकणातला चित्तपावन आणि फडणवीस वऱ्हाडातले बहुधा देशस्थ (वर्णावरुन तरी तसेच वाटते). त्यामुळे टिपण जमत नाही. त्याहून महत्वाचे म्हणजे पवार अशी अनैतिहासिक चूक कशी करतील? ते जातीयवादी नसले तरी त्यांना केवळ जातीपातीची नव्हे तर उप आणि पोटजातींचीही खडा न खडा जाण असते. त्याशिवाय का कोणी असेच स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेईल? या राजाने दिल्लीचे तख्त फोडण्याचा (याचा नेमका अर्थ कोणी तरी कधी तरी सांगा रे) अनेकवार प्रयत्न करुन पाहिला. कपाळमोक्षाशिवाय काहीही हाती लागले नाही. आपल्या मार्गात सोनिया बाईसाहेब ही फिरंगीण आडवी येते म्हणून त्यांनी तिला एकाकी पाडण्याचा निर्णय घेतला तो फिरंग्यांचा द्वेष करण्याच्या एतद्देशियांच्या जन्मसिद्ध अधिकारातून. पण त्यात तेच एकाकी पडले हे अलाहिदा. पण मुद्दा ते तेव्हांही देशवादी असतील पण धर्म वा जातवादी नव्हे! ऐंशीच्या दशकातील त्या कुप्रसिद्ध ‘खंजीर’ प्रकरणात ‘इन्द्राय स्वाहा:, तक्षकाय स्वाहा:’ या न्यायाने त्यांनी वसंतदादा या स्वजनाचा घात करुन भटजींच्या पक्षातील लोकांच्या ओठाला सत्तेच्या मधाचे चाटण लावले ते का पवार जातीयवादी म्हणून? अगदी अलीकडात त्यांनी नरेन्द्र दामोदर मोदी नावाच्या बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या व्यक्तीस आणि नंतर अरुण जेटली या उच्चवर्णीयास काट्याच्या वाडीच्या गादीवरुन कुर्निसात करीत महावस्त्रे प्रदान केली ती काय जातीयवादातून? छे, छे! पवार असतील स्ववादी, स्वकुटुंबवादी, स्वकन्यावादी, स्वपुतण्यावादी पण त्यांना आता या वयात मनस्ताप देत नका रे उगाच ढकलू जातीयवाद्यांच्या कळपात!