शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालियनवालाबाग हत्याकांडातील काश्मिरींच्या योगदानाचे विस्मरण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:37 IST

१३ एप्रिल १९१९ रोजी पंजाबमध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ असलेल्या जालियनवालाबाग हत्याकांडाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रिटिशांविरुद्ध सारा देश पेटून उठला आणि ब्रिटिश सरकारच्या भारतातील अंताचा प्रारंभ झाला. या घटनेचे स्मृती शताब्दी वर्ष १३ एप्रिल २०१८ या दिवशी सुरू होत आहे.

- संजय नहार१३ एप्रिल हा दिवस खरे तर बैसाखी उत्सवाचा दिवस. बैसाखी हा उत्तरेतील विशेषत: पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी रब्बी पिकाच्या कापणीनंतर नव्या वर्षाचे स्वागत करतात तो दिवस. याच दिवशी १६९९ साली शीख धर्माचे दहावे आणि अंतिम गुरू गोबिंदसिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती; त्यामुळे हा उत्सव पंजाब आणि आजूबाजूच्या प्रदेशांमधील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. याच दिवशी अमृतसरमध्ये लाखो लोक जमतात आणि शीख धर्म स्थापनेचा उत्सव म्हणूनही साजरा करतात.याच दिवशी शिखांचा आणि पंजाबी जनतेचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि केलेले बलिदान अतुलनीय आहे. त्याची सर्व इतिहासकारांनी योग्य ती दखल घेतली आहे. मात्र काश्मिरी लोकांचा स्वातंत्र्यलढ्यात असलेल्या सहभागाची क्वचितच चर्चा होताना दिसते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची दिशा ठरविणाऱ्या जालियनवालाबाग हत्याकांडाच्या वेळी या बागेत सरकारचा निषेध करण्यासाठी जमलेल्या हजारो पंजाबी बांधवांबरोबरच काश्मिरींचाही सहभाग असल्याचे अनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत.भारतात विशेषत: पंजाब आणि बंगालमध्ये कोणत्या परकीय शक्तींच्या मदतीने ब्रिटिशांना विरोध केला जात आहे याचा अभ्यास करून या आंदोलनांना थांबविण्यासाठी नेत्यांना कुठल्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात डांबणे, माध्यमांवर बंधने तसेच कुठलीही बाजू ऐकून न घेता शिक्षा देणे अशी तरतूद असलेल्या आणि भारतीयांच्या अधिकारांवर घाला घालणाºया रौलेट अ‍ॅक्टविरुद्ध आंदोलन करा, असे आवाहन करणाºया महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पंजाबमध्ये आंदोलन करणाºया डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या नेत्यांना १० एप्रिल १९१९ रोजी अटक करून काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. त्यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आणि रौलेट अ‍ॅक्टला विरोध करण्यासाठी १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरच्या जालियानवालाबागेत डॉ. महम्मद बशीर यांनी एक सभा निमंत्रित केली. या सभेच्या अध्यक्षस्थानी लाला कन्हैय्या लाल भाटिया होते. या सभेत हजारोेपेक्षा अधिक काश्मिरी मुस्लीम सहभागी झाल्याची माहिती उपलब्ध आहे. त्या काळात अमृतसरमध्ये राहणाºया काश्मिरींची संख्या एकवीस हजारपेक्षा अधिक होती.डॉ. सत्यपाल आणि किचलू यांच्यापैकी सैफुद्दीन किचलू यांचा जन्म एका काश्मिरी मुस्लीम कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील पश्मिना शाली आणि केशराचा व्यवसाय करत असत. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामधील हे किचलू कुटुंब मूळचे काश्मिरी पंडित कुटुंब नंतर अठराव्या शतकाच्या शेवटी त्यांनी इस्लाममध्ये प्रवेश केला होता. आपल्या मूळच्या ब्राह्मण आणि आपण भारतीय असण्याचा किचलू यांना अभिमान होता.डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांच्या अटकेच्या निषेधार्थ जमलेल्या या जमावावर जनरल डायर यांच्या आदेशाने अत्यंत अमानुष गोळीबार करण्यात आला. सरकारने या गोळीबारात ठार झालेल्या ३७९ मृतांची यादी जाहीर केली, तर अमृतसरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण ४८४ मृतांची सूची उपलब्ध आहे. जालियनवालाबाग संग्रहालयामधील ३७९ मृतांच्या यादीत १४ काश्मिरींची नावे आहेत. यातील सर्वात लहान मोहम्मद इस्माईल हा सात वर्षाचा मुलगा होता तर गुलाम मोहम्मद हा जान मोहम्मद काश्मिरींचा ४४ वर्षांचा मुलगा होता. प्रत्यक्षात काश्मिरींची संख्या यापेक्षा खूप अधिक असल्याचे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांनी जालियनवाला बागेतील एकूण मृतांची संख्या तेराशेपेक्षा अधिक असल्याचे तर अमृतसरचे तेव्हाचे सिव्हिल सर्जन डॉ. स्मित यांनी ही संख्या अठराशेपेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे.आज काश्मिरी भारताच्या बरोबर नाही ते देशद्रोहीच आहे अथवा या सापांना दूध पाजू नका, पर्यटक म्हणूनही काश्मीरला जाऊ नका, असा सामाजिक माध्यमांमधून प्रचार करणारे काश्मिरींचे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी आणि नंतरचे योगदान विसरताना दिसतात. १९१९ नंतरच्या कालखंडात स्वातंत्र्य चळचळीत अनेक आंदोलनांमध्ये काश्मिरी लोक वेळोवेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी पंजाबी जनतेबरोबरच आपला सहभागही दिला होता. याचा वस्तुनिष्ठ अभ्यास होणे आवश्यक आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भाषा, धर्म, भौगोलिक सलगता आणि निर्णय घ्यायचा अधिकार या मुद्यांवर काश्मिरी जनता पाकिस्तानात जाऊ शकली असती; मात्र आपले नाते पाकिस्तानपेक्षा भारताशी अधिक आहे हे अनेकदा बहुसंख्य काश्मिरींनी आपल्या कृतीतून दाखविले आहे. गेल्या २८ वर्षांत काश्मीरमध्ये पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कारवाया सुरू झाल्यावर देशासाठी शहीद झालेल्या काश्मिरी मुस्लीम पोलीस आणि निमलष्करी दलातील सैनिकांची संख्या ३००० पेक्षा अधिक आहे. अतिरेक्यांनी ज्यांना ठार केले असे हजारो काश्मिरी आहेत. खरेतर शहिदांना जात, धर्म नसतो, मात्र आपण जेव्हा एखाद्या राज्याचे लोक देशद्रोही आहेत असे सहज म्हणतो तेव्हा त्यामागची कारणे, परिस्थिती आणि आंतरराष्टÑीय हस्तक्षेप याचा अभ्यास न करता प्रतिक्रिया व्यक्त करतो तेव्हा वेगळेपणाची भावना तीव्र होत जाते. म्हणूनच आम्हाला या देशाने वेगळे पाडले आहे, एकटे सोडले आहे, असे त्या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती एक आठवड्यापूर्वी जाहीरपणे म्हणाल्या, त्यावेळी देश आपण सर्वजण एक आहोत आणि देश काश्मिरींच्या बरोबर आहे, हे सांगणारी चळवळ अथवा नेते पुढे आले नाहीत.या पार्श्वभूमीवर यावर्षी जालियनवाला बाग हत्याकांडाची स्मृती शताब्दी सुरू होताना काश्मिरी जनता ही यात सहभागी होती. याची आठवण ठेवायला हवी. याच हत्याकांडानंतर काश्मीर ते कन्याकुमारी सगळा देश स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध पेटून उठला. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेली सर पदवी परत केली तर तरुणांमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्फुल्लिंग चेतविले. त्यातूनच भगतसिंग आणि उधमसिंग निर्माण झाले. धर्म, जात, भाषा आणि पंथ यामध्ये विभागलेले भारतीय एकत्र आले आणि महात्मा गांधींनीही ब्रिटिशांविरुद्ध असहकार आंदोलन पुकारले.काश्मिरी असलेले सैफुद्दीन किचलू आयुष्यभर स्वातंत्र्यसैनिक म्हणूनच जगले. त्यांनी काश्मिरी मुस्लिमांना भारतीय राष्टÑीय मुख्य प्रवाहाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या योगदानाची यानिमित्ताने देशाने योग्य ती दखल घ्यायलाच हवी.(लेखक सरहद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)